खमताणे : कसमादे पट्यातील यावर्षी उन्हाळी कांदयाचे भरघोस उत्पादन आले होते. मात्र, सध्या कांदयाला अत्यल्प भाव मिळत असुन, भावात मोठी घसरण सुरू झाल्याने शेतकºयांच्या डाळ्यात पाणी आले आहे. यावर्षी कांदयाला चांगला भाव मिळेल म्हणून शेतकºयांनी आठ ते दहा महिने चाळींमध्ये कांदा साठवुन ठेवला होता. सात आठ महिन्यात काही ठराविक कालावधी वगळता यावर्षी उन्हाळी कांध्याला अत्यल्प भाव मिळत असुन, साठवुन ठेवलेला कांदा फुकट देण्याची वेळ शेतकºयांवर येवून ठेपली आहे.काही शेतकºयांनी तर कांद्याचे फुकट वाटप केला. शेतकºयांच्या उन्हाळी कादयांला आज कमीत कमी १०० ते सरासरी २०० ते ३०० रु पये भाव मिळत आहे. त्या भावात शेतकºयांचे ट्रॉली भाडे, हमाली खर्च, कांदा उत्पादन घेण्यासाठी झालेला खर्च यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाळा कांदा विक्री करण्यासाठी जात असलेल्या शेतकºयांना निराशेने घरी परतावे लागत आहे.यावर्षी सर्व पिकांना अत्यल्प भाव मिळाल्याने बळीराजाने डोळ्यातुन पाणी काढले आहे. कांदयाच्या भावात सध्या मोठी घसरण सुरू असल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्च ही फिटत नसल्याने कसमादे पट्यातील सर्वच शेतकरी हतबल झाले आहेत.सत्तेच्या आर्थिक संकटामूळे व नैसर्गिक आपत्तीमुळे होरपळून निघणाºया कष्टकरी वर्गाला नेहमीच कोणत्या कारणाने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कधी बदलणाºया हवामानाशी दोन हात करूनही आज बाजारात मिळणाºया मातीमोल भावामुळे शेतकºयांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होण्याचे नाव घेत नाही. चालू वर्षीचा खरीप हंगाम खराब हवामानामुळे वाया गेला होता. रब्बीच बदलत्या हवामानाबरोबरच बाजारात सध्या मिळत असलेल्या शेतकºयांच्या पिकांना अत्यल्प भाव मिळत आहे. त्यामुळे कसमादे पट्यातील शेतकरी पूर्णत: आर्थिक व मानसिक विवंचनेत सापडला आहे.सध्या अनेक शेतकºयांचा कांदा चाळीमध्ये पडून आहे. तर काही शेतकºयांचा लाल कांदा शेतामध्ये पडला आहे.उन्हाळ कांदयाला १०० ते ३०० रूपयांपर्यत भाव मिळत आहे. त्यामुळे झालेला खर्च वसूल होत नसल्याने शेतकºयांनी यापुढे झालेला खर्च वसुल होत नसल्याने शेतकºयांनी यापुढे काय नियोजन करावे, या अवस्थेत शेतकरी बांधव सापडला आहे.उन्हाळी कांदयाला यावर्षी चांगल्या प्रकारे भाव मिळेल, या अपेक्षेने साठवलेल्या उन्हाळा कांदया पाठोपाठ लाल कांदयाचीही हीच अवस्था सध्या झाली आहे. यावर्षी सुरूवातीपासूनच कांदयाला कमी भाव आहे. तसेच टोमॅटो उत्पादक शेतकºयांनाही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .शेतकºयांचे स्वप्न भंगले :यावर्षी उन्हाळा कांदयाचे उत्पादन चांगले झाले. त्या कांदयाच्या उत्पादनातुन आपल्याला कर्ज फेडता येईल, असे जिल्ह्यातील शेतकºयांना वाटत होते, मात्र गेल्या महिन्यापासून शेतकºयांकडे असलेल्या शिल्लक उन्हाळी कांदयाला हवा तसा भाव मिळालाच नाही. कांदयाला योग्य भाव नसल्याने अनेक शेतकºयांचे स्वप्न भंग पावले आहे.(फोटो ०८ खमताण)े चाळीमध्ये साठवुन ठेवलेला खराब झालेला कांदा.
कांदयामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 18:07 IST
खमताणे : कसमादे पट्यातील यावर्षी उन्हाळी कांदयाचे भरघोस उत्पादन आले होते. मात्र, सध्या कांदयाला अत्यल्प भाव मिळत असुन, भावात मोठी घसरण सुरू झाल्याने शेतकºयांच्या डाळ्यात पाणी आले आहे. यावर्षी कांदयाला चांगला भाव मिळेल म्हणून शेतकºयांनी आठ ते दहा महिने चाळींमध्ये कांदा साठवुन ठेवला होता. सात आठ महिन्यात काही ठराविक कालावधी वगळता यावर्षी उन्हाळी कांध्याला अत्यल्प भाव मिळत असुन, साठवुन ठेवलेला कांदा फुकट देण्याची वेळ शेतकºयांवर येवून ठेपली आहे.
कांदयामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!
ठळक मुद्देकसमादे पट्यातील विदारक चित्र; शासनाने हमीभाव देण्याची मागणी