शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

कडवातील पाण्याची पातळी घटली

By admin | Updated: April 3, 2016 22:46 IST

कडवातील पाण्याची पातळी घटली

 इगतपुरी : तालुक्यातील कडवा धरणात सिन्नर येथील नगरपालिका पाणीपुरवठा योजनेखाली ७० फूट खोल विहिरीचे काम सुरू आहे. तेथील उपसा केलेली माती कडवा धरणातच मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत असल्यामुळे पाण्याची घटती पातळी चिंताजनक बनत चालली आहे. यामुळे कडवा धरणात असलेला शिल्लक जलसाठा कमी झाला आहे, याला कारण म्हणजे गेल्या १५ दिवसांपासून सुरू झालेल्या आणि सन २०१२-१३ या कालावधीत मंजूर असलेल्या सिन्नर येथील नगरपालिका पाणीपुरवठा योजनेच्या ७० फूट विहिरीचे काम कडवा धरणात मोठ्या जोमाने सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेतून पूर्ण सिन्नर तालुक्याला या विहिरीद्वारे धरणातून ९.३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित झालेले असले, तरी तेथील सदर विहिरीची अत्यंत खराब असलेली माती विनाकारण आर. ए. घुले कंपनी कडवा धरणात आणून टाकीत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. गेल्या दशकात कडवा धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. छोट्या मोठ्या नदी-नाल्यांद्वारे धरणात ३ ते ४ मीटर गाळ वाहून आला असून, त्यात आणखीनच मातीचे ढिगारे टाकून दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. विहिरीतून मोठ्या प्रमाणात मातीची अवजड वाहने भरून कडवा धरणात संबंधित ठेकेदार आर. ए. घुले कंपनी सोडीत असल्याने धरणाची सुरक्षा वाऱ्यावर दिसत आहे. धरणाखालील निनावी, भरवीर बुद्रुक, पिंपळगाव घाडगा, अडसरे, पिंपळगाव डुकरा, सर्वतीर्थ टाकेद आदि तहानलेली गावे पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करीत आहेत. या गावांना पिण्याच्या पाण्याची व मुक्या जनावरांना चाऱ्याची टंचाई भेडसावत असताना धरणात फक्त १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सदर ठेकेदाराच्या अजब गजब कारभारामुळे भीषण दुष्काळी परिस्थितीत कडवा धरणातील उर्वरित जलसाठ्यावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. परिसरातील गावांना यामुळे दूषित पाणी पिण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पूर्व भागातील सर्व गावांना कडवा धरणाचा मोठा आधार आहे. परंतु मातीच्या ढिगाऱ्यांमुळे पाणीदेखील प्रदूषित झाले आहे. पूर्ण अहमदनगर जिल्ह्याला पाणी पुरविणाऱ्या धरणाची जलपातळी यामुळे घटत आहे. सिन्नर नगरपालिका कडवा धरणात आरक्षित केले असून, यामुळे कॅनॉल व पाटाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक शेतकऱ्यांवर पाणीकपातीचे मोठे संकट उभे राहिले आहे. येणाऱ्या काही दिवसांत पाटाच्या पाण्याचे आवर्तनदेखील कपात करण्यात येणार असून, याचा फायदा सिन्नर नगरपालिकेला होणार असल्याने येथील शेतकरी दुहेरी कात्रीत सापडले आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सदर धरणात माती टाकण्यास कायदेशीर बंदी आणावी तसेच माती धरणाबाहेर टाकावी. तसे न झाल्यास सर्व नागरिक एकत्र येऊन येथील धरणात सुरू असलेले विहिरीचे काम बंद आंदोलन करण्याचा इशारा निनावी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश टोचे, साहेबराव झनकर, नामदेव साबळे, वसंत मोंढे, रंगनाथ लगड आदि परिसरातील नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)