शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागाववासीयांना  शहर बससेवेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:20 IST

वडाळागाववासीयांची शहर बससेवेची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. बससेवेची गैरसोय केव्हा थांबणार? असा प्रश्न आहे. बससेवा सुरू करण्याची मागणी अद्यापही धूळखात पडून असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे

इंदिरानगर : वडाळागाववासीयांची शहर बससेवेची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. बससेवेची गैरसोय केव्हा थांबणार? असा प्रश्न आहे. बससेवा सुरू करण्याची मागणी अद्यापही धूळखात पडून असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे तातडीने शहर वाहतूक विभागाने बससेवा सुरू करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे .वडाळागाव शेतकरी आणि कामगारवस्ती म्हणून ओळखली जाते. सुमारे बारा हजार लोकांची लोकवस्ती असून, यामध्ये सुमारे ६० टक्के हातावर काम करण्याची वस्ती आहे. मेहबूबनगर, अण्णा भाऊ साठेनगर, जनितनगर, पिंगुळी बाग यांसह परिसरात हातावर काम करणारे बहुतेक नागरिक वास्तव्य करतात. प्रवासी कामासाठी शहरात ये-जा करण्यासाठी आणि गावातील शेकडोच्या संख्येने असलेले विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेण्यासाठी बससेवेची आवश्यकता आहे.परंतु सुमारे वीस वर्षांपासून अद्याप गावात बससेवा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थी वर्ग आणि गावातील नागरिकांना शहरात बससेवेअभावी रिक्षाने जीवघेणा प्रवास करावा लागतो. रिक्षांमध्ये पाठीमागच्या सीटमध्ये सहा ते सात प्रवासी आणि चालकाशेजारी तीन ते चार प्रवासी असतात तातडीने शहर वाहतूक विभागाने बससेवा सुरू करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.नागरिकांना त्रासशहर वाहतूक बससेवेची ‘जेथे लोकवस्ती आणि रस्ते तेथे बससेवा’ हे ब्रिदवाक्य फक्त नावालाच दिसून येत आहे .गावातील लोकांना बस फक्त मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्मचारी आणि मतपेट्या ने-आण करताना दिसून येते.बससेवाभावी विद्यार्थी वर्ग आणि नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बससेवेच्या प्रतीक्षा केव्हा संपणार? असा प्रश्न आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ