शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

न्यायडोंगरीत पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:39 IST

पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना न्यायडोंगरी परिसरात मात्र तुरळक शिडकाव्याशिवाय जोरदार पाऊस झाला नसल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे.

न्यायडोंगरी : पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना न्यायडोंगरी परिसरात मात्र तुरळक शिडकाव्याशिवाय जोरदार पाऊस झाला नसल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. सलाईनवर जगत असलेल्या पिकांनी मात्र माना टाकायला सुरु वात केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांच्या भटकंतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. टँकर भरण्यासाठीदेखील पाणी मिळत नसल्याने पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे जनावरे जगविण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  ऐन पावसाळ्यात पाण्याची दाहकता निर्माण झाल्याने भविष्यात पाणी मिळेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. या भागात पावसाने उघडीप दिल्याचेच दिसून येत आहे. गेल्या तीन-चार वषाह्ण्रपासून न्यायडोंगरी परिसरात पावसाने पाठ फिरवलेली आहे. यावर्षी पावसाळा चांगला होईल असा अंदाज वर्तवण्यात आला; परंतु केवळ शिडकाव्याशिवाय मुसळधार पाऊस पडला नाही. त्यामुळे नदी, नाले, बंधारे, विहिरी अजूनही कोरडेठाक असून, तहानलेले आहेत. उर्वरित दिवसांत पाऊस पडेल की नाही याची शास्वती दिसत नसल्याने ग्रामस्थ चिंतित आहे.मुसळधार पावसाच्या अपेक्षेने पेरणी केलेले कपाशी, भुईमूग, मका आदी पिके पाण्याअभावी डोळ्यासमोर करपताना पाहावे लागत आहे. तर फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना जिवाचे रान करावे लागत आहे. टँकरद्वारे पाणी विकत आणून फळबागांना पाणी द्यावे लागत असून, रोज हजारो रु पये खर्च होत आहेत.  परिसरातील अनेक कुटुंबांची गुजराण शेतमजुरीवर अवलंबून असून, पाऊसपाणी नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शेतमजुरांना काम मिळत नसल्याने उपासमारीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने पाण्याची दाहकता लक्षात घेता या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.कूपनलिकेची पातळीही खालावलीदोन महिन्यांपासून येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे. मिळेल त्या ठिकाणी जाऊन पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. गावातील कुपनलिकेच्या पाण्याची पातळी खालावली आहे. विहिरीदेखील तळ गाठल्याने टँकरने पाणीपुरवठा करणेदेखील अवघड झाले आहे. पैसे खर्च करूनही पाणी मिळत नाही अशी स्थिती आहे. पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ पाहत असताना ग्रामपालिकेने पाण्यासाठी अनेक प्रयत्न केले; पण फायदा झाला नाही, अशी खंत सरपंच गायत्री मोरे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Waterपाणी