शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विंचूरदळवी विमा ग्राम घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:39 IST

भारतीय जीवन बिमा निगमकडून २०१८-१९ या आर्थिक वर्षात सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी गावातील सुमारे १७८ ग्रामस्थांनी विम्याचा लाभ घेतला. त्यामुळे गावाची वार्षिक हप्त्याची रक्कम १० लाख ४३ हजारावर पोहोचल्याने एलआयसीकडून विंचूर- दळवी ग्रामपंचायतीस गुरुवारी विमा ग्राम घोषित करण्यात आले आहे.

विंचूरदळवी : भारतीय जीवन बिमा निगमकडून २०१८-१९ या आर्थिक वर्षात सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी गावातील सुमारे १७८ ग्रामस्थांनी विम्याचा लाभ घेतला. त्यामुळे गावाची वार्षिक हप्त्याची रक्कम १० लाख ४३ हजारावर पोहोचल्याने एलआयसीकडून विंचूर- दळवी ग्रामपंचायतीस गुरुवारी विमा ग्राम घोषित करण्यात आले आहे.ग्रामपंचायतीस एक लाख रुपये देण्यात येणार आहे. विमा ग्रामचे एक लाख आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे ५० हजार अशा दीड लाखाच्या रकमेतून गावात स्वच्छतागृह बांधण्यात येणार असून, त्याचा शुभारंभही नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.गाव विमा ग्राम घोषित केल्यानंतर विमा फलकाचे अनावरण एलआयसीचे वरिष्ठ विभागीय प्रबंधक तुळशीदास गडपायले, नाशिकरोडचे मुख्य शाखा प्रबंधक राजेंद्र पवार, सिन्नरचे शाखा प्रबंधक समीर नाईक, सचिन कापडणीस, विकास अधिकारी निवृत्ती अरिंगळे, शांताराम गामणे, मुख्य सल्लागार नंदू शेळके, सरपंच संगीता पवार, उपसरपंच भारती दळवी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. दरम्यान एलआयसीच्या अधिकाऱ्यांची फेटे बांधून सजविलेल्या बैलगाडीतून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.मारुती मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या सर्व मान्यवरांचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. विमा ग्रामसाठी महत्त्वाचे योगदान देणारे मुख्य सल्लागार नंदू शेळके, पुष्पा शेळके, दिलीप दळवी, हरिभाऊ दळवी, आरती भोर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संजय गिरी यांनी केले.देशाच्या विकासात हातभारकमी बचत आणि सामान्यांना परवडणारे आणि सुरक्षिततेची हमी असणारे प्लॅन एलआयसीत उपलब्ध आहेत. त्यामुळे खासगी विम्याऐवजी नागरिकांनी एलआयसीत गुंतवणूक करावी. एलआयसीचा पैसा राष्ट्रीय उपक्रमात गुंतविला जातो. त्यामुळे देशाच्या विकासात एकप्रकारे आपला हातभार लागतो, असे प्रतिपादन तुळशीदास गडपायले यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.

टॅग्स :NashikनाशिकLIC square Nagpurएलआयसी चौक, नागपूर