शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामातही बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:19 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला रब्बी हंगामाबरोबरचं खरीप हंगामातही अनेक संकटाचा व समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे दोन्ही हंगामातील बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. शेतीप्रधान देशात शेतकरी वर्गाला एवढ्या समस्यांना व संकटांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे जगाचा पोशिंदा हतबल झाला आहे.

ठळक मुद्देनिसर्गाची अवकृपा : कांदा संपला अन् भाव वाढला; टमाट्याला सुगीचे दिवस

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला रब्बी हंगामाबरोबरचं खरीप हंगामातही अनेक संकटाचा व समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे दोन्ही हंगामातील बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.शेतीप्रधान देशात शेतकरी वर्गाला एवढ्या समस्यांना व संकटांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे जगाचा पोशिंदा हतबल झाला आहे. प्रत्येक हंगामात आशेवर जगणारा शेतकरी वर्ग दोन्ही हंगामात कोरोना, लॉकडाऊन, वातावरणातील बदल, निसर्गाची अवकृपा आदी संकटानी कसे बाहेर पडता येईल, या विवंचेनत सापडला आहे. द्राक्षे हंगामात पिक चांगले आले पण कोरोनाने तोंडचा घास हिरावून घेतला. द्राक्षे पिक कवडीमोल भावाने विकावे लागले. बेदाणा केला तोही भाव न मिळाल्याने घरात पडून राहिला. जवळचे भांडवल खर्च करून हातात काहीच आले नाही. शेवटी नगदी भांडवल मिळून देणारे पिक म्हणून कांदा पिकांवरील आशा शेतकरी वर्गाला भक्कम आधार देईल अशी अवस्था निर्माण झाली. परंतु कोरोनामुळे कांदाही कवडीमोल भावाने विकावा लागला. यानंतर खरीप हंगामावर अस्मानी व सुलतानी संकटाचा घाला निर्माण झाला. त्यामुळे कांदा पिकाला उतरती कळा लागली. हवामानामुळे काही शेतकरी वर्गाचा कांदा सडून गेला, काहीना मोड फुटले, तर काहीनी सडलेला कांदा फेकून दिला.असे चित्र दिसत असताना कांदा संपण्याच्या मार्गावर असतांना बाजारपेठेत कांदा आवक कमी झाल्याने मागणी वाढली. त्यामुळे कांदा पिकाला भाव वाढत गेला. पण तोपर्यंत शेतकरी वर्गाचा कांदा संपून गेला होता. त्यामुळे मोठ्या मेहनतीने काही शेतकरी वर्गाने कांदा साठवून ठेवला होता. त्यांना फायदा झाला. पण तोपर्यंत भांडवल जास्त प्रमाणात खर्च झाले होते. त्यामुळे याही पिकांने काहींना हसविले तर काहींना रडविले.टमाटे पिकाला पसंती देऊन अनेक कष्टांतुन रोपे उपलब्ध करून टमाटा पिकं घेण्यासाठी मोर्चेबांधणी केली. परंतु वातावरणातील बदल, पावसाचा लहरीपणा यामुळे रोपे खराब झाली. पावसाने टमाटे पिकांना मोठ्या प्रमाणात हादरा बसला. आता टमाटा पिकाला चांगला भाव आहे. परंतु जी सरासरी पाहिजे ती मिळत नसल्याने बळीराजाच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेक महागडे किंमतीचेऔषधांची खरेदी करून जे उत्पन्न पाहिजे ते मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी