शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

निवडणूक आयोगाकडून ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राचा प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:20 IST

गेल्या चार वर्षांपासून सत्ताधारी वगळता सर्वच विरोधी पक्षांकडून निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम यंत्राला घेतला जाणार आक्षेप व मतपत्रिकांचा वापर करण्याचा धरला जाणारा अट्टाहास पाहता निवडणूक आयोगाने तितक्याच जोरकसपणे आपल्यावरील आरोप धुडकावून लावण्याचा प्रयत्न सुरू केला असून, होऊ घातलेल्या निवडणुकीत ईव्हीएम यंत्रासोबत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार असल्याने ‘आता कोणत्याही शंकेला वाव राहणार नाही, अशा राजकीय पद्धतीने प्रचारालाही सुरुवात केली आहे.

नाशिक : गेल्या चार वर्षांपासून सत्ताधारी वगळता सर्वच विरोधी पक्षांकडून निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम यंत्राला घेतला जाणार आक्षेप व मतपत्रिकांचा वापर करण्याचा धरला जाणारा अट्टाहास पाहता निवडणूक आयोगाने तितक्याच जोरकसपणे आपल्यावरील आरोप धुडकावून लावण्याचा प्रयत्न सुरू केला असून, होऊ घातलेल्या निवडणुकीत ईव्हीएम यंत्रासोबत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार असल्याने ‘आता कोणत्याही शंकेला वाव राहणार नाही, अशा राजकीय पद्धतीने प्रचारालाही सुरुवात केली आहे.  भारत निवडणूक आयोगाकडून शनिवारी विधानसभा मतदारसंघनिहाय तयार करण्यात आलेली मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, तेव्हापासूनच देशपातळीवर मतदार पुनरीक्षण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गतच १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर दरम्यान मतदार जनजागृती मोहीम म्हणजेच ‘स्वीप’चा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या जागृती मोहिमेत नव मतदारांना आकर्षित करणे, शाळा, महाविद्यालयांमध्ये लोकशाहीचे महत्त्व पटविणे, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, तर पुनरीक्षण मोहिमेंतर्गत नवीन मतदारांची नोंद, दुबार व मयतांची नावे वगळणे, नाव, पत्त्यात बदल, मतदार यादीत छायाचित्र समाविष्ट करण्यात येणार आहे. या साºयांपेक्षाही आयोगाने सर्वाधिक महत्त्व स्वत:वरील आक्षेप धुवून काढण्यास दिले आहे. २०१४ नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत एका विशिष्ट पक्षालाच सर्वाधिक मते मिळत असल्याने सर्वच विरोधी पक्षांनी निवडणुकीत वापरल्या जाणाºया ईव्हीएम यंत्रावर आक्षेप घेतला आहे. त्यासाठी काही उदाहरणे देऊन मतदान यंत्रे हॅक करून सत्ताधारी पक्षाला आयोग पूरक भूमिका घेत असल्याचे प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. मतदान यंत्रावर आक्षेप घेणे एक प्रकारे निवडणूक आयोगावरच अविश्वास दाखविण्यासारखे असल्यामुळे निवडणुकीत ईव्हीएम यंत्राला व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात येणार आहे. जेणे करून प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारास पडले याची खात्री करता येणार आहे. शनिवारपासून सुरू होणाºया मतदान पुनरीक्षण मोहिमेंतर्गत प्रत्येक मतदाराला त्याची माहिती व्हावी यासाठी आयोगाने प्रचारपत्रके छापून ते वितरित करण्याचे ठरविले आहे. त्यात ‘ईव्हीएमबरोबर व्हीव्हीपॅट म्हणजे खात्री बरोबर विश्वास’अशी घोषवाक्ये लिहिली असून, आता कोणत्याही शंकेला वाव राहणार नाही, असा छातीठोक दावाही आयोगाने या पत्रकात केला आहे. प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत प्रचारपत्रके पोहोचविण्याची जबाबदारी बीएलओंवर तसेच राजकीय पक्षांवर सोपविण्यात आली आहे.