शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांपासून बसची प्रतीक्षा

By admin | Updated: September 28, 2016 23:56 IST

वडाळागाव : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये नाराजी

इंदिरानगर : सुमारे १५ वर्षांपासून वडाळागाववासीय बसच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु अद्याप नागरिकांची गैरसोय दूर झालेली नाही. बससेवा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक संस्था पुढाकार घेत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.वडाळागावात सुमारे दहा हजाराची लोकवस्ती आहे. यामध्ये नोकरदार, कामगार व रोजगारीवर उदरनिर्वाह करणाऱ्याची वस्ती मोठी आहे. गावामध्ये दोनच शाळा असून, विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार अपुरी पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, महाविद्यालयही नाही. त्यामुळे गावातील शेकडोच्या संख्येने विद्यार्थी वर्ग शिक्षण घेण्यासाठी शहरात ये-जा करतात. तसेच शहरात नोकरी आणि व्यवसायासाठी शेकडोच्या संख्येने नागरिक शहरात ये- जा करतात. परंतु सुमारे १५ वर्षांपासून बससेवा अद्याप सुरू न झाल्याने गैरसोय होत आहे. विद्यार्थी वर्ग व नागरिकांना रिक्षाद्वारे ये-जा करावी लागत आहे. रिक्षामध्ये चालकाजवळ तीन ते चार आणि पाठीमागे सात ते आठ प्रवासी असा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यातूनच लहान-मोठे अपघात झाले आहेत. हजारोच्या संख्येने लोकवस्ती आणि रस्ता असतानाही सुमारे वीस वर्षांपासून बससेवा का सुरू होत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. वडाळागाव ते शालिमार या पट्ट्यावर सुमारे ६0 ते ७0 रिक्षाचालक व्यवसाथ करीत आहेत. त्यांना प्रवासी मिळतात तर बसेसला प्रवासी का मिळणार नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. बससेवा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्थांनी पुढाकार का घेतला नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. बससेवेअभावी आर्थिक आणि मानसिक त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. (वार्ताहर)