शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

विल्होळी-बेळगाव ढगा रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:46 IST

रस्त्याच्या कामासाठी खडी मिळत नाही, शिवाय कामगार निवडणूक व लग्नसराईत गुंतल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून विल्होळी ते बेळगाव ढगा रस्त्याचे काम अर्धवट बंद पडले

विल्होळी : रस्त्याच्या कामासाठी खडी मिळत नाही, शिवाय कामगार निवडणूक व लग्नसराईत गुंतल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून विल्होळी ते बेळगाव ढगा रस्त्याचे काम अर्धवट बंद पडले असून, अर्धवट झालेल्या या कामांमुळे रस्त्यावरील धूळ रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या अन्न- पाण्यात जात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यात टाकण्यात आलेल्या खडीमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेक जखमी झाले आहेत. सदर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून डांबरीकरण करावे, अशी मागणी विल्होळी व बेलगाव ढगा येथील ग्रामस्थांनी केली आहे.विल्होळी-बेळगाव या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असून, पावसाळ्यापूर्वी सदरचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु गेल्या महिन्यापासून अचानक काम बंद पडले असून, रस्त्याच्या कडेला साहित्य तसेच पडून आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, ठेकेदार दाद देत नसल्याने त्याचा खुलासा होऊ शकला नाही, तथापि चौकशीअंती बाजारात खडीचा तुटवडा निर्माण झाला आहे.खडी मिळत नसल्याने काम बंदरस्त्याच्या कामासाठी साहित्याची टंचाई निर्माण झाली आहे. खडी मिळत नसल्याने ठेकेदाराने काम बंद केले. त्याचबरोबर निवडणूक व लग्नसराईमुळेदेखील कामगार गावाकडे निघून गेल्याने काम सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अर्धवट रस्त्यामुळे मात्र रस्त्याच्या कडेला राहणाºया शेतकरी, कंपन्यांच्या गुदाममधील कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अर्धवट कामामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. प्रचंड धूळ असल्याने नागरिकांना राहणे मुश्किल झाले आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.पावसाळ्याच्या आत रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण व्हावे. एक महिन्यापासून रस्त्याचे काम बंद आहे. ठेकेदारास फोन केला असता, ते फोन उचलत नाहीत. याकडे बांधकाम खात्याने लक्ष देऊन काम त्वरित चालू करावे. पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचून चिखल तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने काम पूर्ण व्हावे.- दत्तात्रय ढगे, सरपंच, बेळगाव ढगादहा ते पंधरा दिवसांपासून काम बंद आहे. खडी उपलब्ध नाही. काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. कामगार लग्नासाठी बाहेरगावी गेल्यामुळे काम बंद आहे. येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम चालू होईल, परंतु डांबरीकरण पावसाळ्यानंतर होईल.- यश खैरनार, ठेकेदार

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा