शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

शहिदांना खऱ्या अर्थाने वाहिली श्रद्धांजली : वीरपत्नींचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:52 IST

‘भारत सरकारने सेनेला अशी मोकळीक खूप अगोदर दिली असती तर कदाचित पुलवामाचा भ्याड हल्ला टळला असता. वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकांनी ज्या पद्धतीने पाकव्याप्त काश्मिरात घुसून बॉम्बहल्ल्याने दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली, ते बघून त्यांचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो.

नाशिक : ‘भारत सरकारने सेनेला अशी मोकळीक खूप अगोदर दिली असती तर कदाचित पुलवामाचा भ्याड हल्ला टळला असता. वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकांनी ज्या पद्धतीने पाकव्याप्त काश्मिरात घुसून बॉम्बहल्ल्याने दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली, ते बघून त्यांचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो. भारतमातेच्या रक्षणार्थ आजपर्यंत ज्या सुपुत्रांनी आपले बलिदान दिले आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली.’’ अशा शब्दांत शहरासह जिल्ह्यातील वीरपत्नींनी आपल्या भावना बोलून दाखविल्या.पुलवामामध्ये भारताने ४० शूरवीर जवान गमावले. त्यांचे ४० कुटुंबे उद्ध्वस्त झालीत. या हल्ल्यामुळे अवघा देश शोकसागरात बुडाला होता. या हल्ल्यानंतर देशातून एकच नारा बुलंद केला जात होता, तो म्हणजे ‘धडा शिकवा, बदला घ्या’. वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बचा वर्षाव करत तीनशेहून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. या कारवाईनंतर संपूर्ण देशभरात एकच जल्लोष आणि वायुसेनेचे अभिनंदन सुरू झाले. हुतात्म्यांच्या वीरपत्नींशी संवाद साधला असता त्यांनीही या कारवाईचा अभिमान बाळगून भारतीय वायुदलाचे अभिनंदन करत आभार मानले. पुलवामामध्ये शहीद झालेल्या ४० जवानांच्या कुटुंबांना या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला, असेही त्यांनी सांगितले.भारत सरकारने याअगोदर जर आदेश दिले असते तर अशी कारवाई खूप अगोदरच सेनेकडून झाली असती; मात्र देर आये दुरुस्त आये, याप्रमाणे वायुसेनेला जे आदेश सरकारने दिले व सेनेने ज्या पद्धतीने शहिदांच्या बलिदानाचा बदला घेतला तो अभिमानास्पद आहे. पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय.- कविता वसंत लहाने, वीर जवानाची कन्यामनस्वी आनंद झाला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वायुसेनेने केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. भारतासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना खºया अर्थाने वायुदलाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्ल्याच्या रुपाने पाकला ठोस उत्तर मिळाले आहे. अशा प्रकारच्या कारवाई यापूर्वीच होणे आवश्यक होते.- रूपाली बच्छाव, वीरपत्नी, सातपूरजगातील चौथ्या क्रमांकाचे वायुदल म्हणून भारतीय वायुसेनेची ओळख आहे. त्यांची ताकद आज अवघ्या जगाने अनुभवली. सरकारने भारतीय सेनेच्या तीनही दलांचे हात असेच मोकळे ठेवावे, जेणेकरून घुसखोरी करणाºया दहशतवाद्यांना जवान यमसदनी धाडतील आणि देश अधिकाधिक सुरक्षित राहण्यास मदत होईल. हा हवाई हल्ला पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये दडलेल्या अतिरेक्यांना खूप काही शिकवून गेला असावा. - रेखा खैरनार, वीरपत्नी, गंगापूररोडभारताने केलेला हा हवाई हल्ला दहशतवादाची पाळेमुळे नेस्तनाबूत करणारा ठरला. या हल्ल्यामुळे शाहिदांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. भारताच्या सैन्याविषयी अन्य देशांनी जे गैरसमज करून ठेवले आहेत, त्यांचे गैरसमजही दूर झाले असतील. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी अशाप्रकारच्या कारवायांची गरज आहे. काश्मीर हा भारताचा भाग असून तो भारताकडेच राहणार आहे, हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे. - सुषमा मोरे, वीरपत्नी, पाथर्डी फाटाएकास दहा हे समीकरण अचूक आहे. असेच समीकरण जर कायम ठेवले तर पाकिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपलेले दहशतवादी देशाकडे वाकडी नजर करणार नाही. भारतीय सेनेने दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. या हवाई हल्ल्याची कारवाई अत्यंत अवघड होती; मात्र वायुदलासह भारतीय सेनेच्या शब्दकोशात ‘अवघड‘, ‘अशक्य’ हे शब्दच नसल्याचे यावरून पुन्हा सिध्द झाले.- अश्विनी तनपुरे, शहीद जवानाची पुतणी, गंगापूररोडशहिदांना खºया अर्थाने श्रद्धांजली मिळाली आहे. जवानांच्या आत्म्यांना या हल्ल्यामुळे शांती मिळाली. देशाकडे वाकडी नजर करण्याची हिम्मत कोणाची होणार नाही. या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानला मोठा धडा मिळाला आहे. अशाप्रकारची कारवाई याअगोदरच झाली असती तर देशासाठी व सेनेसाठी चांगले झाले असते. भारतीय सेनेला सरकारने स्वतंत्र निर्णय घेऊ द्यावेत.  - यशोदा गोसावी, वीरपत्नी

 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलSoldierसैनिक