शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांचा धुमाकुळ, पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 13:07 IST

खर्डे : वडाळा (वाजगाव) ता.देवळा या गावाच्या शिवारातील पिकांत रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे नुकसान होत आहे.

खर्डे : वडाळा (वाजगाव) ता.देवळा या गावाच्या शिवारातील पिकांत रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे नुकसान होत आहे. आधीच कमी पावसात पिके जगवण्याची धडपड करणाऱ्या शेतक-यांवर संकट येवून पडल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती झाली आहे. वनविभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकºयांनी वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली. वडाळाच्या डोंगराकडील भागात तसेच आजूबाजूच्या शिवारात रानडुकरांकडून खरीप हंगामातील पिकांचा फडशा पाडला जात आहे. या रानडुकरांचे कळप रोज रात्री शेतात घुसून मका, भुईमूग, पावश्या मुग व इतर पिके उकरून फस्त करत असल्याने लाखो रु पयांचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. रानडुकरांच्या उच्छादामुळे वर्षाचे पीक हातातून गेले आहे. रात्री पिकांची राखण करण्यासाठी काही शेतकरी व त्यांची गडीमाणसे जागता पहारा ठेवत असले तरी त्याचा फारसा उपयोग होतांना दिसत नाही. कारण या रानडुकरांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते अंगावर धावतात. त्यामुळे वनविभागाने या रानडुकरांचा तातडीने बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीचे पंचनामे व्हावेत अशी मागणी या परिसरातील नामदेवराव सोनवणे व इतर शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक