शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

ग्रामसेवक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 23:50 IST

नाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, ज्या कामांच्या नावाने देयके काढण्यात आली ती कामेच गावात अस्तित्वात नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीच्या आधारे जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीत टोकड्याच्या ग्रामसेवक सुमित्रा पुंजाराम गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देटोकडे ग्रामपंचायतीत गैरव्यवहार : कारवाईसाठी ग्रामस्थ ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, ज्या कामांच्या नावाने देयके काढण्यात आली ती कामेच गावात अस्तित्वात नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीच्या आधारे जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीत टोकड्याच्या ग्रामसेवक सुमित्रा पुंजाराम गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे.या संदर्भात ग्रामपंचायतीतील नागरिकांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांना निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. तथापि, शासकीय पातळीवर वेळकाढूपणा केला जात असल्याने जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीसमोर उपोषण करण्याचा निर्णय घेऊन गावकऱ्यांनी १४ जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. टोकडे ग्रामपंचायतीत सन २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात चौदावा वित्त आयोगाचा मिळालेला निधी तसेच आमदारांच्या विकासकामांच्या निधीतून कामे करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात जागेवर एकही काम अस्तित्वात दिसत नसल्याचे म्हटले आहे. त्यात प्रामुख्याने भगतसिंह सभा मंडप, संगणक कक्ष, चौक सुशोभीकरणाचे एकही काम झालेले नसताना लाखो रुपयांची देयके अदा करण्यात आली आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गावात ३२६ शौचालये बांधून ३९ लाख रुपये खर्च झाल्याचे दाखविले जात असताना त्यापैकी फक्त ५० शौचालयांचा वापर सुरू असून, बºयाच शौचालयांना टाक्या नाहीत, काहींना दरवाजे व भांडेदेखील बसविण्यात आलेले नाहीत. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील व्यक्तींना दोन दोन घरकुले वाटप करण्यात आले असून, गावात करण्यात पाइपलाइनमध्येदेखील गैरव्यवहार झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. इतर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून, अपहाराची रक्कम वसूल करेपर्यंत उपोषण करण्यावर ग्रामस्थ ठाम असल्याचे विठोबा द्यानधान, वसंत शेजवळ, विजयसिंग डिंगर, नितीन सूमराव, जव्हारसिंग संगेडा, हेमंत फरस, नितीन डिंगर, सोपान सुमराव, भगवान रंगी यांनी सांगितले. अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपजिल्हा परिषदेने या तक्रारींची दखल घेत मालेगावचे उपअभियंता व मालेगाव पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांना चौकशीचे आदेश दिले होते, परंतु चौकशी करणारे अधिकारीदेखील जिल्हा परिषदेचे असल्यामुळे ते दोषींना वाचवित असल्याचा आरोप करून त्रयस्थ समितीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तत्पूर्वी जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीत ग्रामसेवक सुमित्रा गायकवाड या दोषी आढळल्याने बुधवारी गट विकास अधिकाºयांनी त्यांना निलंबित केले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतCrime Newsगुन्हेगारी