शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कळवणला गावांचा संपर्क तुटला

By admin | Updated: August 4, 2016 00:49 IST

नद्यांना पूर, पूल तुटले, फरशीचे भराव वाहून गेले, रस्ते खचले, तालुक्यातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे

कळवण : तालुक्यातील धरण लाभक्षेत्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने आदिवासी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, नदी- नाल्यावरील पूल तुटले, फरशीचे भराव वाहून गेले, रस्ते वाहून गेल्याने साकोरे भागातील तसेच भौती, उंबरदे, ततानी, शेपूपाडा, जिरवाडे, शृंगारवाडी, वीरशेत, मांगलीदर आदि भागातील आदिवासी जनतेचा आणि गावांचा संपर्कतुटला आहे.चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून हजारो क्यूसेक पूरपाणी सोडण्यात आले असून, गोबापूर, नांदुरी, बोरदैवत, धार्डे दिगर, मळगाव चिंचपाडा, भांडणे, खिराड, मार्कंड पिंप्री, धनोली, भेगू, जामले वणी, ओतूर आदि लघुपाटबंधारे प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन लघुपाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. पूरपाणी नदीपात्रात सोडण्यात आले असल्याने कळवण, तालुक्यात गिरणा, पुनंद, बेहडी, तांबडी नद्यांना यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर आल्याने या नद्यांवरील सर्व पूल वाहून गेले आहेत, भराव वाहून गेले तर काही ठिकाणी रस्तेच गायब झाल्याने पायी वाटचाल करणेदेखील जनतेला अवघड होऊन बसले आहे.साकोरे येथील बंधारा वाहून गेल्याने या बंधाऱ्यालगत असलेल्या साकोरे येथील ५० शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतमाल घेऊन जाणे अवघड होऊन बसले आहे. साकोरे येथील महादेव मंदिराकडील रस्ता नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साकोरे येथील वाहून गेलेल्या बंधाऱ्याची व रस्त्याची चौकशी केली नसल्याने साकोरे येथील शेतकरी गोरख देवरे यांनी नाराजी व्यक्त करीत गावाशी संपर्क साधण्यासाठी रस्ता दुरूस्त करून देण्याची मागणी केली आहे.कळवण तालुक्यातील आदिवासी व दुर्गम अतिदुर्गम भागातील रस्ते उखडून गेले आहेत. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. संपूर्ण तालुका खड्डेमय झाला असून, डोंगर उतावरील पाण्याबरोबर मातीदेखील वाहून येत असल्याने रस्ते चिखलमय झाले असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. डोंगर उतारावरील रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ते बंद झाले असून, संपर्क तुटला आहे. गावागावांच्या नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. डोंगर उतारावरून येणाऱ्या पाण्यामुळे व नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे नाल्यावरील फरश्यादेखील वाहून गेल्या आहेत.आदिवासी भागातील भौती- उंबरदे रस्त्यावरील पुनंद नदीवरील पूल तुटल्याने आदिवासी गावांचा व पाड्यांचा संपर्क तुटला आहे. तांबड्या नदीच्या पुलावरील भराव वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला असून, तताणी- शेपूपाडा रस्त्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूचे भरावदेखील वाहून गेल्याने या भागातील दहा ते बारा गाव, खेड्यापाड्यातील आदिवासी जनतेचा अन्य गावांशी संपर्क तुटला आहे, तर शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना रस्ते बंद झाल्याने शाळा, महाविद्यालयातील शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. (वार्ताहर)