शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

पाण्यासाठी एकवटले अवघे गाव !

By admin | Updated: June 19, 2016 23:06 IST

मजले चिंचोली पॅटर्न : मंदिर जीर्णोद्धाराची रक्कम जलसंधारणासाठी; व्हॉट््सअ‍ॅपवर दिल्या जातात बातम्या

 सुदीप गुजराथी नाशिक‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीचा प्रत्यय अहमदनगर जिल्ह्यातील मजले चिंचोली या छोट्याशा गावात सध्या येत आहे. गावाचा पाणीप्रश्न सुटावा, या उद्देशाने अवघे गाव एकवटले असून, लोकवर्गणीतून जलसंधारणाची कामे केली जात आहेत. एवढेच नव्हे, गावातील वीरभद्र मंदिराच्या जीर्णोद्धाराची रक्कमही या कामासाठी वापरली जात असून, हा मौजे मजले चिंचोली पॅटर्न राज्यभरात अनुकरणीय ठरत आहे. अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावरील व शनि शिंगणापूरपासून वीस किलोमीटरवर असलेल्या मजले चिंचोली या गावाची ही चित्तरकथा आहे. अवघ्या सोळाशे लोकसंख्येचे हे गाव अनेक आगळ्या उपक्रमांमुळे चर्चेत आले आहे. जलसंधारण योजनेसाठी संपूर्ण गाव एकत्र आल्याचे दुर्मीळ चित्र तेथे दिसत आहे. त्याची सुरुवात निवृत्त पोलीस अधिकारी डी. वाय. आव्हाड यांच्या सूचनेतून झाली. राज्यभरात शासनाच्या निधीतून जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू असताना, शासनाच्या मदतीची वाट न पाहता ही कामे लोकसहभागातून करण्याची सूचना त्यांनी ग्रामसभेत केली. गावाच्या सरपंच गीतांजली आव्हाड व उपसरपंच धर्मनाथ आव्हाड यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. तेथून या कामासाठी निधी जमवण्याची धडपड सुरू झाली आणि मजले चिंचोली जलजागृती अभियानाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. गीतांजली आव्हाड या गावाच्या पहिल्या महिला सरपंच असून, त्या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पती अविनाश आव्हाड यांच्या साथीने कसोशीने प्रयत्न सुरू केले. याच दरम्यान गावातील धनगर समाजबांधवांनी मंदिर उभारणीसाठी दोन लाख रुपये जमवले होते, तर वीरभद्र मंदिराच्या दानपेटीत बांधकामासाठी चार लाख ८४ हजार रुपये जमा झाले होते. डॉ. योगेश कर्डिले यांच्या प्रयत्नांतून हे सारे पैसे गावाच्या जलजागृती अभियानासाठी देण्यात आले. देवाच्या कामासाठी जमवलेले पैसे सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणण्याचा पायंडाही यानिमित्ताने पडला. आर्ट आॅफ लिव्हिंगचे विजय हाके, अशोका बिल्डकॉनच्या सहकार्यातून गेल्या १० मे रोजी दोन पोकलेन, जेसीबी, डम्पर व ग्रामस्थांच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने अभियानाला प्रारंभ झाला. गेल्या महिनाभरात गावातील वाघोडा नाला, गायमुख तलाव, वीरभद्र तलाव व पिंपळदरा तलावात तब्बल ३३ हजार चौरस मीटर खोदकाम करून खोली वाढवण्यात आली.