शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

विल्होळी-बेळगाव ढगा रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:46 IST

रस्त्याच्या कामासाठी खडी मिळत नाही, शिवाय कामगार निवडणूक व लग्नसराईत गुंतल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून विल्होळी ते बेळगाव ढगा रस्त्याचे काम अर्धवट बंद पडले

विल्होळी : रस्त्याच्या कामासाठी खडी मिळत नाही, शिवाय कामगार निवडणूक व लग्नसराईत गुंतल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून विल्होळी ते बेळगाव ढगा रस्त्याचे काम अर्धवट बंद पडले असून, अर्धवट झालेल्या या कामांमुळे रस्त्यावरील धूळ रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या अन्न- पाण्यात जात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यात टाकण्यात आलेल्या खडीमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेक जखमी झाले आहेत. सदर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून डांबरीकरण करावे, अशी मागणी विल्होळी व बेलगाव ढगा येथील ग्रामस्थांनी केली आहे.विल्होळी-बेळगाव या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असून, पावसाळ्यापूर्वी सदरचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु गेल्या महिन्यापासून अचानक काम बंद पडले असून, रस्त्याच्या कडेला साहित्य तसेच पडून आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, ठेकेदार दाद देत नसल्याने त्याचा खुलासा होऊ शकला नाही, तथापि चौकशीअंती बाजारात खडीचा तुटवडा निर्माण झाला आहे.खडी मिळत नसल्याने काम बंदरस्त्याच्या कामासाठी साहित्याची टंचाई निर्माण झाली आहे. खडी मिळत नसल्याने ठेकेदाराने काम बंद केले. त्याचबरोबर निवडणूक व लग्नसराईमुळेदेखील कामगार गावाकडे निघून गेल्याने काम सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अर्धवट रस्त्यामुळे मात्र रस्त्याच्या कडेला राहणाºया शेतकरी, कंपन्यांच्या गुदाममधील कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अर्धवट कामामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. प्रचंड धूळ असल्याने नागरिकांना राहणे मुश्किल झाले आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.पावसाळ्याच्या आत रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण व्हावे. एक महिन्यापासून रस्त्याचे काम बंद आहे. ठेकेदारास फोन केला असता, ते फोन उचलत नाहीत. याकडे बांधकाम खात्याने लक्ष देऊन काम त्वरित चालू करावे. पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचून चिखल तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने काम पूर्ण व्हावे.- दत्तात्रय ढगे, सरपंच, बेळगाव ढगादहा ते पंधरा दिवसांपासून काम बंद आहे. खडी उपलब्ध नाही. काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. कामगार लग्नासाठी बाहेरगावी गेल्यामुळे काम बंद आहे. येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम चालू होईल, परंतु डांबरीकरण पावसाळ्यानंतर होईल.- यश खैरनार, ठेकेदार

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा