शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

विल्होळी-बेळगाव ढगा रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:46 IST

रस्त्याच्या कामासाठी खडी मिळत नाही, शिवाय कामगार निवडणूक व लग्नसराईत गुंतल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून विल्होळी ते बेळगाव ढगा रस्त्याचे काम अर्धवट बंद पडले

विल्होळी : रस्त्याच्या कामासाठी खडी मिळत नाही, शिवाय कामगार निवडणूक व लग्नसराईत गुंतल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून विल्होळी ते बेळगाव ढगा रस्त्याचे काम अर्धवट बंद पडले असून, अर्धवट झालेल्या या कामांमुळे रस्त्यावरील धूळ रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या अन्न- पाण्यात जात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यात टाकण्यात आलेल्या खडीमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेक जखमी झाले आहेत. सदर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून डांबरीकरण करावे, अशी मागणी विल्होळी व बेलगाव ढगा येथील ग्रामस्थांनी केली आहे.विल्होळी-बेळगाव या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असून, पावसाळ्यापूर्वी सदरचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु गेल्या महिन्यापासून अचानक काम बंद पडले असून, रस्त्याच्या कडेला साहित्य तसेच पडून आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, ठेकेदार दाद देत नसल्याने त्याचा खुलासा होऊ शकला नाही, तथापि चौकशीअंती बाजारात खडीचा तुटवडा निर्माण झाला आहे.खडी मिळत नसल्याने काम बंदरस्त्याच्या कामासाठी साहित्याची टंचाई निर्माण झाली आहे. खडी मिळत नसल्याने ठेकेदाराने काम बंद केले. त्याचबरोबर निवडणूक व लग्नसराईमुळेदेखील कामगार गावाकडे निघून गेल्याने काम सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अर्धवट रस्त्यामुळे मात्र रस्त्याच्या कडेला राहणाºया शेतकरी, कंपन्यांच्या गुदाममधील कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अर्धवट कामामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. प्रचंड धूळ असल्याने नागरिकांना राहणे मुश्किल झाले आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.पावसाळ्याच्या आत रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण व्हावे. एक महिन्यापासून रस्त्याचे काम बंद आहे. ठेकेदारास फोन केला असता, ते फोन उचलत नाहीत. याकडे बांधकाम खात्याने लक्ष देऊन काम त्वरित चालू करावे. पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचून चिखल तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने काम पूर्ण व्हावे.- दत्तात्रय ढगे, सरपंच, बेळगाव ढगादहा ते पंधरा दिवसांपासून काम बंद आहे. खडी उपलब्ध नाही. काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. कामगार लग्नासाठी बाहेरगावी गेल्यामुळे काम बंद आहे. येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम चालू होईल, परंतु डांबरीकरण पावसाळ्यानंतर होईल.- यश खैरनार, ठेकेदार

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा