शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
4
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
5
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
6
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
7
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
8
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
9
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
10
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
11
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
12
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
13
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
14
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
15
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
16
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
17
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
18
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
19
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
20
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

पंधरा दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:48 IST

मनमाड : पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नद्यांना महापूर आला असला तरी गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईच्या दृष्टचक्रात सापडलेल्या मनमाड परिसरात मात्र केवळ पावसाची बुरबूर सुरू आहे. परिसरात अद्यापही जोरदार पावसाचे आगमन झाले नसल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. परिणामी मनमाडकरांना १२ ते १४ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने ऐन पावसाळ्यातही मनमाडकर तहाणलेलेच आहेत.

ठळक मुद्दे येत्या काही दिवसात पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये कपात करण्याचे नियोजन सुरू

 

मनमाडकर तहानलेलेच । ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती

गिरीश जोशी

मनमाड : पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नद्यांना महापूर आला असला तरी गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईच्या दृष्टचक्रात सापडलेल्या मनमाड परिसरात मात्र केवळ पावसाची बुरबूर सुरू आहे. परिसरात अद्यापही जोरदार पावसाचे आगमन झाले नसल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. परिणामी मनमाडकरांना १२ ते १४ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने ऐन पावसाळ्यातही मनमाडकर तहाणलेलेच आहेत.सध्या जिल्ह्यासह सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. नदीनाल्यांना महापूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाअभावी तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे होरपळलेल्या जनतेला आणि बळीराजाला यावर्षी दिलासा मिळणार अशी आशा वाटत असतानाच पावसाने पाठ फिरवल्याने सर्वांचाच भ्रमनिरास झाला. मनमाड शहराची पाणीटंचाईच्या संकटातून अजूनही सुटका झालेली नाही. आजही शहरातील अनेक भागांना १२ ते १४ दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील कूपनलिका व विहिरी कोरड्या असल्याने पाण्याची शोधाशोध करावी लागत आहे. मनमाड शहरातील पाणीटंचाईचे भोग अजूनही संपलेले नाहीत. तालुक्यात काही भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला असला तरी शहरासह पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पानलोटक्षेत्रामध्ये पाऊस झालाच नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून सर्वत्र पावसाने हाहाकार उडाला असला तरी मनमाड परिसरात मात्र पावसाची बुुरबूर सुरू आहे. परिणामी पडत्या पावसातही मनमाडकरांच्या नशिबी पाणीटंचाईचा फेरा आहे तसाच कायम आहे. पावसाअभावी विहिीरींना अद्याप पाणी आलेले नसल्याने परिसरातील शेतकरीसुद्धा हवालदिल झाला आहे. परिसर सध्या जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.पालखेड धरणातून मुबलक प्रमाणात मिळणाºया पूरपाण्यामुळे पालिकेचा पाटोदा साठवणूक तलाव भरून घेण्यात आला आहे. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाºया वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने या धरणात अल्पपाणी साठा जमा झाला असला तरी पाटोदा साठवण तलावातून चार पंपांच्या साहाय्याने पाणी उचलून वागदर्डी धरणात साठवण्यात येत आहे. वागदर्डीमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाल्यानंतर पाणीपुरवठ्याच्या नियोजनात बदल करून दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. यावर्षी सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असला तरी मनमाडकरांवर मात्र पावसाअभावी पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे.मनमाड परिसरात पावसाने दडी मारल्याने पाटोदा साठवण तलावातून वागदर्डी धरणात पाणी घेण्यात येत आहे. येत्या काही दिवसात पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये कपात करण्याचे नियोजन सुरू आहे.- पद्मावती धात्रक,नगराध्यक्ष, मनमाड