शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

दापूर येथे युवा मित्र संस्थेकडून जलसाक्षता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 17:50 IST

सिन्नर : तालुक्यातील लोणारवाडी येथील युवा मित्र या संस्थेच्या वतीने दापूर येथे शेतकऱ्यांसाठी जलसाक्षरता अभियान राबविण्यात आले. सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाने युवा मित्र संस्थेचे तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी ग्रामस्थांना जलसमृद्धी प्रकल्पाद्वारे गावचा विकास कसा करता येईल याबाबत माहिती दिली.

सिन्नर : तालुक्यातील लोणारवाडी येथील युवा मित्र या संस्थेच्या वतीने दापूर येथे शेतकऱ्यांसाठी जलसाक्षरता अभियान राबविण्यात आले. सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाने युवा मित्र संस्थेचे तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी ग्रामस्थांना जलसमृद्धी प्रकल्पाद्वारे गावचा विकास कसा करता येईल याबाबत माहिती दिली.टाटा ट्रस्टच्या सहकार्याने प्रत्येक गावात जलसाक्षरता अभियानाद्वारे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न युवा मित्र या संस्थेकडून केला जात आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत गावातील नदी-नाले व पाझर तलाव यातील गाळ काढण्याची मोहीम राबवून भूजलपातळीत वाढ करण्यावर भर दिला जाणार असल्याचे लोणारे यांनी सांगितले. गावातील शेतकºयांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत मशीन मागणी अर्ज सादर करावयाचा आहे. सदरचा प्रकल्प युवामित्र, महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार आहे. यासाठी संस्थेकडून यंत्रसामुग्री सरकारकडून इंधन खर्च दिला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उपसलेला गाळ शेतकºयांना मोफत मिळणार असून तो त्यांनी स्वत:च्या वाहनाने त्यांच्या शेतात घेऊन जावा. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत नदी-नाले व पाझर तलाव खोली करणामुळे जलसाठ्यात वाढ होईल. युवा मित्र संस्थेचे गाळ काढणे हा काही व्यवसाय नाही तर या काढलेल्या जलस्त्रोतांचे नाला बंधारा यावर पुढे पाणी वापर संस्था स्थापन करणे व त्याचे नियोजन व व्यवस्थापन गावकºयांककडून करून घेणे हा मुख्य उद्देश असल्याचे तालुका समन्वयक लोणारे यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी