शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

रोहित्र जळाल्याने औंदाणे गाव अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 16:51 IST

महावितरणचे दुर्लक्ष : पीठगिरण्यांसह पाणीपुरवठाही बंद

ठळक मुद्देवीज कंपनीने तात्पुरत्या स्वरूपात काही स्वरुपात यंत्रणा सुरू केली परंतु, ती कधी गुल होईल याचा अंदाज नाही.

औदाणे : येथील गावाला सिंगल फेज योजनेचा पुरवठा करणाऱ्या विजेच्या ट्रान्सफार्मर जळून बिघाड झाल्याने गाव पंधरा दिवसांपासून अंधारात आहे. येथील गावकऱ्यांच्या विद्युत मोटारींसह पिठाच्या गिरण्या बंद असून त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. वीज कंपनीकडून याबाबत दखल घेतली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहेयेथील गावात सिंगल फेज योजना असून विद्युत रोहित्रात बिघाड होऊन ते जळाले. वीज कंपनीने तात्पुरत्या स्वरूपात काही स्वरुपात यंत्रणा सुरू केली परंतु, ती कधी गुल होईल याचा अंदाज नाही. सिंगल फेज योजना पूर्ण कार्यान्वित नसल्याने विद्युत मोटारी, पाणीपुरवठा यासह पिठाच्या गिरण्या बंद असून दळणासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून गाव पूर्ण अंधारात आहे. गावात आदिवासी वस्ती मोठी असून ही वस्ती हत्ती नदीच्या काठावर वास्तव्यास आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना अंधारात जीव मुठीत धरुन राहावे लागत आहे. महावितरणला यासंदर्भात माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.रोहित्रात बिघाडरोहित्रात बिघाड झाल्याची माहिती महावितरण कंपनीला देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. रोहित्रात तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती करण्यात आली परंतु, त्याचाही भरवसा नाही. त्यामुळे पुर्ण सिंगलफेज योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे.- सविता निकम, सरपंच

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण