शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 21, 2016 00:10 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची प्रतीक्षा

त्र्यंबकेश्वर : पावसाच्या प्रतीक्षेत मृगही जवळपास संपण्याच्या बेतात आहे. दररोज आकाशात ढग जमून येतात, परंतु पाऊसच येत नाही. रोहिणी बरसेल, वळवाचा पाऊस पडेल, पण रोहिणीही कोरडेच गेले. मृगदेखील सुरू झाले; पण पाऊस बरसला नाही. आता येत्या २१ तारखेला आर्द्रा नक्षत्रास सुरुवात होईल. पावसाच्या प्रतीक्षेची त्र्यंबककरांची मात्र जय्यत तयारी झाली आहे.दरवर्षी पाऊस पडला की २/३ पावसात अहल्या धरण भरले जायचे; कारण जवळ जवळ ४५ वर्षांपासून त्यातील गाळ काढलेला नव्हता. शहरवासीयांची धरणाची उंची वाढवण्याची मागणी होती. अखेर अहल्या धरणाचे भाग्य उजळले व गत महिनाभरापासून धरण स्वच्छ करण्याची मोहीम लोकसहभागातून हाती घेण्यात आली. नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांचे पती दीपक लढ्ढा यांनी आपल्या पत्नीच्या माध्यमातून अहल्या धरणातील गाळ काढणे, धरणाची खोली वाढविणे आदि कामे करून घेतली. सांडवा दुरुस्त करून घेतला. ब्रह्मगिरीवर पावसाळ्यात पडणाऱ्या धबधब्यातून अहल्या नदीचा उगम होऊन सर्व पाणी अहल्या पाझर तलावात जमा होत असते.तलावाचे विशाल स्वरूप पाहता ‘अहल्या ल.पा. बंधारा’ असे त्र्यंबकवासीयांनी नाव दिले. माती-खडे-दगड आदि वाहून अहल्या धरण भरलेले होते. या बंधाऱ्याची क्षमता फक्त ६ द.ल.घ. फूट अशी होती. पूर्वी संपूर्ण गावाला पाणी पुरत असे. मात्र गाळाने भरल्याने पाणी पुरेनासे झाले. हे ओळखून जेथून अहल्येचा प्रवाह येतो त्या ठिकाणी आता दगडी बांध घालून माती दगड अडविण्यात आले. फक्त पाणी धरणात जमा होईल अशी तरतूद करण्यात आली. धरणाची क्षमताही वाढविण्यात पालिकेला यश आले आहे.धरण बांधल्यानंतर सन २००३ मध्ये तत्कालीन पाणीपुरवठा सभापती माधुरी गायधनी यांनी धरणातील गाळ काढला होता. त्यानंतर १४ वर्षांनी व धरण बांधल्यानंतर ४५ वर्षांनी मोठ्या प्रमाणात गाळ काढून सर्वांगीण दुरुस्ती करण्यात आली आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे वरुणराजाच्या आगमनाची. (वार्ताहर)