शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे गावगाडा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 15:11 IST

सिन्नर : गावाच्या विकासात ग्रामसेवक हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून ग्रामसेवकांच्या सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज ठप्प झाले आहे.

सिन्नर : गावाच्या विकासात ग्रामसेवक हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून ग्रामसेवकांच्या सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज ठप्प झाले आहे. गावपातळीवरील नागरिकांना या आंदोलनामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. राज्यभरातील ग्रामसेकवकांनी २२ आॅगस्टपासून कामबंद आंदोलनाला सुरूवात केली आहे. आपल्या मिनी मंत्रालयाच्या चाव्या गटविकास अधिकारी यांच्या हवाली करण्यात आल्या. अशातच सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकींची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यातच गावातील विकासाची कामे राबविण्याची कामे राबविणारे ग्रामसेवक संपावर गेल्याने विकास कामे ठप्प झाली आहेत. नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना शालेय दाखले, जन्म-मृत्यू दाखले, विविध प्रकारच्या योजनांसाठी लागणारे कागदपत्र मिळत नसल्याने सिन्नर तालुक्यातील गावगाडा विविध कामांशिवाय ठप्प पडला आहे. ग्रामसेवकांनी आपल्या प्रलंबीत मागण्यांसाठी ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन पुकारले, परंतु त्यांच्या आंदोलनाचा शासनस्तरावर विचार करण्यात आला नाही. त्यामुळे महाराष्टÑ राज्य ग्रामसेवक संघाने २२ आॅगस्टपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीच्या चाव्या गटविकास अधिकाऱ्यांच्या ताब्यात देवून राज्यव्यापी कामबंद मध्ये सहभाग घेवून कामबंद आंदोलन पुकारले. ग्रामसेवक संघटनेच्या प्रलंबित मागण्यांमध्ये नोव्हेंबर २००५ नंतर नेमणूक झालेल्या ग्रामसेवक यांनी जुनीपेंशन योजना लागू करावी, विस्तार अधिकारी पदे निर्माण करावी, ग्रामसेवक हे पद रद्द करण्यात येवून या पदाला ग्रामविकास अधिकारी दर्जा देण्यात यावा, १५ हजार लोक संख्येपेक्षा जास्त ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करावे, अन्य विभागांच्या कामांची वाढावी, वेतन त्रुटीत सुधारणा करावी, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची कर्तव्य सूची ठरविण्यात यावी आदी मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. यासंदर्भात शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. यावर मंत्र्यांनी आश्वासन दिले, परंतु आंमलबजावणी झाली नाही. सर्वच ग्रामसेवकांना ही जनतेचे आपल्या वाचून कुठलेही काम आडून राहू नये विद्यार्थ्यांनाही शालेय अडचणी येवू नये व गावाचा विकास थांबू नये, परंतु शासन दरबारी गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या मागण्या आम्ही मांडत आहोत. परंतु दखल घेतली जात नसल्याने आम्हाला नाविलाजाने कामबंद आंदोलन करवा लागले आहे.------------------------------विविध कामांसाठी लागणारी अनेक प्रमाणपत्रे ग्रामसेवकांमार्फत दिली जातात. मात्र संप सुरू झाल्याने अनेक कामे रखडली आहेत. दैनंदिन कार्यालयीन कामकाजात व नागरिकांना महत्वाचे दाखले देण्यात अडचणी येत आहे. शासनाने ग्रामसेवकांच्या मागणीकडे लक्ष देवून ग्रामीण भागात होणारी जनतेचे हाल थांबवावे व लवकरात-लवकर तोडगा काढवा. त्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरूळीत होण्यास मदत होईल-गोपाल शेळके, तालुकाध्यक्ष सरपंच सेवा संघटना, सिन्नर.

टॅग्स :Nashikनाशिक