शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ओझरखेड कालव्याच्या पाण्यामुळे शिरवाडे परिसरात मिळणार दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 18:48 IST

शिरवाडे वणी : येथील ओझरखेड कालव्याला पाणी सोडण्यात आले असून या पाण्यामुळे परिसरातील द्राक्षबागांना, जनावरांसाठी चारा, पिण्याच्या पाण्यासाठी व पाण्यावर अवलंबून असलेल्या जलपुरवठा योजना व इतर व्यवसायांना दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देयावर्षी खरीप हंगामात फक्त एकच आवर्तन दिले

शिरवाडे वणी : येथील ओझरखेड कालव्याला पाणी सोडण्यात आले असून या पाण्यामुळे परिसरातील द्राक्षबागांना, जनावरांसाठी चारा, पिण्याच्या पाण्यासाठी व पाण्यावर अवलंबून असलेल्या जलपुरवठा योजना व इतर व्यवसायांना दिलासा मिळणार आहे.मागील दोन महिन्यांत बहुतांशी भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली; परंतु त्याचा दुरुपयोग झाला असून द्राक्षबागांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे एप्रिल महिन्यात द्राक्षबागांची काढणी बऱ्याच प्रमाणावर होत असते. पुढील हंगामातील पीक घेण्यासाठी द्राक्षबागांना पाणी देऊन छाटणी करणे व द्राक्षबागेमध्ये काडी तयार करणे गरजेचे असते.त्याप्रमाणे प्रतिवर्षी ठरलेल्या नियोजनाप्रमाणे मार्चअखेर किंवा एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले असते. त्यासाठी पिण्याच्या पाण्याचा आरक्षित साठा व द्राक्षबागांसाठी पाणी पुरवण्यासाठी साठा ठेवून खरीप हंगामात पाणी दिले जाते. तसेच एप्रिलमधील दिला जाणारा पाणीपुरवठा हा पाटबंधारे विभागाला मुबलक पैसा मिळवून देणारा असतो. त्या पद्धतीनेच या पाण्याचे नियोजन दरवर्षी केले जाते.यावर्षी खरीप हंगामात फक्त एकच आवर्तन दिले गेले होते. त्यामुळे ओझरखेड धरणात बहुतांशी साठा आहे. मध्यंतरी बेमोसमी पावसामुळे पाणीटंचाई भासली नाही; परंतु गेल्या महिनाभरापासून उन्हामुळे पिकांना पाण्याची गरज भासत आहे.रब्बी हंगामातील हे शेवटचे आवर्तन असून किमान ४० दिवसांचे आवर्तन कालव्याला सोडण्यात येते. रानवड, सावरगाव, नांदूर, वावी, गोरठाण, शिरवाडे, पाचोरे वणी, मुखेड, खडक माळेगाव या गावांतील पाणीवापर संस्थांचे ठराव व मागणीनुसार पाटबंधारे विभागाने बैठकीअंतर्गत पाणी सोडण्याचे नियोजन केल्याप्रमाणे कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे.पाण्याचा दुरुपयोग करू नये व योग्य प्रकारे पाण्याचे वाटप करून शेतकरीवर्गाने पाण्याचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये याची दक्षता पाणीवापर संस्थांच्या कर्मचारीवर्गाने घेण्यात यावी. तसेच शेतकरीवर्गानेसुद्धा आवश्यक ते सहकार्य पाटबंधारे विभागाला करावे, असे आदेश पाटबंधारे विभागाने दिले आहेत.त्यानुसार ओझरखेड कालव्याला पाणी सोडले असल्याची माहिती पाणीवापर संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. ओझरखेड कालव्याला पाणी सोडण्यात आले असून परिसरातील जळू पाहणाऱ्या पिकांना, द्राक्षबागांना तसेच परिसरातील पाण्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायांना जीवदान मिळणार असून पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.कारण सद्य:स्थितीत उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरीच्या पाण्याची पातळीदेखील खालावत आहे. या कालव्याला पाणी सोडल्यामुळे परिसरातील शेतकरीवर्ग व इतर व्यावसायिक, जलपुरवठा योजना आदींना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. (२७ पालखेड कालवा)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य