शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री समानतेचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता कुलगुरू ई. वायुनंदन : ‘महिलांची सुरक्षितता’ विषयावर परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:46 IST

नाशिक : स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रत्यक्ष कृतीबरोबरच नव्या पिढीवर समानतेचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता आहे. यातून स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल.

ठळक मुद्देआज स्त्रीने सर्वच क्षेत्रांत भरारी घेतली आहेमाणूस म्हणून स्वीकारावे एवढीच महिलेची साधी अपेक्षा

नाशिक : स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रत्यक्ष कृतीबरोबरच नव्या पिढीवर समानतेचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता आहे. यातून स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.जागतिक महिला दिनानिमित्ताने विद्यापीठात सावित्रीबाई फुले अध्यासनातर्फे ‘महिलांची सुरक्षितता’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. कविता साळुंके आणि सावित्रीबाई फुले अध्यासनाचे प्रमुख प्रवीण घोडेस्वार होते. विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात झालेल्या या परिसंवादात बोलताना कुलगुरू म्हणाले, आज स्त्रीने सर्वच क्षेत्रांत भरारी घेतली आहे. ती स्वत:चे घर सांभाळून आपले कर्तव्य पार पाडत असते. तिने अनेक सकारात्मक बदल आपल्या जीवनात स्वीकारले आहेत. महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ तिची कमाई किंवा तिचा आधुनिक पोशाख, जीवनशैली नाही, तर तो बदल प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनातून झाला पाहिजे, असे कुलगुरू म्हणाले. एक व्यक्ती किंवा माणूस म्हणून स्वीकारावे एवढीच महिलेची साधी अपेक्षा असते. पुरुषांनीही स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून आणला तर ते शक्य होईल, असा सूर या परिसंवादातून उमटला. प्रारंभी सावित्रीबाई फुले अध्यासनाचे समन्वयक प्रवीण घोडेस्वार यांनी प्रास्ताविक केले. संगीता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिसंवादात विद्यापीठात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाºया सिंधूबाई जाधव म्हणाल्या, गेल्या २२ वर्षांपासून मी या विद्यापीठात काम करतेय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रसंगी धुणीभांडी, पोळीभाजीचे काम करून दिवस काढले. मात्र, पतीच्या अकाली निधनानंतर विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाºयांनी सहानुभूती दाखवून मोलाची मदत केल्याने कुटुंबाला मोठी मदत झाली. कुलगुरू प्रा. वायुनंदन यांनी गेल्या काही महिन्यांत चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना पगारवाढीबरोबरच कपडे, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा दिल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात वावरतंय, हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. आमच्यासाठी रोजचाच दिवस महिला दिनासारखा असल्याचेही त्या म्हणाल्या.