शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

ओझरखेड कालव्याच्या पाण्यामुळे शिरवाडे परिसरात मिळणार दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 18:48 IST

शिरवाडे वणी : येथील ओझरखेड कालव्याला पाणी सोडण्यात आले असून या पाण्यामुळे परिसरातील द्राक्षबागांना, जनावरांसाठी चारा, पिण्याच्या पाण्यासाठी व पाण्यावर अवलंबून असलेल्या जलपुरवठा योजना व इतर व्यवसायांना दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देयावर्षी खरीप हंगामात फक्त एकच आवर्तन दिले

शिरवाडे वणी : येथील ओझरखेड कालव्याला पाणी सोडण्यात आले असून या पाण्यामुळे परिसरातील द्राक्षबागांना, जनावरांसाठी चारा, पिण्याच्या पाण्यासाठी व पाण्यावर अवलंबून असलेल्या जलपुरवठा योजना व इतर व्यवसायांना दिलासा मिळणार आहे.मागील दोन महिन्यांत बहुतांशी भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली; परंतु त्याचा दुरुपयोग झाला असून द्राक्षबागांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे एप्रिल महिन्यात द्राक्षबागांची काढणी बऱ्याच प्रमाणावर होत असते. पुढील हंगामातील पीक घेण्यासाठी द्राक्षबागांना पाणी देऊन छाटणी करणे व द्राक्षबागेमध्ये काडी तयार करणे गरजेचे असते.त्याप्रमाणे प्रतिवर्षी ठरलेल्या नियोजनाप्रमाणे मार्चअखेर किंवा एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले असते. त्यासाठी पिण्याच्या पाण्याचा आरक्षित साठा व द्राक्षबागांसाठी पाणी पुरवण्यासाठी साठा ठेवून खरीप हंगामात पाणी दिले जाते. तसेच एप्रिलमधील दिला जाणारा पाणीपुरवठा हा पाटबंधारे विभागाला मुबलक पैसा मिळवून देणारा असतो. त्या पद्धतीनेच या पाण्याचे नियोजन दरवर्षी केले जाते.यावर्षी खरीप हंगामात फक्त एकच आवर्तन दिले गेले होते. त्यामुळे ओझरखेड धरणात बहुतांशी साठा आहे. मध्यंतरी बेमोसमी पावसामुळे पाणीटंचाई भासली नाही; परंतु गेल्या महिनाभरापासून उन्हामुळे पिकांना पाण्याची गरज भासत आहे.रब्बी हंगामातील हे शेवटचे आवर्तन असून किमान ४० दिवसांचे आवर्तन कालव्याला सोडण्यात येते. रानवड, सावरगाव, नांदूर, वावी, गोरठाण, शिरवाडे, पाचोरे वणी, मुखेड, खडक माळेगाव या गावांतील पाणीवापर संस्थांचे ठराव व मागणीनुसार पाटबंधारे विभागाने बैठकीअंतर्गत पाणी सोडण्याचे नियोजन केल्याप्रमाणे कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे.पाण्याचा दुरुपयोग करू नये व योग्य प्रकारे पाण्याचे वाटप करून शेतकरीवर्गाने पाण्याचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये याची दक्षता पाणीवापर संस्थांच्या कर्मचारीवर्गाने घेण्यात यावी. तसेच शेतकरीवर्गानेसुद्धा आवश्यक ते सहकार्य पाटबंधारे विभागाला करावे, असे आदेश पाटबंधारे विभागाने दिले आहेत.त्यानुसार ओझरखेड कालव्याला पाणी सोडले असल्याची माहिती पाणीवापर संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. ओझरखेड कालव्याला पाणी सोडण्यात आले असून परिसरातील जळू पाहणाऱ्या पिकांना, द्राक्षबागांना तसेच परिसरातील पाण्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायांना जीवदान मिळणार असून पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.कारण सद्य:स्थितीत उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरीच्या पाण्याची पातळीदेखील खालावत आहे. या कालव्याला पाणी सोडल्यामुळे परिसरातील शेतकरीवर्ग व इतर व्यावसायिक, जलपुरवठा योजना आदींना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. (२७ पालखेड कालवा)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य