शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

निवडणूक आयोगाकडून ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राचा प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:20 IST

गेल्या चार वर्षांपासून सत्ताधारी वगळता सर्वच विरोधी पक्षांकडून निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम यंत्राला घेतला जाणार आक्षेप व मतपत्रिकांचा वापर करण्याचा धरला जाणारा अट्टाहास पाहता निवडणूक आयोगाने तितक्याच जोरकसपणे आपल्यावरील आरोप धुडकावून लावण्याचा प्रयत्न सुरू केला असून, होऊ घातलेल्या निवडणुकीत ईव्हीएम यंत्रासोबत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार असल्याने ‘आता कोणत्याही शंकेला वाव राहणार नाही, अशा राजकीय पद्धतीने प्रचारालाही सुरुवात केली आहे.

नाशिक : गेल्या चार वर्षांपासून सत्ताधारी वगळता सर्वच विरोधी पक्षांकडून निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम यंत्राला घेतला जाणार आक्षेप व मतपत्रिकांचा वापर करण्याचा धरला जाणारा अट्टाहास पाहता निवडणूक आयोगाने तितक्याच जोरकसपणे आपल्यावरील आरोप धुडकावून लावण्याचा प्रयत्न सुरू केला असून, होऊ घातलेल्या निवडणुकीत ईव्हीएम यंत्रासोबत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार असल्याने ‘आता कोणत्याही शंकेला वाव राहणार नाही, अशा राजकीय पद्धतीने प्रचारालाही सुरुवात केली आहे.  भारत निवडणूक आयोगाकडून शनिवारी विधानसभा मतदारसंघनिहाय तयार करण्यात आलेली मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, तेव्हापासूनच देशपातळीवर मतदार पुनरीक्षण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गतच १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर दरम्यान मतदार जनजागृती मोहीम म्हणजेच ‘स्वीप’चा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या जागृती मोहिमेत नव मतदारांना आकर्षित करणे, शाळा, महाविद्यालयांमध्ये लोकशाहीचे महत्त्व पटविणे, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, तर पुनरीक्षण मोहिमेंतर्गत नवीन मतदारांची नोंद, दुबार व मयतांची नावे वगळणे, नाव, पत्त्यात बदल, मतदार यादीत छायाचित्र समाविष्ट करण्यात येणार आहे. या साºयांपेक्षाही आयोगाने सर्वाधिक महत्त्व स्वत:वरील आक्षेप धुवून काढण्यास दिले आहे. २०१४ नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत एका विशिष्ट पक्षालाच सर्वाधिक मते मिळत असल्याने सर्वच विरोधी पक्षांनी निवडणुकीत वापरल्या जाणाºया ईव्हीएम यंत्रावर आक्षेप घेतला आहे. त्यासाठी काही उदाहरणे देऊन मतदान यंत्रे हॅक करून सत्ताधारी पक्षाला आयोग पूरक भूमिका घेत असल्याचे प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. मतदान यंत्रावर आक्षेप घेणे एक प्रकारे निवडणूक आयोगावरच अविश्वास दाखविण्यासारखे असल्यामुळे निवडणुकीत ईव्हीएम यंत्राला व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात येणार आहे. जेणे करून प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारास पडले याची खात्री करता येणार आहे. शनिवारपासून सुरू होणाºया मतदान पुनरीक्षण मोहिमेंतर्गत प्रत्येक मतदाराला त्याची माहिती व्हावी यासाठी आयोगाने प्रचारपत्रके छापून ते वितरित करण्याचे ठरविले आहे. त्यात ‘ईव्हीएमबरोबर व्हीव्हीपॅट म्हणजे खात्री बरोबर विश्वास’अशी घोषवाक्ये लिहिली असून, आता कोणत्याही शंकेला वाव राहणार नाही, असा छातीठोक दावाही आयोगाने या पत्रकात केला आहे. प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत प्रचारपत्रके पोहोचविण्याची जबाबदारी बीएलओंवर तसेच राजकीय पक्षांवर सोपविण्यात आली आहे.