शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

कांदयामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 18:07 IST

खमताणे : कसमादे पट्यातील यावर्षी उन्हाळी कांदयाचे भरघोस उत्पादन आले होते. मात्र, सध्या कांदयाला अत्यल्प भाव मिळत असुन, भावात मोठी घसरण सुरू झाल्याने शेतकºयांच्या डाळ्यात पाणी आले आहे. यावर्षी कांदयाला चांगला भाव मिळेल म्हणून शेतकºयांनी आठ ते दहा महिने चाळींमध्ये कांदा साठवुन ठेवला होता. सात आठ महिन्यात काही ठराविक कालावधी वगळता यावर्षी उन्हाळी कांध्याला अत्यल्प भाव मिळत असुन, साठवुन ठेवलेला कांदा फुकट देण्याची वेळ शेतकºयांवर येवून ठेपली आहे.

ठळक मुद्देकसमादे पट्यातील विदारक चित्र; शासनाने हमीभाव देण्याची मागणी

खमताणे : कसमादे पट्यातील यावर्षी उन्हाळी कांदयाचे भरघोस उत्पादन आले होते. मात्र, सध्या कांदयाला अत्यल्प भाव मिळत असुन, भावात मोठी घसरण सुरू झाल्याने शेतकºयांच्या डाळ्यात पाणी आले आहे. यावर्षी कांदयाला चांगला भाव मिळेल म्हणून शेतकºयांनी आठ ते दहा महिने चाळींमध्ये कांदा साठवुन ठेवला होता. सात आठ महिन्यात काही ठराविक कालावधी वगळता यावर्षी उन्हाळी कांध्याला अत्यल्प भाव मिळत असुन, साठवुन ठेवलेला कांदा फुकट देण्याची वेळ शेतकºयांवर येवून ठेपली आहे.काही शेतकºयांनी तर कांद्याचे फुकट वाटप केला. शेतकºयांच्या उन्हाळी कादयांला आज कमीत कमी १०० ते सरासरी २०० ते ३०० रु पये भाव मिळत आहे. त्या भावात शेतकºयांचे ट्रॉली भाडे, हमाली खर्च, कांदा उत्पादन घेण्यासाठी झालेला खर्च यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाळा कांदा विक्री करण्यासाठी जात असलेल्या शेतकºयांना निराशेने घरी परतावे लागत आहे.यावर्षी सर्व पिकांना अत्यल्प भाव मिळाल्याने बळीराजाने डोळ्यातुन पाणी काढले आहे. कांदयाच्या भावात सध्या मोठी घसरण सुरू असल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्च ही फिटत नसल्याने कसमादे पट्यातील सर्वच शेतकरी हतबल झाले आहेत.सत्तेच्या आर्थिक संकटामूळे व नैसर्गिक आपत्तीमुळे होरपळून निघणाºया कष्टकरी वर्गाला नेहमीच कोणत्या कारणाने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कधी बदलणाºया हवामानाशी दोन हात करूनही आज बाजारात मिळणाºया मातीमोल भावामुळे शेतकºयांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होण्याचे नाव घेत नाही. चालू वर्षीचा खरीप हंगाम खराब हवामानामुळे वाया गेला होता. रब्बीच बदलत्या हवामानाबरोबरच बाजारात सध्या मिळत असलेल्या शेतकºयांच्या पिकांना अत्यल्प भाव मिळत आहे. त्यामुळे कसमादे पट्यातील शेतकरी पूर्णत: आर्थिक व मानसिक विवंचनेत सापडला आहे.सध्या अनेक शेतकºयांचा कांदा चाळीमध्ये पडून आहे. तर काही शेतकºयांचा लाल कांदा शेतामध्ये पडला आहे.उन्हाळ कांदयाला १०० ते ३०० रूपयांपर्यत भाव मिळत आहे. त्यामुळे झालेला खर्च वसूल होत नसल्याने शेतकºयांनी यापुढे झालेला खर्च वसुल होत नसल्याने शेतकºयांनी यापुढे काय नियोजन करावे, या अवस्थेत शेतकरी बांधव सापडला आहे.उन्हाळी कांदयाला यावर्षी चांगल्या प्रकारे भाव मिळेल, या अपेक्षेने साठवलेल्या उन्हाळा कांदया पाठोपाठ लाल कांदयाचीही हीच अवस्था सध्या झाली आहे. यावर्षी सुरूवातीपासूनच कांदयाला कमी भाव आहे. तसेच टोमॅटो उत्पादक शेतकºयांनाही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .शेतकºयांचे स्वप्न भंगले :यावर्षी उन्हाळा कांदयाचे उत्पादन चांगले झाले. त्या कांदयाच्या उत्पादनातुन आपल्याला कर्ज फेडता येईल, असे जिल्ह्यातील शेतकºयांना वाटत होते, मात्र गेल्या महिन्यापासून शेतकºयांकडे असलेल्या शिल्लक उन्हाळी कांदयाला हवा तसा भाव मिळालाच नाही. कांदयाला योग्य भाव नसल्याने अनेक शेतकºयांचे स्वप्न भंग पावले आहे.(फोटो ०८ खमताण)े चाळीमध्ये साठवुन ठेवलेला खराब झालेला कांदा.