शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

निवडणूक आयोगाकडून ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राचा प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:20 IST

गेल्या चार वर्षांपासून सत्ताधारी वगळता सर्वच विरोधी पक्षांकडून निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम यंत्राला घेतला जाणार आक्षेप व मतपत्रिकांचा वापर करण्याचा धरला जाणारा अट्टाहास पाहता निवडणूक आयोगाने तितक्याच जोरकसपणे आपल्यावरील आरोप धुडकावून लावण्याचा प्रयत्न सुरू केला असून, होऊ घातलेल्या निवडणुकीत ईव्हीएम यंत्रासोबत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार असल्याने ‘आता कोणत्याही शंकेला वाव राहणार नाही, अशा राजकीय पद्धतीने प्रचारालाही सुरुवात केली आहे.

नाशिक : गेल्या चार वर्षांपासून सत्ताधारी वगळता सर्वच विरोधी पक्षांकडून निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम यंत्राला घेतला जाणार आक्षेप व मतपत्रिकांचा वापर करण्याचा धरला जाणारा अट्टाहास पाहता निवडणूक आयोगाने तितक्याच जोरकसपणे आपल्यावरील आरोप धुडकावून लावण्याचा प्रयत्न सुरू केला असून, होऊ घातलेल्या निवडणुकीत ईव्हीएम यंत्रासोबत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार असल्याने ‘आता कोणत्याही शंकेला वाव राहणार नाही, अशा राजकीय पद्धतीने प्रचारालाही सुरुवात केली आहे.  भारत निवडणूक आयोगाकडून शनिवारी विधानसभा मतदारसंघनिहाय तयार करण्यात आलेली मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, तेव्हापासूनच देशपातळीवर मतदार पुनरीक्षण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गतच १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर दरम्यान मतदार जनजागृती मोहीम म्हणजेच ‘स्वीप’चा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या जागृती मोहिमेत नव मतदारांना आकर्षित करणे, शाळा, महाविद्यालयांमध्ये लोकशाहीचे महत्त्व पटविणे, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, तर पुनरीक्षण मोहिमेंतर्गत नवीन मतदारांची नोंद, दुबार व मयतांची नावे वगळणे, नाव, पत्त्यात बदल, मतदार यादीत छायाचित्र समाविष्ट करण्यात येणार आहे. या साºयांपेक्षाही आयोगाने सर्वाधिक महत्त्व स्वत:वरील आक्षेप धुवून काढण्यास दिले आहे. २०१४ नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत एका विशिष्ट पक्षालाच सर्वाधिक मते मिळत असल्याने सर्वच विरोधी पक्षांनी निवडणुकीत वापरल्या जाणाºया ईव्हीएम यंत्रावर आक्षेप घेतला आहे. त्यासाठी काही उदाहरणे देऊन मतदान यंत्रे हॅक करून सत्ताधारी पक्षाला आयोग पूरक भूमिका घेत असल्याचे प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. मतदान यंत्रावर आक्षेप घेणे एक प्रकारे निवडणूक आयोगावरच अविश्वास दाखविण्यासारखे असल्यामुळे निवडणुकीत ईव्हीएम यंत्राला व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात येणार आहे. जेणे करून प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारास पडले याची खात्री करता येणार आहे. शनिवारपासून सुरू होणाºया मतदान पुनरीक्षण मोहिमेंतर्गत प्रत्येक मतदाराला त्याची माहिती व्हावी यासाठी आयोगाने प्रचारपत्रके छापून ते वितरित करण्याचे ठरविले आहे. त्यात ‘ईव्हीएमबरोबर व्हीव्हीपॅट म्हणजे खात्री बरोबर विश्वास’अशी घोषवाक्ये लिहिली असून, आता कोणत्याही शंकेला वाव राहणार नाही, असा छातीठोक दावाही आयोगाने या पत्रकात केला आहे. प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत प्रचारपत्रके पोहोचविण्याची जबाबदारी बीएलओंवर तसेच राजकीय पक्षांवर सोपविण्यात आली आहे.