शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

चरित्रलेखनासाठी विवेक आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:46 IST

संत, कवी, साहित्यिकांमधील गाजलेल्या व्यक्तिमत्त्वांविषयीचे चरित्रलेखन करणे म्हणजे अत्यंत अवघड बाब आहे. चरित्रलेखनासाठी लेखकाकडे व्यापक दृष्टिकोनासह विवेक असणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले.

नाशिक : संत, कवी, साहित्यिकांमधील गाजलेल्या व्यक्तिमत्त्वांविषयीचे चरित्रलेखन करणे म्हणजे अत्यंत अवघड बाब आहे.चरित्रलेखनासाठी लेखकाकडे व्यापक दृष्टिकोनासह विवेक असणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले.  गंगापूररोडवरील कुसुमाग्रज सभागृहात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अभिमन्यू सूर्यवंशी लिखित संत मीराबाई या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी पठारे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विचारवंत रावसाहेब कसबे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, सुमती लांडे, डॉ. मनोज चोपडा, डॉ. श्रीपाल शाह, अभिमन्यू सूर्यवंशी, शकुंतला सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  यावेळी पठारे म्हणाले, सूर्यवंशी यांनी वयाची साठी ओलांडल्यानंतर लिखाणाला सुरुवात केली आणि तीदेखील चरित्रलेखन प्रकाराची निवड करत. चरित्रलेखन ही एक अनन्यसाधारण कला त्यांनी जोपासत पोलीस खात्यातून निवृत्तीनंतरचे आयुष्य ते समृध्दपणे जगत आहे. त्यांची ही कला म्हणजे उत्कटतेची बांधलेली एकप्रकारची पूजा होय. विविध संतांच्या चरित्रातील वेगळेपण हे त्या-त्या काळी भावीपिढीला मार्गदर्शक व संस्कार देणारे असते. संतांचे आयुष्य हे अत्यंत कठीण व खडतर असते त्यापैकी एक संत मीराबाई यादेखील आहेत. राजघराण्यात जन्माला येऊनही मीराबाई यांनी जगलेले आयुष्य हे अत्यंत कष्टाचे व तितकेच प्रेरणादायीदेखील आहे. त्यांचे चरित्रलेखन करणे म्हणजे कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. कसबे म्हणाले, की संत मीराबाई म्हणजे प्रेमाचा सागर असून या प्रेमरुपी सागरात जितके डुंबता येईल तितके जीवन सार्थ होईल. मीराबार्इंनी फक्त प्रेम केले. प्रेमामध्ये संपूर्ण विश्व सामावलेले असते. प्रेमाला सौंदर्यात परावर्तीत कसे करावे हे मीराबार्इंकडून शिकण्यासारखे आहे. सूर्यवंशी यांचे मनोगत जयश्री सूर्यवंशी यांनी वाचून दाखवले. प्रास्ताविक बाळासाहेब गुंजाळ यांनी केले व सूत्रसंचालन बरंठे आणि जान्हवी देवकर यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक