शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

ग्रामविकास अधिकारी बदलीचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:22 IST

इगतपुरी तालुक्यातील घोटी ग्रापालिकेच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच असल्याने प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देघोटी शहरात बंद : ग्रामस्थांतर्फे इगतपुरी पंचायत समितीसमोर उपोषण; विकासाला खीळ

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील घोटी ग्रापालिकेच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच असल्याने प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.प्रशासनाच्या वतीने ग्रामविकास अधिकारी के. बी. दळवे यांची बदली करण्यात आली. त्यामुळे ग्रामपालिका पदाधिकारी आक्र मक झाले असून, प्रशासनाने घोटी ग्रामविकास अधिकारी यांची बदली रद्द करावी अन्यथा ११ जूनपासून इगतपुरी पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलीच्या निषेधार्थ घोटी शहर बंद ठेवण्यात आले.घोटी ग्रामपालिकेने प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून घोटी ग्रामपालिकेत ग्रामविकास अधिकारी यांच्या बदल्या केल्या जात आहेत. चांगले काम करणाºया उत्तम शेटे, ए. एस. चौधरी यांच्या बदल्या झाल्या. पाच महिन्यांपूर्वी के. बी. दळवे यांच्याकडे घोटी ग्रामपालिकेच्या ग्रामविकास अधिकारीपदाचा कार्यभार देण्यात आला. त्यांनी उत्तम सेवा दिली. तसेच घोटी शहराच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी विविध कामांचे नियोजन केले असून, शहराच्या मूलभूत सुविधा व सेवा देण्यात ते मोलाची भूमिका बजावत आहेत, असे असताना प्रशासनाने त्यांची बदली केल्याने घोटी शहरात विकासकामांवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे ही बदली तत्काळ रद्द करण्याची मागणी प्रभारी सरपंच संजय आरोटे यांच्यासह सदस्य रामदास भोर, सचिन गोणके, रवींद्र तारडे, गणेश गोडे आदींनी केली आहे.

वर्षभरात घोटी ग्रामपालिकेत कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी उत्तम शेटे यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर ए. एस. चौधरी यांची नेमणूक झाली. तेही चांगले काम करीत असताना सहा महिन्यांत त्यांचीही बदली करण्यात आली. त्यानंतर पाच महिन्यांपूर्वीच के. बी. दळवे यांची नियुक्ती करण्यात आली. आता त्यांच्याकडूनही घोटीचा कार्यभार काढून घेऊन रवींद्र धुंदाळे यांच्याकडे देण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे आम्ही ग्रामविकास अधिकारी दळवे यांची बदली रद्द करावी, घोटीचा कार्यभार व मुख्यालय त्यांच्याकडेच द्यावे या मागणीसाठी शहर बंद ठेवून बेमुदत उपोषण करणार आहोत.- संजय आरोटे, प्रभारी सरपंच, घोटी

घोटी ग्रामपालिकेत वरिष्ठ प्रशासनाकडून वर्षभरात तीन ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामुळे घोटी शहराच्या विकासाला अनेक अडचणी निर्माण होत आहेत. विद्यमान ग्रामविकास अधिकारी के. बी. दळवे यांच्याकडून चांगले काम व घोटी शहराच्या विकासात हातभार लागत असतानाच त्यांच्याकडून अल्प कालावधीत कार्यभार काढून घेतला आहे. ग्रामविकास अधिकारी दळवे यांच्याकडेच घोटी ग्रामपालिकेच्या ग्रामविकास अधिकारीपदाचा कार्यभार कायम करण्यात यावा.- रामदास भोर, ग्रामपालिका सदस्य, घोटी

टॅग्स :Governmentसरकार