शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

पाणीप्रश्न पुन्हा गाजणार

By admin | Updated: January 12, 2016 00:16 IST

आज महासभा : सोशल आॅडिटचा होणार पंचनामा

नाशिक : गेल्या तीन-चार महिन्यांपासून धगधगत असलेला पाणीप्रश्न पुन्हा एकदा मंगळवारी (दि.१२) होणाऱ्या महासभेत गाजण्याची शक्यता असून, प्रशासनाने केलेल्या सोशल आॅडिटचा पंचनामा करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही केली आहे. पाणीवाटपातील असमतोलाबद्दलही नगरसेवक आक्रमक होण्याचे संकेत मिळत आहेत. गंगापूर धरणातून पाणी जायकवाडीला सोडल्यानंतर भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी महासभेने पाणीकपातीचे धोरण अवलंबिले आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यापूर्वीच महासभेचा एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय अंमलात आणला जात आहे. त्यानंतर महासभेने आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याच्या निर्णयावरून भाजपा विरुद्ध सत्ताधारी गट यांच्यात संघर्ष उभा ठाकला आहे. सुरुवातीला शहरात पाणी मुबलक असल्याचा दावा करणाऱ्या पालकमंत्र्यांचा सूर नंतर बदलला आणि जुलैअखेर पाणी पुरवायचे असेल तर पाणीकपात आवश्यक असल्याची भूमिका घेतली. याचबरोबर सोशल आॅडिटचा आधार घेत नाशिककर पाण्याची उधळपट्टी करत असल्याचाही आरोप पालकमंत्र्यांनी केला होता. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या महासभेत पुन्हा एकदा पाणीकपातीचा मुद्दा गाजण्याची शक्यता असून, भाजपाला लक्ष्य करण्याची तयारी सत्ताधारी मनसेसह विरोधी पक्षांनीही केली आहे. त्याची सुरुवात मनसेचे प्रवक्ते व संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी केली आहे. अभ्यंकर यांनी पालकमंत्री आणि भाजपा आमदारांना पाणीप्रश्नी लक्ष न घालण्याचा सल्ला देतानाच त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे, महासभेत सत्ताधारी मनसे अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. याशिवाय, महापालिका प्रशासनाने चोवीस तासांत केलेल्या सोशल आॅडिटचाही पंचनामा होण्याची चिन्हे आहेत. सोशल आॅडिटच्या माध्यमातून शहरातील पाणीवाटपात असमतोल निदर्शनास आल्याने प्रशासनाला जाब विचारला जाणार असल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये आहे. मंगळवारी होणाऱ्या महासभेत विषयपत्रिकेवर चर्चा होण्याऐवजी पाणीप्रश्नीच सदस्यांकडून प्रशासनाला पुन्हा एकदा घेरले जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)