शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, कधीपासून रंगणार 'रन'संग्राम? जाणून घ्या
4
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
7
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
8
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
9
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
10
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
11
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
12
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
13
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
15
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
16
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
17
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
18
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
19
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
20
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार

वाळूजला भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 00:54 IST

वाळूज महानगर : वाळूज गावातील नवीन वसाहतीमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

वाळूज महानगर : वाळूज गावातील नवीन वसाहतीमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायत कर्मचारी कुणालाही जुमानत नसल्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाणीपुरवठ्याची तक्रार करणाऱ्या तक्रारदारास सरपंच टँकरचे पोकळ आश्वासन देऊन बोळवण करीत असल्यामुळे नागरिकांत नाराजी आहे.वाळूज गावात चार महिन्यांपासून पाणीटंचाई आहे. गावातील पाणीपुरवठ्याचे कुठलेही वेळापत्रक नसल्यामुळे महिला व नागरिकांना नळाला पाणी येण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. सद्यस्थितीत शिवाजीनगर, दत्त कॉलनी, श्रद्धा कॉलनी, श्रीराम कॉलनी इ. वसाहतींमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडे सतत तक्रारी करूनही नागरिकांची दिशाभूल करून वीजपुरवठा बंद होता, पाईपलाईन फुटली इ. कारणे दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यही फारसे स्वारस्य दाखवीत नाहीत. सध्या गावात पाच टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ग्रामपंचायतीच्या वतीने जवळपास ५ लाख रुपये खर्च करून विहीर दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. पुरेसे पाणी असतानाही केवळ कर्मचाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराया विषयी ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे म्हणाले की, गावातील अनेक भागांत पंधरा-पंधरा दिवस पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.पाणीपुरवठ्याची जबाबदारी असणारे कर्मचारी कामचुकारपणा करीत असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आदेशही पाळत नसल्यामुळे या दोषी कर्मचाऱ्यांना तंबी देण्यात आली आहे. पाणीपुरवठ्या संदर्भात तक्रारी आल्यास संबधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.