शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

दहा दिवसांपासून पाणी बंद

By admin | Updated: February 8, 2017 23:56 IST

पांगरी : मनेगावसह १६ गाव पाणीपुुरवठा योजना अडचणीत

 पांगरी : सिन्नर तालुक्यातील पूर्वर् भागातील अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांगरी गावास गेल्या दहा-बारा दिवसांपासून पिण्याचा पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीच पाणीटंचाईची झळ बसण्यास प्रारंभ झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून पांगरी परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला होता; मात्र गेल्या पाच वर्षांत पाऊस झाला नसल्याने फेबु्रवारी महिन्याच्या प्रारंभीच नदी-नाले व बंधाऱ्यातील पाणी आटले असून, ते कोरडेठाक पडले आहे. गावची सार्वजनिक पाणीपुरवठ्याची विहीर जामनदीच्या पात्रात आहे. या विहिरीनेही तळ गाठला आहे. गेल्या महिन्यात दोन-तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता; मात्र गेल्या दहा-बारा दिवसांपासून नळपाणीपुरवठा योजनेला पाणी न आल्याने ग्रामस्थांना टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेत गावाचा काही भागाचा समावेश करण्यात आला आहे. या भागात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे; मात्र उर्वरित भाग गेल्या दहा ते बारा दिवसांपासून तहानलेला आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने महिला व ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुुरवठा सुरळीत करून पांगरीकरांची टंचाई दूर करण्याची मागणी ग्रामस्थ व महिलांनी केली आहे. (वार्ताहर)