शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री समानतेचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता कुलगुरू ई. वायुनंदन : ‘महिलांची सुरक्षितता’ विषयावर परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:46 IST

नाशिक : स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रत्यक्ष कृतीबरोबरच नव्या पिढीवर समानतेचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता आहे. यातून स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल.

ठळक मुद्देआज स्त्रीने सर्वच क्षेत्रांत भरारी घेतली आहेमाणूस म्हणून स्वीकारावे एवढीच महिलेची साधी अपेक्षा

नाशिक : स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रत्यक्ष कृतीबरोबरच नव्या पिढीवर समानतेचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता आहे. यातून स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.जागतिक महिला दिनानिमित्ताने विद्यापीठात सावित्रीबाई फुले अध्यासनातर्फे ‘महिलांची सुरक्षितता’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. कविता साळुंके आणि सावित्रीबाई फुले अध्यासनाचे प्रमुख प्रवीण घोडेस्वार होते. विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात झालेल्या या परिसंवादात बोलताना कुलगुरू म्हणाले, आज स्त्रीने सर्वच क्षेत्रांत भरारी घेतली आहे. ती स्वत:चे घर सांभाळून आपले कर्तव्य पार पाडत असते. तिने अनेक सकारात्मक बदल आपल्या जीवनात स्वीकारले आहेत. महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ तिची कमाई किंवा तिचा आधुनिक पोशाख, जीवनशैली नाही, तर तो बदल प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनातून झाला पाहिजे, असे कुलगुरू म्हणाले. एक व्यक्ती किंवा माणूस म्हणून स्वीकारावे एवढीच महिलेची साधी अपेक्षा असते. पुरुषांनीही स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून आणला तर ते शक्य होईल, असा सूर या परिसंवादातून उमटला. प्रारंभी सावित्रीबाई फुले अध्यासनाचे समन्वयक प्रवीण घोडेस्वार यांनी प्रास्ताविक केले. संगीता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिसंवादात विद्यापीठात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाºया सिंधूबाई जाधव म्हणाल्या, गेल्या २२ वर्षांपासून मी या विद्यापीठात काम करतेय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रसंगी धुणीभांडी, पोळीभाजीचे काम करून दिवस काढले. मात्र, पतीच्या अकाली निधनानंतर विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाºयांनी सहानुभूती दाखवून मोलाची मदत केल्याने कुटुंबाला मोठी मदत झाली. कुलगुरू प्रा. वायुनंदन यांनी गेल्या काही महिन्यांत चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना पगारवाढीबरोबरच कपडे, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा दिल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात वावरतंय, हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. आमच्यासाठी रोजचाच दिवस महिला दिनासारखा असल्याचेही त्या म्हणाल्या.