शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

ग्रामविकास अधिकारी बदलीचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:22 IST

इगतपुरी तालुक्यातील घोटी ग्रापालिकेच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच असल्याने प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देघोटी शहरात बंद : ग्रामस्थांतर्फे इगतपुरी पंचायत समितीसमोर उपोषण; विकासाला खीळ

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील घोटी ग्रापालिकेच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच असल्याने प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.प्रशासनाच्या वतीने ग्रामविकास अधिकारी के. बी. दळवे यांची बदली करण्यात आली. त्यामुळे ग्रामपालिका पदाधिकारी आक्र मक झाले असून, प्रशासनाने घोटी ग्रामविकास अधिकारी यांची बदली रद्द करावी अन्यथा ११ जूनपासून इगतपुरी पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलीच्या निषेधार्थ घोटी शहर बंद ठेवण्यात आले.घोटी ग्रामपालिकेने प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून घोटी ग्रामपालिकेत ग्रामविकास अधिकारी यांच्या बदल्या केल्या जात आहेत. चांगले काम करणाºया उत्तम शेटे, ए. एस. चौधरी यांच्या बदल्या झाल्या. पाच महिन्यांपूर्वी के. बी. दळवे यांच्याकडे घोटी ग्रामपालिकेच्या ग्रामविकास अधिकारीपदाचा कार्यभार देण्यात आला. त्यांनी उत्तम सेवा दिली. तसेच घोटी शहराच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी विविध कामांचे नियोजन केले असून, शहराच्या मूलभूत सुविधा व सेवा देण्यात ते मोलाची भूमिका बजावत आहेत, असे असताना प्रशासनाने त्यांची बदली केल्याने घोटी शहरात विकासकामांवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे ही बदली तत्काळ रद्द करण्याची मागणी प्रभारी सरपंच संजय आरोटे यांच्यासह सदस्य रामदास भोर, सचिन गोणके, रवींद्र तारडे, गणेश गोडे आदींनी केली आहे.

वर्षभरात घोटी ग्रामपालिकेत कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी उत्तम शेटे यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर ए. एस. चौधरी यांची नेमणूक झाली. तेही चांगले काम करीत असताना सहा महिन्यांत त्यांचीही बदली करण्यात आली. त्यानंतर पाच महिन्यांपूर्वीच के. बी. दळवे यांची नियुक्ती करण्यात आली. आता त्यांच्याकडूनही घोटीचा कार्यभार काढून घेऊन रवींद्र धुंदाळे यांच्याकडे देण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे आम्ही ग्रामविकास अधिकारी दळवे यांची बदली रद्द करावी, घोटीचा कार्यभार व मुख्यालय त्यांच्याकडेच द्यावे या मागणीसाठी शहर बंद ठेवून बेमुदत उपोषण करणार आहोत.- संजय आरोटे, प्रभारी सरपंच, घोटी

घोटी ग्रामपालिकेत वरिष्ठ प्रशासनाकडून वर्षभरात तीन ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामुळे घोटी शहराच्या विकासाला अनेक अडचणी निर्माण होत आहेत. विद्यमान ग्रामविकास अधिकारी के. बी. दळवे यांच्याकडून चांगले काम व घोटी शहराच्या विकासात हातभार लागत असतानाच त्यांच्याकडून अल्प कालावधीत कार्यभार काढून घेतला आहे. ग्रामविकास अधिकारी दळवे यांच्याकडेच घोटी ग्रामपालिकेच्या ग्रामविकास अधिकारीपदाचा कार्यभार कायम करण्यात यावा.- रामदास भोर, ग्रामपालिका सदस्य, घोटी

टॅग्स :Governmentसरकार