शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

रस्त्यात वटवृक्ष पडल्याने जीव मुठीत धरून प्रवास

By admin | Updated: June 19, 2017 00:35 IST

रस्त्यात वटवृक्ष पडल्याने जीव मुठीत धरून प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कबेलगाव कु्नऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन दारणा धरणाकडे जाणाऱ्या अस्वली स्टेशन ते साकूर फाटा यादरम्यान महामार्ग क्र मांक ३७ वर गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यात दीडशे वर्षीय वटवृक्ष रस्त्यात उन्मळून पडल्याने अनेक वाहनधारक प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सदर विभागाने हा पडलेला वृक्ष बाजूला करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.अतिवृष्टीने हे वडाचे जीर्ण झालेले झाड महामार्गावर उन्मळून पडले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. सिन्नर, शिर्डीकडे जाणाऱ्या वाहनधारकांना यामुळे माघारी फिरावे लागत आहे, तर जवळच असलेल्या ब्रिटिशकालीन दारणा धरणावर अनेक पर्यटक येत असतात त्यांनादेखील पुढे जाणे अवघड होऊन बसले. दरम्यान, नांदगाव बुद्रुक येथील शाळकरी व महाविद्यालयीन मुलांना हे झाड पडल्यामुळे खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळेस प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना या वृक्षाचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.यातच काही वटवृक्ष जास्तच जीर्ण झाल्याने मृत्यूला आमंत्रण देत आहेत. या महामार्गावरून अनेक कामगार नाशिक, वाडीवऱ्हे आदी ठिकाणी कंपन्यांमध्ये रोजगारासाठी जात असतात. रात्री-अपरात्री त्यांना प्रवास करावा लागतो. महामार्गावर उन्मळून पडलेल्या वडाच्या झाडांमुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. सदर विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.