शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

विंचूरदळवी विमा ग्राम घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:39 IST

भारतीय जीवन बिमा निगमकडून २०१८-१९ या आर्थिक वर्षात सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी गावातील सुमारे १७८ ग्रामस्थांनी विम्याचा लाभ घेतला. त्यामुळे गावाची वार्षिक हप्त्याची रक्कम १० लाख ४३ हजारावर पोहोचल्याने एलआयसीकडून विंचूर- दळवी ग्रामपंचायतीस गुरुवारी विमा ग्राम घोषित करण्यात आले आहे.

विंचूरदळवी : भारतीय जीवन बिमा निगमकडून २०१८-१९ या आर्थिक वर्षात सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी गावातील सुमारे १७८ ग्रामस्थांनी विम्याचा लाभ घेतला. त्यामुळे गावाची वार्षिक हप्त्याची रक्कम १० लाख ४३ हजारावर पोहोचल्याने एलआयसीकडून विंचूर- दळवी ग्रामपंचायतीस गुरुवारी विमा ग्राम घोषित करण्यात आले आहे.ग्रामपंचायतीस एक लाख रुपये देण्यात येणार आहे. विमा ग्रामचे एक लाख आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे ५० हजार अशा दीड लाखाच्या रकमेतून गावात स्वच्छतागृह बांधण्यात येणार असून, त्याचा शुभारंभही नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.गाव विमा ग्राम घोषित केल्यानंतर विमा फलकाचे अनावरण एलआयसीचे वरिष्ठ विभागीय प्रबंधक तुळशीदास गडपायले, नाशिकरोडचे मुख्य शाखा प्रबंधक राजेंद्र पवार, सिन्नरचे शाखा प्रबंधक समीर नाईक, सचिन कापडणीस, विकास अधिकारी निवृत्ती अरिंगळे, शांताराम गामणे, मुख्य सल्लागार नंदू शेळके, सरपंच संगीता पवार, उपसरपंच भारती दळवी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. दरम्यान एलआयसीच्या अधिकाऱ्यांची फेटे बांधून सजविलेल्या बैलगाडीतून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.मारुती मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या सर्व मान्यवरांचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. विमा ग्रामसाठी महत्त्वाचे योगदान देणारे मुख्य सल्लागार नंदू शेळके, पुष्पा शेळके, दिलीप दळवी, हरिभाऊ दळवी, आरती भोर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संजय गिरी यांनी केले.देशाच्या विकासात हातभारकमी बचत आणि सामान्यांना परवडणारे आणि सुरक्षिततेची हमी असणारे प्लॅन एलआयसीत उपलब्ध आहेत. त्यामुळे खासगी विम्याऐवजी नागरिकांनी एलआयसीत गुंतवणूक करावी. एलआयसीचा पैसा राष्ट्रीय उपक्रमात गुंतविला जातो. त्यामुळे देशाच्या विकासात एकप्रकारे आपला हातभार लागतो, असे प्रतिपादन तुळशीदास गडपायले यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.

टॅग्स :NashikनाशिकLIC square Nagpurएलआयसी चौक, नागपूर