शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

खरीप हंगामातही बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:19 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला रब्बी हंगामाबरोबरचं खरीप हंगामातही अनेक संकटाचा व समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे दोन्ही हंगामातील बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. शेतीप्रधान देशात शेतकरी वर्गाला एवढ्या समस्यांना व संकटांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे जगाचा पोशिंदा हतबल झाला आहे.

ठळक मुद्देनिसर्गाची अवकृपा : कांदा संपला अन् भाव वाढला; टमाट्याला सुगीचे दिवस

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला रब्बी हंगामाबरोबरचं खरीप हंगामातही अनेक संकटाचा व समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे दोन्ही हंगामातील बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.शेतीप्रधान देशात शेतकरी वर्गाला एवढ्या समस्यांना व संकटांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे जगाचा पोशिंदा हतबल झाला आहे. प्रत्येक हंगामात आशेवर जगणारा शेतकरी वर्ग दोन्ही हंगामात कोरोना, लॉकडाऊन, वातावरणातील बदल, निसर्गाची अवकृपा आदी संकटानी कसे बाहेर पडता येईल, या विवंचेनत सापडला आहे. द्राक्षे हंगामात पिक चांगले आले पण कोरोनाने तोंडचा घास हिरावून घेतला. द्राक्षे पिक कवडीमोल भावाने विकावे लागले. बेदाणा केला तोही भाव न मिळाल्याने घरात पडून राहिला. जवळचे भांडवल खर्च करून हातात काहीच आले नाही. शेवटी नगदी भांडवल मिळून देणारे पिक म्हणून कांदा पिकांवरील आशा शेतकरी वर्गाला भक्कम आधार देईल अशी अवस्था निर्माण झाली. परंतु कोरोनामुळे कांदाही कवडीमोल भावाने विकावा लागला. यानंतर खरीप हंगामावर अस्मानी व सुलतानी संकटाचा घाला निर्माण झाला. त्यामुळे कांदा पिकाला उतरती कळा लागली. हवामानामुळे काही शेतकरी वर्गाचा कांदा सडून गेला, काहीना मोड फुटले, तर काहीनी सडलेला कांदा फेकून दिला.असे चित्र दिसत असताना कांदा संपण्याच्या मार्गावर असतांना बाजारपेठेत कांदा आवक कमी झाल्याने मागणी वाढली. त्यामुळे कांदा पिकाला भाव वाढत गेला. पण तोपर्यंत शेतकरी वर्गाचा कांदा संपून गेला होता. त्यामुळे मोठ्या मेहनतीने काही शेतकरी वर्गाने कांदा साठवून ठेवला होता. त्यांना फायदा झाला. पण तोपर्यंत भांडवल जास्त प्रमाणात खर्च झाले होते. त्यामुळे याही पिकांने काहींना हसविले तर काहींना रडविले.टमाटे पिकाला पसंती देऊन अनेक कष्टांतुन रोपे उपलब्ध करून टमाटा पिकं घेण्यासाठी मोर्चेबांधणी केली. परंतु वातावरणातील बदल, पावसाचा लहरीपणा यामुळे रोपे खराब झाली. पावसाने टमाटे पिकांना मोठ्या प्रमाणात हादरा बसला. आता टमाटा पिकाला चांगला भाव आहे. परंतु जी सरासरी पाहिजे ती मिळत नसल्याने बळीराजाच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेक महागडे किंमतीचेऔषधांची खरेदी करून जे उत्पन्न पाहिजे ते मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी