शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

यंदा आषाढीवारी चुकणार असल्याने वारकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 19:32 IST

नांदूरशिंगोटे : आषाढी एकादशी जवळ आली की वारकर्यांना वेध लागतात विठुरायाच्या पंढरीचे. आषाढीच्या मिहनाभर अगोदर सिन्नर तालुक्यातील हजारो वारकर्यांची ...

ठळक मुद्देकोरोनामुळे पंरपरा खंडित : घरी थांबूनच धार्मिक कार्यक्र म

नांदूरशिंगोटे : आषाढी एकादशी जवळ आली की वारकर्यांना वेध लागतात विठुरायाच्या पंढरीचे. आषाढीच्या मिहनाभर अगोदर सिन्नर तालुक्यातील हजारो वारकर्यांची पाऊले पंढरीच्या वाटेवर चालू लागतात. मात्र, यावर्षी कोरोनाने ही पावले थबकली आहे. एकादशी 15 दिवसावर असताना पंढरीची वाट सुनी सुनी लागत आहे. त्यामुळे अनेक जुन्या जाणत्या वारकर्यांनी घरीच आषाढी वारी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोनाच्या पाशर््वभूमीवर वर्षानुवर्षे चालत आलेली पंढरपूर येथील आषाढी यात्रा यावर्षी थांबवण्यात आली. तालुक्यातील पिढ्यानिपढ्या जाणार्या वारकर्यांची परंपरा कोरोनामुळे खंडित झाली आहे. वारी चुकणार म्हणून अनेक वारकरी भाऊक झाले असल्याचे चित्र गावागावात भाविकांमध्ये दिसत आहेत. अनेक तपापासून ऊन, वारा व पावसाची तमा न करता व वय न पाहता पळत सुटणार्यांना पंढरीची वारी चुकल्याने गिहवरून येते आहे. पंढरीला जाण्याची आस त्यांच्या मनात लागलेली आहे. दरवर्षी तालुक्यातील पंधरा ते वीस हजार भाविक वेगवेगळ्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. तसेच तालुक्यातील पाच ते सहा दिंड्या स्वतंत्रपणे आषाढी एकादशी जात असतात. दर मिहन्याच्या एकादशीला पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणार्या वारकर्यांची संख्याही मोठी आहे. सिन्नर तालुक्यातून जाणार्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा जात नसल्याने पालखी मार्गावरील टाळ मृदंगाचा व हरिनामाचा जयघोष दिसून आला नाही.चौकट....कोरोना महामारी ही देशावर एक नैसिर्गक आपत्ती आली असल्याने पंढरपूरची पायी वारी रद्द करण्यात आली आहे. गेल्या 45 वर्षापासून संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभाग असायचा. आयुष्यात पिहल्यांदाच आषाढी एकादशीच्या वारीला मुकावे लागले आहे. निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात रथापुढे 3 नंबर आमच्या दिंडीचा असायचा. आषाढी एकादशी पर्यंत दररोज अभिषेक, पूजा, हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्र म घरीच केले जात आहेत. घरीच राहून पांडुरंगाचे नामस्मरण केले जात आहे.- एकनाथ महाराज गोळेसर.चौकट....सिन्नर तालुक्यातुन आषाढी वारीसाठी दरवर्षी हजारो भाविक पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होतात. तसेच काही वारकरी त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज व आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातही सहभागी होतात. पंरतु यावर्षी कोरोनाच्या पाश्वभूमीवर पायी दिंडी सोहळा बंद आहे. त्यामुळे वारकर्यांना सहभागी होता न आल्याने मनामध्ये दु:ख आहे. त्यामुळे यावर्षी घरी थांबूनच सर्व धार्मिक कार्यक्र म करणार आहेत.- कैलास महाराज तांबे, अध्यक्ष, सिन्नर तालुका वारकरी मंडळ.(फोटो १८ तांबे. १८गोळेसर)