शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पंधरा दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:48 IST

मनमाड : पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नद्यांना महापूर आला असला तरी गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईच्या दृष्टचक्रात सापडलेल्या मनमाड परिसरात मात्र केवळ पावसाची बुरबूर सुरू आहे. परिसरात अद्यापही जोरदार पावसाचे आगमन झाले नसल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. परिणामी मनमाडकरांना १२ ते १४ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने ऐन पावसाळ्यातही मनमाडकर तहाणलेलेच आहेत.

ठळक मुद्दे येत्या काही दिवसात पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये कपात करण्याचे नियोजन सुरू

 

मनमाडकर तहानलेलेच । ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती

गिरीश जोशी

मनमाड : पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नद्यांना महापूर आला असला तरी गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईच्या दृष्टचक्रात सापडलेल्या मनमाड परिसरात मात्र केवळ पावसाची बुरबूर सुरू आहे. परिसरात अद्यापही जोरदार पावसाचे आगमन झाले नसल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. परिणामी मनमाडकरांना १२ ते १४ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने ऐन पावसाळ्यातही मनमाडकर तहाणलेलेच आहेत.सध्या जिल्ह्यासह सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. नदीनाल्यांना महापूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाअभावी तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे होरपळलेल्या जनतेला आणि बळीराजाला यावर्षी दिलासा मिळणार अशी आशा वाटत असतानाच पावसाने पाठ फिरवल्याने सर्वांचाच भ्रमनिरास झाला. मनमाड शहराची पाणीटंचाईच्या संकटातून अजूनही सुटका झालेली नाही. आजही शहरातील अनेक भागांना १२ ते १४ दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील कूपनलिका व विहिरी कोरड्या असल्याने पाण्याची शोधाशोध करावी लागत आहे. मनमाड शहरातील पाणीटंचाईचे भोग अजूनही संपलेले नाहीत. तालुक्यात काही भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला असला तरी शहरासह पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पानलोटक्षेत्रामध्ये पाऊस झालाच नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून सर्वत्र पावसाने हाहाकार उडाला असला तरी मनमाड परिसरात मात्र पावसाची बुुरबूर सुरू आहे. परिणामी पडत्या पावसातही मनमाडकरांच्या नशिबी पाणीटंचाईचा फेरा आहे तसाच कायम आहे. पावसाअभावी विहिीरींना अद्याप पाणी आलेले नसल्याने परिसरातील शेतकरीसुद्धा हवालदिल झाला आहे. परिसर सध्या जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.पालखेड धरणातून मुबलक प्रमाणात मिळणाºया पूरपाण्यामुळे पालिकेचा पाटोदा साठवणूक तलाव भरून घेण्यात आला आहे. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाºया वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने या धरणात अल्पपाणी साठा जमा झाला असला तरी पाटोदा साठवण तलावातून चार पंपांच्या साहाय्याने पाणी उचलून वागदर्डी धरणात साठवण्यात येत आहे. वागदर्डीमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाल्यानंतर पाणीपुरवठ्याच्या नियोजनात बदल करून दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. यावर्षी सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असला तरी मनमाडकरांवर मात्र पावसाअभावी पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे.मनमाड परिसरात पावसाने दडी मारल्याने पाटोदा साठवण तलावातून वागदर्डी धरणात पाणी घेण्यात येत आहे. येत्या काही दिवसात पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये कपात करण्याचे नियोजन सुरू आहे.- पद्मावती धात्रक,नगराध्यक्ष, मनमाड