शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘एक गाव, एक गणपती उत्सवासाठी प्रयत्न’

By admin | Updated: September 8, 2015 23:08 IST

‘एक गाव, एक गणपती उत्सवासाठी प्रयत्न’

निफाड : राज्यात दुष्काळाचे सावट आहे, पाऊस न पडल्याने शेतकरी, मजूरवर्ग कोलमडून पडला आहे. अशा परिस्थितीत आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी व सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निफाड शहरात ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवावी, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी सरपंच भारती कापसे यांनी केले आहे.निफाड शहर व परिसरात यंदा समाधानकारक पाऊसच झाला नाही, याचा परिणाम शेतीसह इतर उद्योगव्यवसायांवर झाला आहे. मजूर, व्यापारीवर्गालाही आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शहरात पैशांची उधळपट्टी करून गल्लोगल्ली सार्वजनिक गणपती बसवले तर ते योग्य ठरणार नाही. निफाडमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून बऱ्याचदा सक्तीने वर्गणी वसूल केली जात असल्याने व्यापारी वर्ग, सर्वसामान्य जनतेत नाराजी असते. आधीच दुष्काळ त्यात महागाई त्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. गणेशोत्सव मंडळातर्फे विद्युत रोषणाई, डेकोरेशन, मिरवणुकीसाठी महागडे बॅण्ड, डीजे यासाठी वारेमाप खर्च केला जातो.अशा दुष्काळी परिस्थितीत गणेशोत्सवाच्या नावाखाली सक्तीची वर्गणी वसुली करून गणेशोत्सव साजरा न करता ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवावी, अशी सूचना कापसे यांनी केली आहे. गणेशोत्सव सर्वानुमते, सर्वांच्या सहभाग व सहकार्याने सामाजिक उपक्रम राबवून साजरा करावा, असे यांनी सांगितले.त्यासाठी निफाड शहरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक व मंडळाचे कार्यकर्ते, प्रशासकीय व पोलीस अधिकारी यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवावा व निफाड शहराचा आदर्श सर्वांसमोर ठेवावा, असे आवाहन कापसे यांनी केले आहे. (वार्ताहर)सिन्नरला शिवाजी चौकात दहीहंडी उत्साहातसिन्नर : येथे शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. दहीहंडी फोडण्यासाठी गोंदेश्वर मित्रमंडळ, नागेश्वर मित्रमंडळ, बजरंग मित्रमंडळाच्या गोविंदांनी हजेरी लावली. पाच थर लावून बजरंग मित्रमंडळाच्या गोविंदांनी दहीहंडी फोडली. त्यांना आयोजकांच्या वतीने रोख पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक संजय नवसे, गौरव कर्पे, योगेश शेजवळ, विकी जाधव, आशिष नवसे, भय्या पेखळे, बापू वैद्य, तुषार क्षत्रिय, अजित गिते, संकल्प जाखडी, संदीप भालेराव आदिंसह तरुण उपस्थित होते. घनश्याम देशमुख, मनीष गुजराथी, हेमंत देवनपल्ली यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)