शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

१५ वर्षांपासून बसची प्रतीक्षा

By admin | Updated: September 28, 2016 23:56 IST

वडाळागाव : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये नाराजी

इंदिरानगर : सुमारे १५ वर्षांपासून वडाळागाववासीय बसच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु अद्याप नागरिकांची गैरसोय दूर झालेली नाही. बससेवा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक संस्था पुढाकार घेत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.वडाळागावात सुमारे दहा हजाराची लोकवस्ती आहे. यामध्ये नोकरदार, कामगार व रोजगारीवर उदरनिर्वाह करणाऱ्याची वस्ती मोठी आहे. गावामध्ये दोनच शाळा असून, विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार अपुरी पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, महाविद्यालयही नाही. त्यामुळे गावातील शेकडोच्या संख्येने विद्यार्थी वर्ग शिक्षण घेण्यासाठी शहरात ये-जा करतात. तसेच शहरात नोकरी आणि व्यवसायासाठी शेकडोच्या संख्येने नागरिक शहरात ये- जा करतात. परंतु सुमारे १५ वर्षांपासून बससेवा अद्याप सुरू न झाल्याने गैरसोय होत आहे. विद्यार्थी वर्ग व नागरिकांना रिक्षाद्वारे ये-जा करावी लागत आहे. रिक्षामध्ये चालकाजवळ तीन ते चार आणि पाठीमागे सात ते आठ प्रवासी असा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यातूनच लहान-मोठे अपघात झाले आहेत. हजारोच्या संख्येने लोकवस्ती आणि रस्ता असतानाही सुमारे वीस वर्षांपासून बससेवा का सुरू होत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. वडाळागाव ते शालिमार या पट्ट्यावर सुमारे ६0 ते ७0 रिक्षाचालक व्यवसाथ करीत आहेत. त्यांना प्रवासी मिळतात तर बसेसला प्रवासी का मिळणार नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. बससेवा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्थांनी पुढाकार का घेतला नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. बससेवेअभावी आर्थिक आणि मानसिक त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. (वार्ताहर)