शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

कसमादेवासीयांचा पाणीप्रश्न मिटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:28 IST

कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर व पुनंद प्रकल्पातून व त्या अंतर्गत कालव्याद्वारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिल्यामुळे पाणी आवर्तनाच्या माध्यमातून कसमादे पट्ट्यातील गिरणा व पुनंद काठाला दिलासा मिळाला आहे.

कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर व पुनंद प्रकल्पातून व त्या अंतर्गत कालव्याद्वारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिल्यामुळे पाणी आवर्तनाच्या माध्यमातून कसमादे पट्ट्यातील गिरणा व पुनंद काठाला दिलासा मिळाला आहे.चणकापूर व पुनंद धरणात शिल्लक असलेल्या साठ्यापैकी ७५० दशलक्ष घनफूट पाणी बुधवारपासून २०० ते १२०० क्युसेसने गिरणा व पुनंद नदीसोबत चणकापूर उजवा कालव्यात विसर्ग करण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सहायक अभियंता वैशाली ठाकरे व पुनंदचे उपअभियंता विजय टिळे यांनी दिली.चणकापूर व पुनंद धरणातून गिरणा व पुनंद नदीपत्रात व त्या अंतर्गत कालव्यांना पाणी सोडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेकडून होत असल्यामुळे आमदार नितीन पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी साठा असल्याचे निदर्शनास आणून देत पाणी सोडण्याची मागणी केली होती.कसमादे पट्ट्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चणकापूर व पुनंद प्रकल्पातून कळवण, देवळा, सटाणा तालुक्यातील व गिरणा व पुनंद नदीकाठावरील गावे व मालेगाव महानगरपालिका, सटाणा नगर परिषद, कळवण नगरपंचायत व इतर पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी बिगर सिंचन आवर्तनासाठी देणे शक्य असल्याने पाणी सोडण्यात आले आहे.  चणकापूर व पुनंद धरणातून गिरणा आणि पुनंद नदीला, चणकापूर उजवा कालव्याला एकाच वेळी सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. चणकापूरच्या पाण्याने मालेगावसाठी असलेल्या तळवाडे तलाव भरण्याचा खास उद्देश असून, या अंतर्गत कसमादेसह इतर गावांनाही फायदा होणार आहे. दोन्ही धरणात असलेला शिल्लक पाणीसाठा आगामी काळात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास वापरण्यात येणार असून, या नियोजनामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक