शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 21, 2016 00:10 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची प्रतीक्षा

त्र्यंबकेश्वर : पावसाच्या प्रतीक्षेत मृगही जवळपास संपण्याच्या बेतात आहे. दररोज आकाशात ढग जमून येतात, परंतु पाऊसच येत नाही. रोहिणी बरसेल, वळवाचा पाऊस पडेल, पण रोहिणीही कोरडेच गेले. मृगदेखील सुरू झाले; पण पाऊस बरसला नाही. आता येत्या २१ तारखेला आर्द्रा नक्षत्रास सुरुवात होईल. पावसाच्या प्रतीक्षेची त्र्यंबककरांची मात्र जय्यत तयारी झाली आहे.दरवर्षी पाऊस पडला की २/३ पावसात अहल्या धरण भरले जायचे; कारण जवळ जवळ ४५ वर्षांपासून त्यातील गाळ काढलेला नव्हता. शहरवासीयांची धरणाची उंची वाढवण्याची मागणी होती. अखेर अहल्या धरणाचे भाग्य उजळले व गत महिनाभरापासून धरण स्वच्छ करण्याची मोहीम लोकसहभागातून हाती घेण्यात आली. नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांचे पती दीपक लढ्ढा यांनी आपल्या पत्नीच्या माध्यमातून अहल्या धरणातील गाळ काढणे, धरणाची खोली वाढविणे आदि कामे करून घेतली. सांडवा दुरुस्त करून घेतला. ब्रह्मगिरीवर पावसाळ्यात पडणाऱ्या धबधब्यातून अहल्या नदीचा उगम होऊन सर्व पाणी अहल्या पाझर तलावात जमा होत असते.तलावाचे विशाल स्वरूप पाहता ‘अहल्या ल.पा. बंधारा’ असे त्र्यंबकवासीयांनी नाव दिले. माती-खडे-दगड आदि वाहून अहल्या धरण भरलेले होते. या बंधाऱ्याची क्षमता फक्त ६ द.ल.घ. फूट अशी होती. पूर्वी संपूर्ण गावाला पाणी पुरत असे. मात्र गाळाने भरल्याने पाणी पुरेनासे झाले. हे ओळखून जेथून अहल्येचा प्रवाह येतो त्या ठिकाणी आता दगडी बांध घालून माती दगड अडविण्यात आले. फक्त पाणी धरणात जमा होईल अशी तरतूद करण्यात आली. धरणाची क्षमताही वाढविण्यात पालिकेला यश आले आहे.धरण बांधल्यानंतर सन २००३ मध्ये तत्कालीन पाणीपुरवठा सभापती माधुरी गायधनी यांनी धरणातील गाळ काढला होता. त्यानंतर १४ वर्षांनी व धरण बांधल्यानंतर ४५ वर्षांनी मोठ्या प्रमाणात गाळ काढून सर्वांगीण दुरुस्ती करण्यात आली आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे वरुणराजाच्या आगमनाची. (वार्ताहर)