शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

चरित्रलेखनासाठी विवेक आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:46 IST

संत, कवी, साहित्यिकांमधील गाजलेल्या व्यक्तिमत्त्वांविषयीचे चरित्रलेखन करणे म्हणजे अत्यंत अवघड बाब आहे. चरित्रलेखनासाठी लेखकाकडे व्यापक दृष्टिकोनासह विवेक असणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले.

नाशिक : संत, कवी, साहित्यिकांमधील गाजलेल्या व्यक्तिमत्त्वांविषयीचे चरित्रलेखन करणे म्हणजे अत्यंत अवघड बाब आहे.चरित्रलेखनासाठी लेखकाकडे व्यापक दृष्टिकोनासह विवेक असणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले.  गंगापूररोडवरील कुसुमाग्रज सभागृहात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अभिमन्यू सूर्यवंशी लिखित संत मीराबाई या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी पठारे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विचारवंत रावसाहेब कसबे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, सुमती लांडे, डॉ. मनोज चोपडा, डॉ. श्रीपाल शाह, अभिमन्यू सूर्यवंशी, शकुंतला सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  यावेळी पठारे म्हणाले, सूर्यवंशी यांनी वयाची साठी ओलांडल्यानंतर लिखाणाला सुरुवात केली आणि तीदेखील चरित्रलेखन प्रकाराची निवड करत. चरित्रलेखन ही एक अनन्यसाधारण कला त्यांनी जोपासत पोलीस खात्यातून निवृत्तीनंतरचे आयुष्य ते समृध्दपणे जगत आहे. त्यांची ही कला म्हणजे उत्कटतेची बांधलेली एकप्रकारची पूजा होय. विविध संतांच्या चरित्रातील वेगळेपण हे त्या-त्या काळी भावीपिढीला मार्गदर्शक व संस्कार देणारे असते. संतांचे आयुष्य हे अत्यंत कठीण व खडतर असते त्यापैकी एक संत मीराबाई यादेखील आहेत. राजघराण्यात जन्माला येऊनही मीराबाई यांनी जगलेले आयुष्य हे अत्यंत कष्टाचे व तितकेच प्रेरणादायीदेखील आहे. त्यांचे चरित्रलेखन करणे म्हणजे कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. कसबे म्हणाले, की संत मीराबाई म्हणजे प्रेमाचा सागर असून या प्रेमरुपी सागरात जितके डुंबता येईल तितके जीवन सार्थ होईल. मीराबार्इंनी फक्त प्रेम केले. प्रेमामध्ये संपूर्ण विश्व सामावलेले असते. प्रेमाला सौंदर्यात परावर्तीत कसे करावे हे मीराबार्इंकडून शिकण्यासारखे आहे. सूर्यवंशी यांचे मनोगत जयश्री सूर्यवंशी यांनी वाचून दाखवले. प्रास्ताविक बाळासाहेब गुंजाळ यांनी केले व सूत्रसंचालन बरंठे आणि जान्हवी देवकर यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक