शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आडवाडीत लोकसहभागातून केले जलसंवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:15 IST

आडवाडी येथे युवामित्रच्या सहकार्यातून ग्रामविकास समिती व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या बंधाऱ्यातील १० हजार २७५ घनमीटर गाळ उपसण्यात आला. या कामामुळे बंधाºयातील जलसाठा १.०२८ कोटी लिटरने वाढणार असल्याने येथील पिण्याच्या तसेच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

ठळक मुद्देयुवामित्रचे सहकार्य : तीन वाड्यांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

सिन्नर : तालुक्यातील आडवाडी येथे युवामित्रच्या सहकार्यातून ग्रामविकास समिती व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या बंधाऱ्यातील १० हजार २७५ घनमीटर गाळ उपसण्यात आला. या कामामुळे बंधाºयातील जलसाठा १.०२८ कोटी लिटरने वाढणार असल्याने येथील पिण्याच्या तसेच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.आडवाडी गावातील तीन वाड्यांमध्ये १९१ कुटुंबे वास्तव्यास आहेत. तीनही वाड्यांना प्रत्येकी एक एक पाझर तलाव आहे. या पाझर तलावातही गाळ व दगड, गोटे साचले होते त्यामुळे बंधाºयाची पाणी साठवणक्षमता कमी झाली होती.शेतकरी डोंगळे टाकून पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर करीत होते. युवामित्र गावात राबवत असलेल्या देवनदी पुनर्जीवन कार्यक्र मांतर्गत गावात अडूआई माता ग्रामविकास समिती तयार करण्यात आली आहे.या समितीच्या मासिक बैठकीमध्ये सदस्यांकडून बंधाºयातील गाळ उपसा व गळतीचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा केली. गावकऱ्यांच्या माध्यमातून बंधाºयातील गाळ वाहून नेणे व भिंतीच्या पिचिंगसाठी १ लाख २० हजार रु पयांचा निधी जमा केला व युवामित्रने दि नेचर कॉन्झर्वन्सी इंडिया या संस्थेच्या मदतीने पोकलॅन मशीन व डिझेल उपलब्ध करून दिले. लोकसहभागातून झालेल्या या जलसंवर्धनामुळे गावातील तीनही वाड्यांतील ११९५ लोक व १२५० जनावरांचा पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होईल तसेच १५० एकरवरील भात पिकाला पाणी देता येईल. तसेच बंधाºयात केला जाणारा मासेमारी व्यवसाय लिलाव पद्धतीने दिल्याने त्याचा अतिरिक्त महसूल ग्रामपंचायतीला मिळेल. त्याचबरोबर गावाच्या खालच्या वाडीत ५ हेक्टर क्षेत्रावर सलग समतल चरचे काम सुरू आहे. त्याच्या माध्यमातून डोंगरउतारावरून वाहून जाणाºया मातीची धूप थांबेल व त्यावर वृृक्षारोपणातून वनराई फुलवण्याचा गावकºयांचा मानस आहे.मे महिन्यात ग्रामस्थ व युवामित्र प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला. बंधाºयात १६ दिवस पोकलॅन मशीनने गाळ उपसा केला. काढलेला गाळ २० शेतकºयांनी स्वखर्चाने ट्रॅक्टर व डंपरच्या साहाय्याने खडकाळ जमिनीवर टाकून एकर क्षेत्र पीक लागवडयोग्य केले व बंधाºयात वाहून आलेल्या दगडगोटे व शेतात टाकण्यास योग्य नसणारी माती वापरून दोन शेततळे आणि १० एकराची बांध बंदिस्ती केली. त्यामुळे येथील तीन वाड्यांतील रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकWaterपाणी