शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

विंचूरदळवी विमा ग्राम घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:39 IST

भारतीय जीवन बिमा निगमकडून २०१८-१९ या आर्थिक वर्षात सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी गावातील सुमारे १७८ ग्रामस्थांनी विम्याचा लाभ घेतला. त्यामुळे गावाची वार्षिक हप्त्याची रक्कम १० लाख ४३ हजारावर पोहोचल्याने एलआयसीकडून विंचूर- दळवी ग्रामपंचायतीस गुरुवारी विमा ग्राम घोषित करण्यात आले आहे.

विंचूरदळवी : भारतीय जीवन बिमा निगमकडून २०१८-१९ या आर्थिक वर्षात सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी गावातील सुमारे १७८ ग्रामस्थांनी विम्याचा लाभ घेतला. त्यामुळे गावाची वार्षिक हप्त्याची रक्कम १० लाख ४३ हजारावर पोहोचल्याने एलआयसीकडून विंचूर- दळवी ग्रामपंचायतीस गुरुवारी विमा ग्राम घोषित करण्यात आले आहे.ग्रामपंचायतीस एक लाख रुपये देण्यात येणार आहे. विमा ग्रामचे एक लाख आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे ५० हजार अशा दीड लाखाच्या रकमेतून गावात स्वच्छतागृह बांधण्यात येणार असून, त्याचा शुभारंभही नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.गाव विमा ग्राम घोषित केल्यानंतर विमा फलकाचे अनावरण एलआयसीचे वरिष्ठ विभागीय प्रबंधक तुळशीदास गडपायले, नाशिकरोडचे मुख्य शाखा प्रबंधक राजेंद्र पवार, सिन्नरचे शाखा प्रबंधक समीर नाईक, सचिन कापडणीस, विकास अधिकारी निवृत्ती अरिंगळे, शांताराम गामणे, मुख्य सल्लागार नंदू शेळके, सरपंच संगीता पवार, उपसरपंच भारती दळवी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. दरम्यान एलआयसीच्या अधिकाऱ्यांची फेटे बांधून सजविलेल्या बैलगाडीतून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.मारुती मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या सर्व मान्यवरांचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. विमा ग्रामसाठी महत्त्वाचे योगदान देणारे मुख्य सल्लागार नंदू शेळके, पुष्पा शेळके, दिलीप दळवी, हरिभाऊ दळवी, आरती भोर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संजय गिरी यांनी केले.देशाच्या विकासात हातभारकमी बचत आणि सामान्यांना परवडणारे आणि सुरक्षिततेची हमी असणारे प्लॅन एलआयसीत उपलब्ध आहेत. त्यामुळे खासगी विम्याऐवजी नागरिकांनी एलआयसीत गुंतवणूक करावी. एलआयसीचा पैसा राष्ट्रीय उपक्रमात गुंतविला जातो. त्यामुळे देशाच्या विकासात एकप्रकारे आपला हातभार लागतो, असे प्रतिपादन तुळशीदास गडपायले यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.

टॅग्स :NashikनाशिकLIC square Nagpurएलआयसी चौक, नागपूर