शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

शहिदांना खऱ्या अर्थाने वाहिली श्रद्धांजली : वीरपत्नींचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:52 IST

‘भारत सरकारने सेनेला अशी मोकळीक खूप अगोदर दिली असती तर कदाचित पुलवामाचा भ्याड हल्ला टळला असता. वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकांनी ज्या पद्धतीने पाकव्याप्त काश्मिरात घुसून बॉम्बहल्ल्याने दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली, ते बघून त्यांचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो.

नाशिक : ‘भारत सरकारने सेनेला अशी मोकळीक खूप अगोदर दिली असती तर कदाचित पुलवामाचा भ्याड हल्ला टळला असता. वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकांनी ज्या पद्धतीने पाकव्याप्त काश्मिरात घुसून बॉम्बहल्ल्याने दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली, ते बघून त्यांचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो. भारतमातेच्या रक्षणार्थ आजपर्यंत ज्या सुपुत्रांनी आपले बलिदान दिले आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली.’’ अशा शब्दांत शहरासह जिल्ह्यातील वीरपत्नींनी आपल्या भावना बोलून दाखविल्या.पुलवामामध्ये भारताने ४० शूरवीर जवान गमावले. त्यांचे ४० कुटुंबे उद्ध्वस्त झालीत. या हल्ल्यामुळे अवघा देश शोकसागरात बुडाला होता. या हल्ल्यानंतर देशातून एकच नारा बुलंद केला जात होता, तो म्हणजे ‘धडा शिकवा, बदला घ्या’. वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बचा वर्षाव करत तीनशेहून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. या कारवाईनंतर संपूर्ण देशभरात एकच जल्लोष आणि वायुसेनेचे अभिनंदन सुरू झाले. हुतात्म्यांच्या वीरपत्नींशी संवाद साधला असता त्यांनीही या कारवाईचा अभिमान बाळगून भारतीय वायुदलाचे अभिनंदन करत आभार मानले. पुलवामामध्ये शहीद झालेल्या ४० जवानांच्या कुटुंबांना या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला, असेही त्यांनी सांगितले.भारत सरकारने याअगोदर जर आदेश दिले असते तर अशी कारवाई खूप अगोदरच सेनेकडून झाली असती; मात्र देर आये दुरुस्त आये, याप्रमाणे वायुसेनेला जे आदेश सरकारने दिले व सेनेने ज्या पद्धतीने शहिदांच्या बलिदानाचा बदला घेतला तो अभिमानास्पद आहे. पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय.- कविता वसंत लहाने, वीर जवानाची कन्यामनस्वी आनंद झाला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वायुसेनेने केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. भारतासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना खºया अर्थाने वायुदलाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्ल्याच्या रुपाने पाकला ठोस उत्तर मिळाले आहे. अशा प्रकारच्या कारवाई यापूर्वीच होणे आवश्यक होते.- रूपाली बच्छाव, वीरपत्नी, सातपूरजगातील चौथ्या क्रमांकाचे वायुदल म्हणून भारतीय वायुसेनेची ओळख आहे. त्यांची ताकद आज अवघ्या जगाने अनुभवली. सरकारने भारतीय सेनेच्या तीनही दलांचे हात असेच मोकळे ठेवावे, जेणेकरून घुसखोरी करणाºया दहशतवाद्यांना जवान यमसदनी धाडतील आणि देश अधिकाधिक सुरक्षित राहण्यास मदत होईल. हा हवाई हल्ला पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये दडलेल्या अतिरेक्यांना खूप काही शिकवून गेला असावा. - रेखा खैरनार, वीरपत्नी, गंगापूररोडभारताने केलेला हा हवाई हल्ला दहशतवादाची पाळेमुळे नेस्तनाबूत करणारा ठरला. या हल्ल्यामुळे शाहिदांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. भारताच्या सैन्याविषयी अन्य देशांनी जे गैरसमज करून ठेवले आहेत, त्यांचे गैरसमजही दूर झाले असतील. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी अशाप्रकारच्या कारवायांची गरज आहे. काश्मीर हा भारताचा भाग असून तो भारताकडेच राहणार आहे, हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे. - सुषमा मोरे, वीरपत्नी, पाथर्डी फाटाएकास दहा हे समीकरण अचूक आहे. असेच समीकरण जर कायम ठेवले तर पाकिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपलेले दहशतवादी देशाकडे वाकडी नजर करणार नाही. भारतीय सेनेने दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. या हवाई हल्ल्याची कारवाई अत्यंत अवघड होती; मात्र वायुदलासह भारतीय सेनेच्या शब्दकोशात ‘अवघड‘, ‘अशक्य’ हे शब्दच नसल्याचे यावरून पुन्हा सिध्द झाले.- अश्विनी तनपुरे, शहीद जवानाची पुतणी, गंगापूररोडशहिदांना खºया अर्थाने श्रद्धांजली मिळाली आहे. जवानांच्या आत्म्यांना या हल्ल्यामुळे शांती मिळाली. देशाकडे वाकडी नजर करण्याची हिम्मत कोणाची होणार नाही. या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानला मोठा धडा मिळाला आहे. अशाप्रकारची कारवाई याअगोदरच झाली असती तर देशासाठी व सेनेसाठी चांगले झाले असते. भारतीय सेनेला सरकारने स्वतंत्र निर्णय घेऊ द्यावेत.  - यशोदा गोसावी, वीरपत्नी

 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलSoldierसैनिक