शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आडवाडीत लोकसहभागातून केले जलसंवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:15 IST

आडवाडी येथे युवामित्रच्या सहकार्यातून ग्रामविकास समिती व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या बंधाऱ्यातील १० हजार २७५ घनमीटर गाळ उपसण्यात आला. या कामामुळे बंधाºयातील जलसाठा १.०२८ कोटी लिटरने वाढणार असल्याने येथील पिण्याच्या तसेच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

ठळक मुद्देयुवामित्रचे सहकार्य : तीन वाड्यांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

सिन्नर : तालुक्यातील आडवाडी येथे युवामित्रच्या सहकार्यातून ग्रामविकास समिती व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या बंधाऱ्यातील १० हजार २७५ घनमीटर गाळ उपसण्यात आला. या कामामुळे बंधाºयातील जलसाठा १.०२८ कोटी लिटरने वाढणार असल्याने येथील पिण्याच्या तसेच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.आडवाडी गावातील तीन वाड्यांमध्ये १९१ कुटुंबे वास्तव्यास आहेत. तीनही वाड्यांना प्रत्येकी एक एक पाझर तलाव आहे. या पाझर तलावातही गाळ व दगड, गोटे साचले होते त्यामुळे बंधाºयाची पाणी साठवणक्षमता कमी झाली होती.शेतकरी डोंगळे टाकून पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर करीत होते. युवामित्र गावात राबवत असलेल्या देवनदी पुनर्जीवन कार्यक्र मांतर्गत गावात अडूआई माता ग्रामविकास समिती तयार करण्यात आली आहे.या समितीच्या मासिक बैठकीमध्ये सदस्यांकडून बंधाºयातील गाळ उपसा व गळतीचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा केली. गावकऱ्यांच्या माध्यमातून बंधाºयातील गाळ वाहून नेणे व भिंतीच्या पिचिंगसाठी १ लाख २० हजार रु पयांचा निधी जमा केला व युवामित्रने दि नेचर कॉन्झर्वन्सी इंडिया या संस्थेच्या मदतीने पोकलॅन मशीन व डिझेल उपलब्ध करून दिले. लोकसहभागातून झालेल्या या जलसंवर्धनामुळे गावातील तीनही वाड्यांतील ११९५ लोक व १२५० जनावरांचा पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होईल तसेच १५० एकरवरील भात पिकाला पाणी देता येईल. तसेच बंधाºयात केला जाणारा मासेमारी व्यवसाय लिलाव पद्धतीने दिल्याने त्याचा अतिरिक्त महसूल ग्रामपंचायतीला मिळेल. त्याचबरोबर गावाच्या खालच्या वाडीत ५ हेक्टर क्षेत्रावर सलग समतल चरचे काम सुरू आहे. त्याच्या माध्यमातून डोंगरउतारावरून वाहून जाणाºया मातीची धूप थांबेल व त्यावर वृृक्षारोपणातून वनराई फुलवण्याचा गावकºयांचा मानस आहे.मे महिन्यात ग्रामस्थ व युवामित्र प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला. बंधाºयात १६ दिवस पोकलॅन मशीनने गाळ उपसा केला. काढलेला गाळ २० शेतकºयांनी स्वखर्चाने ट्रॅक्टर व डंपरच्या साहाय्याने खडकाळ जमिनीवर टाकून एकर क्षेत्र पीक लागवडयोग्य केले व बंधाºयात वाहून आलेल्या दगडगोटे व शेतात टाकण्यास योग्य नसणारी माती वापरून दोन शेततळे आणि १० एकराची बांध बंदिस्ती केली. त्यामुळे येथील तीन वाड्यांतील रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकWaterपाणी