शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
5
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
6
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
7
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
8
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
9
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
10
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
11
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
12
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
13
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
14
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
15
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
16
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
17
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
18
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
19
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
20
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल

पुणेगाव कालव्याचे पाणी केद्राईत की दरसवाडीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 17:43 IST

संघर्ष पेटण्याची चिन्हे : भुजबळांपाठोपाठ अहेरांकडून पाहणी

ठळक मुद्देपुणेगावचे पाणी केद्राई धरणात टाकण्यात यावे किंवा भाटगाव नाल्यातुन दरसवाडीला पाणी न्यावे अशा विविध सूचना यावेळी शेतकऱ्यांनी केल्या

चांदवड : मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्यातून पाणी प्रवाहित झाल्यानंतर राष्टवादी आणि भाजप यांच्यात श्रेयवाद उफाळून आलेला असतानाच चांदवड तालुक्याला वरदान ठरणाऱ्या पुणेगाव -दरसवाडी कालव्याच्या ६३ कि.मी. परसूल गावापर्यंत आलेल्या पाण्याचाही मुद्दा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या कालव्याची आमदार छगन भुजवळ व आमदार डॉ. राहुल अहेर या दोहोंनी पाहणी करुन श्रेयवादाला तोंड फोडले आहे. सदर कालव्याचे पाणी केद्राई धरणात टाकण्याला भुजबळांनी अनुकूलता दर्शविली असताना सदर पाणी दरसवाडी धरणातच टाकणे गरजेचे असल्याची भूमिका डॉ. अहेर यांनी घेतल्याने राष्टÑवादी-भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पुणेगाव-दरसवाडी कालवा व धरणाची पाहणी नुकतीच येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. देवसाने मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने पुणेगाव धरण भरले असून पुणेगाव दरसवाडी कालव्याद्वारे ५९/५०० कि.मी. पर्यंत पाणी पोहचले आहे. मात्र गळतीमुळे पाण्याचा विसर्ग धिम्या गतीने सुरू असल्याने कामातील दिरंगाई बद्दल भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. पुणेगावचे पाणी केद्राई धरणात टाकण्यात यावे किंवा भाटगाव नाल्यातुन दरसवाडीला पाणी न्यावे अशा विविध सूचना यावेळी शेतकऱ्यांनी केल्या. त्यावर भुजबळ यांनी केद्राई धरणात पाणी टाकण्याबाबत अनुकूलता दर्शविली.भुजबळ यांच्या पाठोपाठ चांदवड-देवळ्याचे आमदार डॉ. राहूल अहेर यांनीही परसूल शिवारात पाण्याची पाहणी केली. मागील झालेल्या चुका व कालव्यास ठिकठिकाणी असलेली गळती यामुळे या कालव्याचे पाणी शेवटपर्यंत पोहचत नव्हते. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकरी वंचित असल्याचे डॉ. राहुल अहेर यांनी यावेळी सांगितले. मात्र, पुणेगाव परिसरातील नागरीकांच्या जमिनी गेल्या असल्याने त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी पाणी दरसवाडी धरणातच टाकणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. भुजबळ व अहेर यांनी घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकांमुळे पुणेगाव पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतकरी केद्राईसाठी आग्रहीदेवरगाव, दरसवाडी , उर्धुळ ,भोयेगाव येथील शेतक-यांची सदरचे पाणी परसुल मार्गे चढ असल्याने पाणी जात नाही त्यामुळे सदर पाणी केद्राई धरणात टाकून नंतर ते दरसवाडी धरणात सोडावे अशी मागणी आहे. त्यामुळे सरकार याबाबत नेमकी कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागून असणार आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ