शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कळवणला गावांचा संपर्क तुटला

By admin | Updated: August 4, 2016 00:49 IST

नद्यांना पूर, पूल तुटले, फरशीचे भराव वाहून गेले, रस्ते खचले, तालुक्यातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे

कळवण : तालुक्यातील धरण लाभक्षेत्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने आदिवासी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, नदी- नाल्यावरील पूल तुटले, फरशीचे भराव वाहून गेले, रस्ते वाहून गेल्याने साकोरे भागातील तसेच भौती, उंबरदे, ततानी, शेपूपाडा, जिरवाडे, शृंगारवाडी, वीरशेत, मांगलीदर आदि भागातील आदिवासी जनतेचा आणि गावांचा संपर्कतुटला आहे.चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून हजारो क्यूसेक पूरपाणी सोडण्यात आले असून, गोबापूर, नांदुरी, बोरदैवत, धार्डे दिगर, मळगाव चिंचपाडा, भांडणे, खिराड, मार्कंड पिंप्री, धनोली, भेगू, जामले वणी, ओतूर आदि लघुपाटबंधारे प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन लघुपाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. पूरपाणी नदीपात्रात सोडण्यात आले असल्याने कळवण, तालुक्यात गिरणा, पुनंद, बेहडी, तांबडी नद्यांना यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर आल्याने या नद्यांवरील सर्व पूल वाहून गेले आहेत, भराव वाहून गेले तर काही ठिकाणी रस्तेच गायब झाल्याने पायी वाटचाल करणेदेखील जनतेला अवघड होऊन बसले आहे.साकोरे येथील बंधारा वाहून गेल्याने या बंधाऱ्यालगत असलेल्या साकोरे येथील ५० शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतमाल घेऊन जाणे अवघड होऊन बसले आहे. साकोरे येथील महादेव मंदिराकडील रस्ता नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साकोरे येथील वाहून गेलेल्या बंधाऱ्याची व रस्त्याची चौकशी केली नसल्याने साकोरे येथील शेतकरी गोरख देवरे यांनी नाराजी व्यक्त करीत गावाशी संपर्क साधण्यासाठी रस्ता दुरूस्त करून देण्याची मागणी केली आहे.कळवण तालुक्यातील आदिवासी व दुर्गम अतिदुर्गम भागातील रस्ते उखडून गेले आहेत. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. संपूर्ण तालुका खड्डेमय झाला असून, डोंगर उतावरील पाण्याबरोबर मातीदेखील वाहून येत असल्याने रस्ते चिखलमय झाले असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. डोंगर उतारावरील रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ते बंद झाले असून, संपर्क तुटला आहे. गावागावांच्या नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. डोंगर उतारावरून येणाऱ्या पाण्यामुळे व नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे नाल्यावरील फरश्यादेखील वाहून गेल्या आहेत.आदिवासी भागातील भौती- उंबरदे रस्त्यावरील पुनंद नदीवरील पूल तुटल्याने आदिवासी गावांचा व पाड्यांचा संपर्क तुटला आहे. तांबड्या नदीच्या पुलावरील भराव वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला असून, तताणी- शेपूपाडा रस्त्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूचे भरावदेखील वाहून गेल्याने या भागातील दहा ते बारा गाव, खेड्यापाड्यातील आदिवासी जनतेचा अन्य गावांशी संपर्क तुटला आहे, तर शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना रस्ते बंद झाल्याने शाळा, महाविद्यालयातील शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. (वार्ताहर)