शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

वडाळागावत पंधरवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून गूढ आजार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:58 IST

पंधरवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून वडाळागाव परिसरातील बहुतांश भागांमधील नागरिक हातापायांच्या पंज्यात होणाऱ्या असह्य वेदनांनी हैराण झाले आहेत. पायाच्या घोट्यापासून संपूर्ण तळवा आणि हाताच्या बोटांमध्ये होणाºया असह्य वेदना देणाºया गूढ आजाराने वडाळागावात थैमान घातले आहे.

नाशिक : पंधरवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून वडाळागाव परिसरातील बहुतांश भागांमधील नागरिक हातापायांच्या पंज्यात होणाऱ्या असह्य वेदनांनी हैराण झाले आहेत. पायाच्या घोट्यापासून संपूर्ण तळवा आणि हाताच्या बोटांमध्ये होणाºया असह्य वेदना देणाºया गूढ आजाराने वडाळागावात थैमान घातले आहे.  वडाळागाव परिसर नेहमीच सार्वजनिक स्वच्छतेबाबत चर्चेत असतो. शहरापासून जवळ असलेल्या या भागात मागील काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या पांढºया पेशी, तांबड्या पेशी घटती संख्या आणि अशक्तपणा अशी लक्षणे अचानक आलेल्या विषाणूजन्य तापाच्या आजाराने नागरिकांमध्ये दिसून येत होती. ही लक्षणे कमी होऊन ताप नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा पंधरवड्यापासून लोकांना हाता-पायांचा पंजा आणि मनगट, घोटा, गुडघेदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. वडाळागाव परिसरातील बारा खोली परिसर, रामोशीवाडा, माळी गल्ली, गोपालवाडी, राजवाडा, गरीब नवाज कॉलनी आदी भागांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळेच या आजाराने त्रस्त झाले आहेत.चिकुणगुण्यासदृश्य या आजारामध्ये नागरिकांचे सांधे जरी दुखत असले तरी ताप मात्र काहींना येत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. एकूणच ताप, डोकेदुखी, अंगदुखी किंवा उलट्या, अतिसारासारख्या दुसºया आरोग्याच्या तक्रारी नसताना केवळ हाताच्या बोटांची व पायांच्या बोटांची सांधेदुखी तसेच तळपायदुखी आणि गुडघेदुखीने वडाळावासीयांना ग्रासले आहेत.  या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना आठवडाभरापेक्षा अधिक वेळ वेदना थांबण्यासाठी लागत आहे. विषाणुजन्य आजारातून सांधेदुखीचा हा त्रास असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहेत; मात्र वेदनाशामक औषधांनीदेखील हा आजार नियंत्रणात येत नसून केवळ वेदनाशामक गोळ्या घेतल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात दिलासा रुग्णांंना मिळत आहे.घोट्याखाली सूजकाही रुग्णांमध्ये सांध्याच्या दाह व पायाच्या घोट्याला सूजही येत असल्याचे लक्षण दिसत आहे. सुरुवातीला किमान दोन दिवसांपर्यंत केवळ सांध्यांमध्ये दुखावा आणि त्यानंतर सूज येत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.बसल्या जागेवरून उठणे कठीणवडाळागाव परिसरातील बहुतांश नागरिकांना अचानकपणे उद्भवलेल्या सांधेदुखीने ग्रासले असल्याने बसल्या जागेवरुन उठणेही कठीण होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वडाळागाव परिसरात वैद्यकीय तपासणी कक्ष उभारून नागरिकांच्या या आजाराने निदान व योग्य उपचार करण्याची मागणी होत आहे. पावसाळ्याला प्रारंभ झाल्यामुळे तत्काळ आरोग्य शिबिर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या भागात राबविणे तसेच या आजारासह अन्य संसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.झोपेतून उठताना जणू येते अपंगत्वरात्री झोपल्यानंतर सकाळी उठताना नागरिकांना प्रचंड प्रमाणात बोटांच्या सांध्यासह पायांच्या सांध्यात वेदना जाणवतात. काही वेळ तर गुडघ्यामधून पाय सरळ रेषेत करून उभे राहणेही शक्य होत नाही. नैसर्गिक विधी करण्यासाठी प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. सकाळची न्याहारी आटोपून वेदनाशामक गोळ्या घेतल्यानंतर दिवसभर नागरिकांना दैनंदिन कामासाठी हालचाल करणे शक्य होते.वेदनाशामक गोळ्यांचा तात्पुरता प्रभावकेवळ हात आणि पायांच्या सांध्यामध्ये दाहचा होणारा त्रास थांबविण्यासाठी डॉक्टरांनी दिलेली वेदनाशामक गोळ्या-औषधांचा प्रभाव तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे दिसून येत आहे. गोळ्या घेतल्यानंतर काही वेळेत दाह कमी होण्यास मदत होते; मात्र काही तासानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे-थे’ होत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. अशी आहेत आजाराची लक्षणेसुरुवातीला टाचदुखीला सुरुवात.घोट्यापासून पायाच्या बोटांच्या सांध्यात असह्य वेदना.हाताच्या मनगटामध्ये दाह होणे तसेच बोटांची सांधेदुखी.गुडघ्याच्या सांध्यात प्रचंड वेदना होणे.तळपायाला सूज येणे.काही प्रमाणात रुग्णांना थकवाही जाणवतो.तळपायात जणू ताप असल्याचा भास होऊन उष्णता जाणवते.विषाणूजन्य आजार किंवा चिकुणगुण्यासदृश्य आजारामध्ये अशी लक्षणे दिसतात. नागरिकांनी घाबरून जाऊ नये; मात्र डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. महापालिकेच्या दवाखान्यांमध्येही या आजारावर औषधोपचार उपलब्ध आहे. जवळचे झाकीर हुसेन रुग्णालयात जाऊन योग्य उपचार घ्यावा. याबाबत परिसरात सर्वेक्षण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात येईल. - डॉ. जयराम कोठारी, आरोग्यधिकारी, मनपा

टॅग्स :doctorडॉक्टर