शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

न्यायडोंगरीत पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:39 IST

पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना न्यायडोंगरी परिसरात मात्र तुरळक शिडकाव्याशिवाय जोरदार पाऊस झाला नसल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे.

न्यायडोंगरी : पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना न्यायडोंगरी परिसरात मात्र तुरळक शिडकाव्याशिवाय जोरदार पाऊस झाला नसल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. सलाईनवर जगत असलेल्या पिकांनी मात्र माना टाकायला सुरु वात केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांच्या भटकंतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. टँकर भरण्यासाठीदेखील पाणी मिळत नसल्याने पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे जनावरे जगविण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  ऐन पावसाळ्यात पाण्याची दाहकता निर्माण झाल्याने भविष्यात पाणी मिळेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. या भागात पावसाने उघडीप दिल्याचेच दिसून येत आहे. गेल्या तीन-चार वषाह्ण्रपासून न्यायडोंगरी परिसरात पावसाने पाठ फिरवलेली आहे. यावर्षी पावसाळा चांगला होईल असा अंदाज वर्तवण्यात आला; परंतु केवळ शिडकाव्याशिवाय मुसळधार पाऊस पडला नाही. त्यामुळे नदी, नाले, बंधारे, विहिरी अजूनही कोरडेठाक असून, तहानलेले आहेत. उर्वरित दिवसांत पाऊस पडेल की नाही याची शास्वती दिसत नसल्याने ग्रामस्थ चिंतित आहे.मुसळधार पावसाच्या अपेक्षेने पेरणी केलेले कपाशी, भुईमूग, मका आदी पिके पाण्याअभावी डोळ्यासमोर करपताना पाहावे लागत आहे. तर फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना जिवाचे रान करावे लागत आहे. टँकरद्वारे पाणी विकत आणून फळबागांना पाणी द्यावे लागत असून, रोज हजारो रु पये खर्च होत आहेत.  परिसरातील अनेक कुटुंबांची गुजराण शेतमजुरीवर अवलंबून असून, पाऊसपाणी नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शेतमजुरांना काम मिळत नसल्याने उपासमारीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने पाण्याची दाहकता लक्षात घेता या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.कूपनलिकेची पातळीही खालावलीदोन महिन्यांपासून येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे. मिळेल त्या ठिकाणी जाऊन पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. गावातील कुपनलिकेच्या पाण्याची पातळी खालावली आहे. विहिरीदेखील तळ गाठल्याने टँकरने पाणीपुरवठा करणेदेखील अवघड झाले आहे. पैसे खर्च करूनही पाणी मिळत नाही अशी स्थिती आहे. पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ पाहत असताना ग्रामपालिकेने पाण्यासाठी अनेक प्रयत्न केले; पण फायदा झाला नाही, अशी खंत सरपंच गायत्री मोरे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Waterपाणी