शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

वटारला टँकरखाली सापडून मुलगा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:52 IST

वीरगाव : बागलाण तालुक्यातील वटार येथे पाण्याच्या टँकरखाली सापडून अकरा वर्षांचा मुलगा ठार झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि.६) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. मृत अक्षय नंदू गांगुर्डे (११) हा वीरगाव येथील रहिवासी आहे.

ठळक मुद्देनिरागस बळी जाण्याची दुर्दैवी घटना

वीरगाव : बागलाण तालुक्यातील वटार येथे पाण्याच्या टँकरखाली सापडून अकरा वर्षांचा मुलगा ठार झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि.६) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. मृत अक्षय नंदू गांगुर्डे (११) हा वीरगाव येथील रहिवासी आहे.वीरगाव येथील हिरामण भिला गांगुर्डे यांचा नातू अक्षय नंदू गांगुर्डे (११) हा गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आपल्या वडिलांसमवेत वटार येथे नातेवाइकांकडे पाण्याचे टँकर भरण्यासाठी गेला होता. टँकर भरून परत येत असताना एका अवघड वळणावर अक्षयचा तोल गेल्याने तो खाली पडला. याचवेळी त्याच्या अंगावरून चाक तो जागीच ठार झाला. शोकाकुल वातावरणात मृत अक्षयवर सकाळी ९ वाजेच्या सुमारास वीरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.नंदू गांगुर्डे यांना तीन मुलं असून, अक्षय हा यात सगळ्यात लहान होता. येथील केबीएच विद्यालयात तो शिक्षण घेत होता. नुकतीच त्याने पाचवीची परीक्षा देऊन त्यात तो उत्तीर्ण झाला होता. या घटनेने संपूर्ण वीरगाव गावावर शोककळा पसरली आहे. सटाणा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सद्यस्थितीत वीरगाव या गावातील सुमारे वीस ते पंचवीस टँकरधारक शेतकरी परिसरातील वटार, दसाणा, केरसाणे या गावातून टँकरने पाणी आणून आपली शेती वाचविताना दिसत आहेत; मात्र हीच जीवघेणी पाणीटंचाई आता थेट मानवी जिवावरच उठली असून, यातूनच टँकरचा तालुक्यातील पहिलावहिला निरागस बळी जाण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.