शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाघाळेत शेतकर्‍यांने टमाटे पिक फेकले उपटून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 23:51 IST

येवला : टमाटे पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील वाघाळे येथील शेतकर्‍याने आपले अर्धा एकरातील टमाटे पिक उपटून फेकले आहे. टमाटे तोडणी, वाहतूकीचा खर्चही विक्रीतून निघत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून टमाटे उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्दे शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना अर्थिक मदत करावी

येवला : टमाटे पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील वाघाळे येथील शेतकर्‍याने आपले अर्धा एकरातील टमाटे पिक उपटून फेकले आहे. टमाटे तोडणी, वाहतूकीचा खर्चही विक्रीतून निघत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून टमाटे उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अनेक शेतकर्‍यांनी रस्त्यावर वा जनावरांपुढे टमाटे टाकून देत या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. वाघाळे येथील शेतकरी समाधान बाळनाथ सोमासे यांनी अर्धा एकर टमाटे पिक घेतले होते. सध्या बाजारात टमाटे पिकाला मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे तोडणी व बाजारात नेण्याचा खर्च वाचेल याचा विचार करत सोमासे यांनी टमाटे पिकच उपटून फेकले.

टमाटे पिकासाठी घरची मजुरी वगळता सुमारे साठ हजार रुपये खर्च आला होता. पिक विक्रीसाठी तयार झाले, तर बाजारात भाव नाही. तोडणी व वाहतूकीचा खर्चही निघत नसल्याने पिक उपटून टाकण्याची वेळ आल्याचे सोमासे यांनी सांगीतले. शासनाने टमाटे उत्पादक शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना अर्थिक मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती