शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

चरित्रलेखनासाठी विवेक आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:46 IST

संत, कवी, साहित्यिकांमधील गाजलेल्या व्यक्तिमत्त्वांविषयीचे चरित्रलेखन करणे म्हणजे अत्यंत अवघड बाब आहे. चरित्रलेखनासाठी लेखकाकडे व्यापक दृष्टिकोनासह विवेक असणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले.

नाशिक : संत, कवी, साहित्यिकांमधील गाजलेल्या व्यक्तिमत्त्वांविषयीचे चरित्रलेखन करणे म्हणजे अत्यंत अवघड बाब आहे.चरित्रलेखनासाठी लेखकाकडे व्यापक दृष्टिकोनासह विवेक असणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले.  गंगापूररोडवरील कुसुमाग्रज सभागृहात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अभिमन्यू सूर्यवंशी लिखित संत मीराबाई या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी पठारे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विचारवंत रावसाहेब कसबे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, सुमती लांडे, डॉ. मनोज चोपडा, डॉ. श्रीपाल शाह, अभिमन्यू सूर्यवंशी, शकुंतला सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  यावेळी पठारे म्हणाले, सूर्यवंशी यांनी वयाची साठी ओलांडल्यानंतर लिखाणाला सुरुवात केली आणि तीदेखील चरित्रलेखन प्रकाराची निवड करत. चरित्रलेखन ही एक अनन्यसाधारण कला त्यांनी जोपासत पोलीस खात्यातून निवृत्तीनंतरचे आयुष्य ते समृध्दपणे जगत आहे. त्यांची ही कला म्हणजे उत्कटतेची बांधलेली एकप्रकारची पूजा होय. विविध संतांच्या चरित्रातील वेगळेपण हे त्या-त्या काळी भावीपिढीला मार्गदर्शक व संस्कार देणारे असते. संतांचे आयुष्य हे अत्यंत कठीण व खडतर असते त्यापैकी एक संत मीराबाई यादेखील आहेत. राजघराण्यात जन्माला येऊनही मीराबाई यांनी जगलेले आयुष्य हे अत्यंत कष्टाचे व तितकेच प्रेरणादायीदेखील आहे. त्यांचे चरित्रलेखन करणे म्हणजे कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. कसबे म्हणाले, की संत मीराबाई म्हणजे प्रेमाचा सागर असून या प्रेमरुपी सागरात जितके डुंबता येईल तितके जीवन सार्थ होईल. मीराबार्इंनी फक्त प्रेम केले. प्रेमामध्ये संपूर्ण विश्व सामावलेले असते. प्रेमाला सौंदर्यात परावर्तीत कसे करावे हे मीराबार्इंकडून शिकण्यासारखे आहे. सूर्यवंशी यांचे मनोगत जयश्री सूर्यवंशी यांनी वाचून दाखवले. प्रास्ताविक बाळासाहेब गुंजाळ यांनी केले व सूत्रसंचालन बरंठे आणि जान्हवी देवकर यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक