शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
7
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
8
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
9
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
10
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
11
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
12
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
13
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
14
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
15
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
16
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
17
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
19
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
20
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

वाळूजला भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 00:54 IST

वाळूज महानगर : वाळूज गावातील नवीन वसाहतीमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

वाळूज महानगर : वाळूज गावातील नवीन वसाहतीमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायत कर्मचारी कुणालाही जुमानत नसल्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाणीपुरवठ्याची तक्रार करणाऱ्या तक्रारदारास सरपंच टँकरचे पोकळ आश्वासन देऊन बोळवण करीत असल्यामुळे नागरिकांत नाराजी आहे.वाळूज गावात चार महिन्यांपासून पाणीटंचाई आहे. गावातील पाणीपुरवठ्याचे कुठलेही वेळापत्रक नसल्यामुळे महिला व नागरिकांना नळाला पाणी येण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. सद्यस्थितीत शिवाजीनगर, दत्त कॉलनी, श्रद्धा कॉलनी, श्रीराम कॉलनी इ. वसाहतींमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडे सतत तक्रारी करूनही नागरिकांची दिशाभूल करून वीजपुरवठा बंद होता, पाईपलाईन फुटली इ. कारणे दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यही फारसे स्वारस्य दाखवीत नाहीत. सध्या गावात पाच टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ग्रामपंचायतीच्या वतीने जवळपास ५ लाख रुपये खर्च करून विहीर दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. पुरेसे पाणी असतानाही केवळ कर्मचाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराया विषयी ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे म्हणाले की, गावातील अनेक भागांत पंधरा-पंधरा दिवस पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.पाणीपुरवठ्याची जबाबदारी असणारे कर्मचारी कामचुकारपणा करीत असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आदेशही पाळत नसल्यामुळे या दोषी कर्मचाऱ्यांना तंबी देण्यात आली आहे. पाणीपुरवठ्या संदर्भात तक्रारी आल्यास संबधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.