शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पंधरा दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:48 IST

मनमाड : पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नद्यांना महापूर आला असला तरी गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईच्या दृष्टचक्रात सापडलेल्या मनमाड परिसरात मात्र केवळ पावसाची बुरबूर सुरू आहे. परिसरात अद्यापही जोरदार पावसाचे आगमन झाले नसल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. परिणामी मनमाडकरांना १२ ते १४ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने ऐन पावसाळ्यातही मनमाडकर तहाणलेलेच आहेत.

ठळक मुद्दे येत्या काही दिवसात पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये कपात करण्याचे नियोजन सुरू

 

मनमाडकर तहानलेलेच । ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती

गिरीश जोशी

मनमाड : पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नद्यांना महापूर आला असला तरी गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईच्या दृष्टचक्रात सापडलेल्या मनमाड परिसरात मात्र केवळ पावसाची बुरबूर सुरू आहे. परिसरात अद्यापही जोरदार पावसाचे आगमन झाले नसल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. परिणामी मनमाडकरांना १२ ते १४ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने ऐन पावसाळ्यातही मनमाडकर तहाणलेलेच आहेत.सध्या जिल्ह्यासह सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. नदीनाल्यांना महापूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाअभावी तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे होरपळलेल्या जनतेला आणि बळीराजाला यावर्षी दिलासा मिळणार अशी आशा वाटत असतानाच पावसाने पाठ फिरवल्याने सर्वांचाच भ्रमनिरास झाला. मनमाड शहराची पाणीटंचाईच्या संकटातून अजूनही सुटका झालेली नाही. आजही शहरातील अनेक भागांना १२ ते १४ दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील कूपनलिका व विहिरी कोरड्या असल्याने पाण्याची शोधाशोध करावी लागत आहे. मनमाड शहरातील पाणीटंचाईचे भोग अजूनही संपलेले नाहीत. तालुक्यात काही भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला असला तरी शहरासह पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पानलोटक्षेत्रामध्ये पाऊस झालाच नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून सर्वत्र पावसाने हाहाकार उडाला असला तरी मनमाड परिसरात मात्र पावसाची बुुरबूर सुरू आहे. परिणामी पडत्या पावसातही मनमाडकरांच्या नशिबी पाणीटंचाईचा फेरा आहे तसाच कायम आहे. पावसाअभावी विहिीरींना अद्याप पाणी आलेले नसल्याने परिसरातील शेतकरीसुद्धा हवालदिल झाला आहे. परिसर सध्या जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.पालखेड धरणातून मुबलक प्रमाणात मिळणाºया पूरपाण्यामुळे पालिकेचा पाटोदा साठवणूक तलाव भरून घेण्यात आला आहे. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाºया वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने या धरणात अल्पपाणी साठा जमा झाला असला तरी पाटोदा साठवण तलावातून चार पंपांच्या साहाय्याने पाणी उचलून वागदर्डी धरणात साठवण्यात येत आहे. वागदर्डीमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाल्यानंतर पाणीपुरवठ्याच्या नियोजनात बदल करून दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. यावर्षी सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असला तरी मनमाडकरांवर मात्र पावसाअभावी पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे.मनमाड परिसरात पावसाने दडी मारल्याने पाटोदा साठवण तलावातून वागदर्डी धरणात पाणी घेण्यात येत आहे. येत्या काही दिवसात पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये कपात करण्याचे नियोजन सुरू आहे.- पद्मावती धात्रक,नगराध्यक्ष, मनमाड