शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

दहा दिवसांपासून पाणी बंद

By admin | Updated: February 8, 2017 23:56 IST

पांगरी : मनेगावसह १६ गाव पाणीपुुरवठा योजना अडचणीत

 पांगरी : सिन्नर तालुक्यातील पूर्वर् भागातील अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांगरी गावास गेल्या दहा-बारा दिवसांपासून पिण्याचा पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीच पाणीटंचाईची झळ बसण्यास प्रारंभ झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून पांगरी परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला होता; मात्र गेल्या पाच वर्षांत पाऊस झाला नसल्याने फेबु्रवारी महिन्याच्या प्रारंभीच नदी-नाले व बंधाऱ्यातील पाणी आटले असून, ते कोरडेठाक पडले आहे. गावची सार्वजनिक पाणीपुरवठ्याची विहीर जामनदीच्या पात्रात आहे. या विहिरीनेही तळ गाठला आहे. गेल्या महिन्यात दोन-तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता; मात्र गेल्या दहा-बारा दिवसांपासून नळपाणीपुरवठा योजनेला पाणी न आल्याने ग्रामस्थांना टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेत गावाचा काही भागाचा समावेश करण्यात आला आहे. या भागात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे; मात्र उर्वरित भाग गेल्या दहा ते बारा दिवसांपासून तहानलेला आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने महिला व ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुुरवठा सुरळीत करून पांगरीकरांची टंचाई दूर करण्याची मागणी ग्रामस्थ व महिलांनी केली आहे. (वार्ताहर)