शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पुणेगाव कालव्याचे पाणी केद्राईत की दरसवाडीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 17:43 IST

संघर्ष पेटण्याची चिन्हे : भुजबळांपाठोपाठ अहेरांकडून पाहणी

ठळक मुद्देपुणेगावचे पाणी केद्राई धरणात टाकण्यात यावे किंवा भाटगाव नाल्यातुन दरसवाडीला पाणी न्यावे अशा विविध सूचना यावेळी शेतकऱ्यांनी केल्या

चांदवड : मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्यातून पाणी प्रवाहित झाल्यानंतर राष्टवादी आणि भाजप यांच्यात श्रेयवाद उफाळून आलेला असतानाच चांदवड तालुक्याला वरदान ठरणाऱ्या पुणेगाव -दरसवाडी कालव्याच्या ६३ कि.मी. परसूल गावापर्यंत आलेल्या पाण्याचाही मुद्दा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या कालव्याची आमदार छगन भुजवळ व आमदार डॉ. राहुल अहेर या दोहोंनी पाहणी करुन श्रेयवादाला तोंड फोडले आहे. सदर कालव्याचे पाणी केद्राई धरणात टाकण्याला भुजबळांनी अनुकूलता दर्शविली असताना सदर पाणी दरसवाडी धरणातच टाकणे गरजेचे असल्याची भूमिका डॉ. अहेर यांनी घेतल्याने राष्टÑवादी-भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पुणेगाव-दरसवाडी कालवा व धरणाची पाहणी नुकतीच येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. देवसाने मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने पुणेगाव धरण भरले असून पुणेगाव दरसवाडी कालव्याद्वारे ५९/५०० कि.मी. पर्यंत पाणी पोहचले आहे. मात्र गळतीमुळे पाण्याचा विसर्ग धिम्या गतीने सुरू असल्याने कामातील दिरंगाई बद्दल भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. पुणेगावचे पाणी केद्राई धरणात टाकण्यात यावे किंवा भाटगाव नाल्यातुन दरसवाडीला पाणी न्यावे अशा विविध सूचना यावेळी शेतकऱ्यांनी केल्या. त्यावर भुजबळ यांनी केद्राई धरणात पाणी टाकण्याबाबत अनुकूलता दर्शविली.भुजबळ यांच्या पाठोपाठ चांदवड-देवळ्याचे आमदार डॉ. राहूल अहेर यांनीही परसूल शिवारात पाण्याची पाहणी केली. मागील झालेल्या चुका व कालव्यास ठिकठिकाणी असलेली गळती यामुळे या कालव्याचे पाणी शेवटपर्यंत पोहचत नव्हते. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकरी वंचित असल्याचे डॉ. राहुल अहेर यांनी यावेळी सांगितले. मात्र, पुणेगाव परिसरातील नागरीकांच्या जमिनी गेल्या असल्याने त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी पाणी दरसवाडी धरणातच टाकणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. भुजबळ व अहेर यांनी घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकांमुळे पुणेगाव पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतकरी केद्राईसाठी आग्रहीदेवरगाव, दरसवाडी , उर्धुळ ,भोयेगाव येथील शेतक-यांची सदरचे पाणी परसुल मार्गे चढ असल्याने पाणी जात नाही त्यामुळे सदर पाणी केद्राई धरणात टाकून नंतर ते दरसवाडी धरणात सोडावे अशी मागणी आहे. त्यामुळे सरकार याबाबत नेमकी कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागून असणार आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ