शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

केवळ आठ अपक्षांना विजयश्री

By admin | Updated: February 26, 2017 00:35 IST

पंचायत समिती निवडणूक : निफाड तालुक्यात तीन, तर सटाण्यात दोघांचे यश

नाशिक : जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबत एकूण १३४ अपक्ष उमेदवारांनी आपले राजकीय भवितव्य आजमावले. अपक्ष उमेदवारांची संख्या तीन आकडी असली तरी यापैकी केवळ आठच अपक्ष उमेदवार विजय मिळवू शकले.  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी झाल्यानंतर अनेक धक्कादायक निकाल लागले. या निकालांमुळे तालुका तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली असल्याचे दिसून आले. राज्यात शिवसेना, भाजपा युतीचे सरकार असल्यामुळे महापालिकांप्रमाणेच पंचायत समिती निवडणुकीसाठी या पक्षांकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोठी होती. काहींनी तर पक्षाचे तिकीट आपल्यालाच मिळेल या विश्वासाने निवडणुकीपूर्वीच गणात संपर्क दौरे सुरू केले होते, मात्र ऐनवेळी काहींची उमेदवारी नाकारली गेल्याने त्यांचा हिरमोड झाला. पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने काहींनी थांबने पसंत केले तर काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. याशिवाय इतरही स्वयंघोषित नेते आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने अपक्ष उमेदवारांची संख्या वाढली गेली.  अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या १५ गणांमधील एकूण १३४ उमेदवारांपैकी केवळ आठ जणांना मतदारांनी पंचायत समित्यांमध्ये पोहोचविले. या आठ जणांमध्ये पंडित चैत्राम अहिरे मानूर गण, ता.सटाणा, केदूबाई राजू सोनवणे पठावे दिगर गण, उत्तम बाजीराव जाधव, अहिवंतवाडी गण, ता.दिंडोरी, नितीन प्रभाकर जाधव, ओझरटाऊनशिप गण, नितीन सीताराम पवार, ओझर गण, गुरुदेव द्वारकानाथ कांदे, खेडलेझुंगे गण (तीनही ता. निफाड), मोतीराम किसन दिवे, वाघेरा गण, ता. त्र्यंबकेश्वर, विजय जगताप एकलहरे गण, ता. नाशिक यांचा समावेश आहे.  अपक्ष म्हणून आपले राजकीय भवितव्य आजमावणाऱ्या अनेक उमेदवारांना मिळालेली मते पाहाता अनेकांना आपली अनामत रक्कमही वाचविता आली नाही. ५० अपक्षांना चार आकडीत, तर ७२ जणांना तिहेरी संख्येत मते मिळाली. सहा जणांना तर केवळ दोन अंकी मतांच्या संख्येवर समाधान मानावे लागले. दिंडोरी तालुक्यातील मडकीजाम गणातील अपक्ष उमेदवार बापुराव पांडुरंग मालसाने यांना तर संपूर्ण गणातून केवळ ३० मते मिळाली आहेत. (प्रतिनिधी)मालेगाव : २० अपक्ष होते रिंगणातअपक्ष उमेदवारांसाठी सर्वाधिक संख्या मालेगाव तालुक्यात (२०) होती. सर्वात कमी संख्या पेठ तालुक्यात (१) होती. जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असणाऱ्या निफाड तालुक्यात तीन गणांमध्ये अपक्ष उमेदवारांनी विजय मिळविला आहे. त्याखालोखाल सटाणा तालुका असून, येथे दोन गणांमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे त्यात एका महिला उमेदवाराचा समावेश आहे. अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळविणाऱ्या जिल्ह्यातील त्या एकमेव उमेदवार आहेत.