शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विल्होळी तलावातील पाण्याची पातळी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:49 IST

विल्होळी : येथील गौळाणा विल्होळी एमआय टॅँक अर्थात तलावातील पाण्याची पातळी घसरली असून, शेतकऱ्यांना आठवड्यातून तीनच दिवस पाणी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देविल्होळी ग्रामपंचायतीच्या वतीने पाटबंधारे खात्यास पत्र शेतकºयांना आठवड्यामध्ये तीन दिवस पाणी देण्यात येणार

विल्होळी : येथील गौळाणा विल्होळी एमआय टॅँक अर्थात तलावातील पाण्याची पातळी घसरली असून, शेतकऱ्यांना आठवड्यातून तीनच दिवस पाणी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.विल्होळी तलावाच्या खालच्या बाजूस गाव व परिसरासाठी पाणीपुरवठा करणारी विहीर असून, पाणी कमी झाल्याने विहिरीला पाणी कमी येते. त्यामुळे विल्होळी ग्रामपंचायतीच्या वतीने पाटबंधारे खात्यास पत्र देण्यात आले आहे. व्यावसायिक तलावामधून अवैधरीत्या पाणी चोरत असल्याने पाण्याची पातळी कमी झाली असल्याचे काही शेतकºयांनी सांगितले. यावर अधिकारी अशोक दुगड यांना विचारणा केली असता, भूमिगत पाइपलाइन केल्याने अवैधरीत्या पाणीचोरी करणारे सापडत नसून शेतकºयांनी अशा बाबी लक्षात आणून दिल्यास पाणीचोरावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.मार्च, एप्रिलमध्ये शेतकºयांना पूर्ण पाणी देण्यात आले, परंतु १ मेपासून पिण्याच्या पाण्याचा तुटवडा लक्षात घेता शेतकºयांना आठवड्यामध्ये तीन दिवस पाणी देण्यात येणार आहे. पाण्याची पातळी घसरली असल्याने सर्वांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पाण्याचा उपसा थांबविण्याची मागणी विल्होळी परिसरातील शेती येथील गौळाणे एमआय टँक या तलावावर अवलंबून आहे. विल्होळी येथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येथूनच होते. परंतु काही व्यावसायिक सदर तलावातून गैरमार्गाने पाण्याचा उपसा करत असून सदर प्रकार थांबवावा, अशी प्रतिक्रि या शेतकºयांकडून उमटत आहे. सदर पाणीचोरीला आळा बसणे गरजेचे आहे.