शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

खरीप हंगामातही बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:19 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला रब्बी हंगामाबरोबरचं खरीप हंगामातही अनेक संकटाचा व समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे दोन्ही हंगामातील बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. शेतीप्रधान देशात शेतकरी वर्गाला एवढ्या समस्यांना व संकटांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे जगाचा पोशिंदा हतबल झाला आहे.

ठळक मुद्देनिसर्गाची अवकृपा : कांदा संपला अन् भाव वाढला; टमाट्याला सुगीचे दिवस

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला रब्बी हंगामाबरोबरचं खरीप हंगामातही अनेक संकटाचा व समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे दोन्ही हंगामातील बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.शेतीप्रधान देशात शेतकरी वर्गाला एवढ्या समस्यांना व संकटांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे जगाचा पोशिंदा हतबल झाला आहे. प्रत्येक हंगामात आशेवर जगणारा शेतकरी वर्ग दोन्ही हंगामात कोरोना, लॉकडाऊन, वातावरणातील बदल, निसर्गाची अवकृपा आदी संकटानी कसे बाहेर पडता येईल, या विवंचेनत सापडला आहे. द्राक्षे हंगामात पिक चांगले आले पण कोरोनाने तोंडचा घास हिरावून घेतला. द्राक्षे पिक कवडीमोल भावाने विकावे लागले. बेदाणा केला तोही भाव न मिळाल्याने घरात पडून राहिला. जवळचे भांडवल खर्च करून हातात काहीच आले नाही. शेवटी नगदी भांडवल मिळून देणारे पिक म्हणून कांदा पिकांवरील आशा शेतकरी वर्गाला भक्कम आधार देईल अशी अवस्था निर्माण झाली. परंतु कोरोनामुळे कांदाही कवडीमोल भावाने विकावा लागला. यानंतर खरीप हंगामावर अस्मानी व सुलतानी संकटाचा घाला निर्माण झाला. त्यामुळे कांदा पिकाला उतरती कळा लागली. हवामानामुळे काही शेतकरी वर्गाचा कांदा सडून गेला, काहीना मोड फुटले, तर काहीनी सडलेला कांदा फेकून दिला.असे चित्र दिसत असताना कांदा संपण्याच्या मार्गावर असतांना बाजारपेठेत कांदा आवक कमी झाल्याने मागणी वाढली. त्यामुळे कांदा पिकाला भाव वाढत गेला. पण तोपर्यंत शेतकरी वर्गाचा कांदा संपून गेला होता. त्यामुळे मोठ्या मेहनतीने काही शेतकरी वर्गाने कांदा साठवून ठेवला होता. त्यांना फायदा झाला. पण तोपर्यंत भांडवल जास्त प्रमाणात खर्च झाले होते. त्यामुळे याही पिकांने काहींना हसविले तर काहींना रडविले.टमाटे पिकाला पसंती देऊन अनेक कष्टांतुन रोपे उपलब्ध करून टमाटा पिकं घेण्यासाठी मोर्चेबांधणी केली. परंतु वातावरणातील बदल, पावसाचा लहरीपणा यामुळे रोपे खराब झाली. पावसाने टमाटे पिकांना मोठ्या प्रमाणात हादरा बसला. आता टमाटा पिकाला चांगला भाव आहे. परंतु जी सरासरी पाहिजे ती मिळत नसल्याने बळीराजाच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेक महागडे किंमतीचेऔषधांची खरेदी करून जे उत्पन्न पाहिजे ते मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी