शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

रानडुकरांचा धुमाकुळ, पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 13:07 IST

खर्डे : वडाळा (वाजगाव) ता.देवळा या गावाच्या शिवारातील पिकांत रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे नुकसान होत आहे.

खर्डे : वडाळा (वाजगाव) ता.देवळा या गावाच्या शिवारातील पिकांत रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे नुकसान होत आहे. आधीच कमी पावसात पिके जगवण्याची धडपड करणाऱ्या शेतक-यांवर संकट येवून पडल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती झाली आहे. वनविभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकºयांनी वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली. वडाळाच्या डोंगराकडील भागात तसेच आजूबाजूच्या शिवारात रानडुकरांकडून खरीप हंगामातील पिकांचा फडशा पाडला जात आहे. या रानडुकरांचे कळप रोज रात्री शेतात घुसून मका, भुईमूग, पावश्या मुग व इतर पिके उकरून फस्त करत असल्याने लाखो रु पयांचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. रानडुकरांच्या उच्छादामुळे वर्षाचे पीक हातातून गेले आहे. रात्री पिकांची राखण करण्यासाठी काही शेतकरी व त्यांची गडीमाणसे जागता पहारा ठेवत असले तरी त्याचा फारसा उपयोग होतांना दिसत नाही. कारण या रानडुकरांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते अंगावर धावतात. त्यामुळे वनविभागाने या रानडुकरांचा तातडीने बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीचे पंचनामे व्हावेत अशी मागणी या परिसरातील नामदेवराव सोनवणे व इतर शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक