शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

आडवाडीत लोकसहभागातून केले जलसंवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:15 IST

आडवाडी येथे युवामित्रच्या सहकार्यातून ग्रामविकास समिती व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या बंधाऱ्यातील १० हजार २७५ घनमीटर गाळ उपसण्यात आला. या कामामुळे बंधाºयातील जलसाठा १.०२८ कोटी लिटरने वाढणार असल्याने येथील पिण्याच्या तसेच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

ठळक मुद्देयुवामित्रचे सहकार्य : तीन वाड्यांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

सिन्नर : तालुक्यातील आडवाडी येथे युवामित्रच्या सहकार्यातून ग्रामविकास समिती व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या बंधाऱ्यातील १० हजार २७५ घनमीटर गाळ उपसण्यात आला. या कामामुळे बंधाºयातील जलसाठा १.०२८ कोटी लिटरने वाढणार असल्याने येथील पिण्याच्या तसेच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.आडवाडी गावातील तीन वाड्यांमध्ये १९१ कुटुंबे वास्तव्यास आहेत. तीनही वाड्यांना प्रत्येकी एक एक पाझर तलाव आहे. या पाझर तलावातही गाळ व दगड, गोटे साचले होते त्यामुळे बंधाºयाची पाणी साठवणक्षमता कमी झाली होती.शेतकरी डोंगळे टाकून पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर करीत होते. युवामित्र गावात राबवत असलेल्या देवनदी पुनर्जीवन कार्यक्र मांतर्गत गावात अडूआई माता ग्रामविकास समिती तयार करण्यात आली आहे.या समितीच्या मासिक बैठकीमध्ये सदस्यांकडून बंधाºयातील गाळ उपसा व गळतीचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा केली. गावकऱ्यांच्या माध्यमातून बंधाºयातील गाळ वाहून नेणे व भिंतीच्या पिचिंगसाठी १ लाख २० हजार रु पयांचा निधी जमा केला व युवामित्रने दि नेचर कॉन्झर्वन्सी इंडिया या संस्थेच्या मदतीने पोकलॅन मशीन व डिझेल उपलब्ध करून दिले. लोकसहभागातून झालेल्या या जलसंवर्धनामुळे गावातील तीनही वाड्यांतील ११९५ लोक व १२५० जनावरांचा पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होईल तसेच १५० एकरवरील भात पिकाला पाणी देता येईल. तसेच बंधाºयात केला जाणारा मासेमारी व्यवसाय लिलाव पद्धतीने दिल्याने त्याचा अतिरिक्त महसूल ग्रामपंचायतीला मिळेल. त्याचबरोबर गावाच्या खालच्या वाडीत ५ हेक्टर क्षेत्रावर सलग समतल चरचे काम सुरू आहे. त्याच्या माध्यमातून डोंगरउतारावरून वाहून जाणाºया मातीची धूप थांबेल व त्यावर वृृक्षारोपणातून वनराई फुलवण्याचा गावकºयांचा मानस आहे.मे महिन्यात ग्रामस्थ व युवामित्र प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला. बंधाºयात १६ दिवस पोकलॅन मशीनने गाळ उपसा केला. काढलेला गाळ २० शेतकºयांनी स्वखर्चाने ट्रॅक्टर व डंपरच्या साहाय्याने खडकाळ जमिनीवर टाकून एकर क्षेत्र पीक लागवडयोग्य केले व बंधाºयात वाहून आलेल्या दगडगोटे व शेतात टाकण्यास योग्य नसणारी माती वापरून दोन शेततळे आणि १० एकराची बांध बंदिस्ती केली. त्यामुळे येथील तीन वाड्यांतील रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकWaterपाणी