शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

कडवातील पाण्याची पातळी घटली

By admin | Updated: April 3, 2016 22:46 IST

कडवातील पाण्याची पातळी घटली

 इगतपुरी : तालुक्यातील कडवा धरणात सिन्नर येथील नगरपालिका पाणीपुरवठा योजनेखाली ७० फूट खोल विहिरीचे काम सुरू आहे. तेथील उपसा केलेली माती कडवा धरणातच मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत असल्यामुळे पाण्याची घटती पातळी चिंताजनक बनत चालली आहे. यामुळे कडवा धरणात असलेला शिल्लक जलसाठा कमी झाला आहे, याला कारण म्हणजे गेल्या १५ दिवसांपासून सुरू झालेल्या आणि सन २०१२-१३ या कालावधीत मंजूर असलेल्या सिन्नर येथील नगरपालिका पाणीपुरवठा योजनेच्या ७० फूट विहिरीचे काम कडवा धरणात मोठ्या जोमाने सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेतून पूर्ण सिन्नर तालुक्याला या विहिरीद्वारे धरणातून ९.३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित झालेले असले, तरी तेथील सदर विहिरीची अत्यंत खराब असलेली माती विनाकारण आर. ए. घुले कंपनी कडवा धरणात आणून टाकीत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. गेल्या दशकात कडवा धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. छोट्या मोठ्या नदी-नाल्यांद्वारे धरणात ३ ते ४ मीटर गाळ वाहून आला असून, त्यात आणखीनच मातीचे ढिगारे टाकून दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. विहिरीतून मोठ्या प्रमाणात मातीची अवजड वाहने भरून कडवा धरणात संबंधित ठेकेदार आर. ए. घुले कंपनी सोडीत असल्याने धरणाची सुरक्षा वाऱ्यावर दिसत आहे. धरणाखालील निनावी, भरवीर बुद्रुक, पिंपळगाव घाडगा, अडसरे, पिंपळगाव डुकरा, सर्वतीर्थ टाकेद आदि तहानलेली गावे पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करीत आहेत. या गावांना पिण्याच्या पाण्याची व मुक्या जनावरांना चाऱ्याची टंचाई भेडसावत असताना धरणात फक्त १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सदर ठेकेदाराच्या अजब गजब कारभारामुळे भीषण दुष्काळी परिस्थितीत कडवा धरणातील उर्वरित जलसाठ्यावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. परिसरातील गावांना यामुळे दूषित पाणी पिण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पूर्व भागातील सर्व गावांना कडवा धरणाचा मोठा आधार आहे. परंतु मातीच्या ढिगाऱ्यांमुळे पाणीदेखील प्रदूषित झाले आहे. पूर्ण अहमदनगर जिल्ह्याला पाणी पुरविणाऱ्या धरणाची जलपातळी यामुळे घटत आहे. सिन्नर नगरपालिका कडवा धरणात आरक्षित केले असून, यामुळे कॅनॉल व पाटाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक शेतकऱ्यांवर पाणीकपातीचे मोठे संकट उभे राहिले आहे. येणाऱ्या काही दिवसांत पाटाच्या पाण्याचे आवर्तनदेखील कपात करण्यात येणार असून, याचा फायदा सिन्नर नगरपालिकेला होणार असल्याने येथील शेतकरी दुहेरी कात्रीत सापडले आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सदर धरणात माती टाकण्यास कायदेशीर बंदी आणावी तसेच माती धरणाबाहेर टाकावी. तसे न झाल्यास सर्व नागरिक एकत्र येऊन येथील धरणात सुरू असलेले विहिरीचे काम बंद आंदोलन करण्याचा इशारा निनावी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश टोचे, साहेबराव झनकर, नामदेव साबळे, वसंत मोंढे, रंगनाथ लगड आदि परिसरातील नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)