शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

जलधारांच्या वर्षावासाठी ‘वेट ॲन्ड वॉच’; ‘बिपरजॉय’ने नैऋत्य मोसमी वारे प्रभावित

By अझहर शेख | Updated: June 20, 2023 15:22 IST

शेतीच्या कामांचे नियोजन मोघम नको, शेतकऱ्यांची भावना

अझहर शेख, नाशिक: मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढे त्याची वाटचाल सुरू झालेली असताना अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊन तीव्र झाली. यामुळे नैर्ऋत्य मोसमी वारे प्रभावित झाले. जूनच्या अखेरच्या आठवड्यात मध्य भारतात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. हंगामी पावसाच्या जोरदार वर्षावासाठी अजून काही दिवस ‘वेट ॲन्ड वॉच’ करावे लागणार आहे.

मार्च, एप्रिलमध्ये अवकाळी वादळी पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्याला दणका दिला. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. शेतकरी या हल्ल्यातून सावरत असताना पुन्हा जूनचे वीस दिवस संपूनही हंगामी पावसाचे आगमन अद्याप झालेले नाही. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. पावसाचे आगमन लांबणीवर गेल्याने खरिपाच्या पेरण्याही खोळंबल्याचे चित्र दिसत आहे.

नैर्ऋत्य मोसमी वारे अद्यापही फारसे सक्षम झालेले दिसत नाही. दिसत नाही. दक्षिण व ईशान्य भारतात २१ जूनपर्यंत पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. २३ जूनपासून मध्य भारतात पावसाला सुरुवात होणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. जुलैच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यांत पाऊस चांगला होऊ शकतो; मात्र चौथ्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होईल, अशी हवामानाची स्थिती दर्शवीत असल्याचा अंदाज राज्याचे हवामान विभागाने वर्तविला आहे.

शेतीच्या कामांचे नियोजन मोघम नको

शेतीच्या कामांचे नियोजन हे कृषी विभागाकडून माहिती घेऊनच करायला हवे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन मोघम करायला नको, कारण पावसाचा लहरीपणादेखील लक्षात घ्यायला हवा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :cycloneचक्रीवादळ