शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

पुणेगाव कालव्याचे पाणी केद्राईत की दरसवाडीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 17:43 IST

संघर्ष पेटण्याची चिन्हे : भुजबळांपाठोपाठ अहेरांकडून पाहणी

ठळक मुद्देपुणेगावचे पाणी केद्राई धरणात टाकण्यात यावे किंवा भाटगाव नाल्यातुन दरसवाडीला पाणी न्यावे अशा विविध सूचना यावेळी शेतकऱ्यांनी केल्या

चांदवड : मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्यातून पाणी प्रवाहित झाल्यानंतर राष्टवादी आणि भाजप यांच्यात श्रेयवाद उफाळून आलेला असतानाच चांदवड तालुक्याला वरदान ठरणाऱ्या पुणेगाव -दरसवाडी कालव्याच्या ६३ कि.मी. परसूल गावापर्यंत आलेल्या पाण्याचाही मुद्दा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या कालव्याची आमदार छगन भुजवळ व आमदार डॉ. राहुल अहेर या दोहोंनी पाहणी करुन श्रेयवादाला तोंड फोडले आहे. सदर कालव्याचे पाणी केद्राई धरणात टाकण्याला भुजबळांनी अनुकूलता दर्शविली असताना सदर पाणी दरसवाडी धरणातच टाकणे गरजेचे असल्याची भूमिका डॉ. अहेर यांनी घेतल्याने राष्टÑवादी-भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पुणेगाव-दरसवाडी कालवा व धरणाची पाहणी नुकतीच येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. देवसाने मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने पुणेगाव धरण भरले असून पुणेगाव दरसवाडी कालव्याद्वारे ५९/५०० कि.मी. पर्यंत पाणी पोहचले आहे. मात्र गळतीमुळे पाण्याचा विसर्ग धिम्या गतीने सुरू असल्याने कामातील दिरंगाई बद्दल भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. पुणेगावचे पाणी केद्राई धरणात टाकण्यात यावे किंवा भाटगाव नाल्यातुन दरसवाडीला पाणी न्यावे अशा विविध सूचना यावेळी शेतकऱ्यांनी केल्या. त्यावर भुजबळ यांनी केद्राई धरणात पाणी टाकण्याबाबत अनुकूलता दर्शविली.भुजबळ यांच्या पाठोपाठ चांदवड-देवळ्याचे आमदार डॉ. राहूल अहेर यांनीही परसूल शिवारात पाण्याची पाहणी केली. मागील झालेल्या चुका व कालव्यास ठिकठिकाणी असलेली गळती यामुळे या कालव्याचे पाणी शेवटपर्यंत पोहचत नव्हते. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकरी वंचित असल्याचे डॉ. राहुल अहेर यांनी यावेळी सांगितले. मात्र, पुणेगाव परिसरातील नागरीकांच्या जमिनी गेल्या असल्याने त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी पाणी दरसवाडी धरणातच टाकणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. भुजबळ व अहेर यांनी घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकांमुळे पुणेगाव पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतकरी केद्राईसाठी आग्रहीदेवरगाव, दरसवाडी , उर्धुळ ,भोयेगाव येथील शेतक-यांची सदरचे पाणी परसुल मार्गे चढ असल्याने पाणी जात नाही त्यामुळे सदर पाणी केद्राई धरणात टाकून नंतर ते दरसवाडी धरणात सोडावे अशी मागणी आहे. त्यामुळे सरकार याबाबत नेमकी कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागून असणार आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ