शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

बेरवळ बंधारा क्षेत्रात सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 16:45 IST

धोकादायक स्थितीत : निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी

ठळक मुद्देपाठीमागील बाजुतील माती खचल्याने तसेच आतून भागातून पाणी वाहू लागल्याने मागील भाग मोठ्या प्रमाणात खचला आहे.

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेरवळ येथील पाझरतलावाचा मुख्य बांध खचल्याने धोकादायक स्थितीत असलेल्या या पाझरतलाव क्षेत्रातील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, या पाझर तलाव बाबत इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी राहुल पाटील,तहसीलदार दीपक गिरासे तळ ठोकून आहेत; सांडव्यावाटे पाणी पातळी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.बेरवळ येथे सन १९८०-८१ च्या दरम्यान पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. सलग दोन वेळा या पाझर तलावाची लाखो रु पये खर्च करून दुरु स्ती करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच यावर्षी या पाझर तलावाच्या मुख्य बांधावर माती टाकण्यात आल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या संततधार पावसाने या पाझर तलावाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. पाझरतलावाच्या सांडीद्वारे पाण्याचा स्त्रोत मोठ्या प्रमाणात असूनही अखेर पाझर तलावाच्या मुख्य बांधावरील पाठीमागील बाजुतील माती खचल्याने तसेच आतून भागातून पाणी वाहू लागल्याने मागील भाग मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे पाझरतलाव परिक्षेत्रातील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.कारवाई होणार काय ?प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी या दुरवस्थेतील पाझर तलावाची तहसीलदार दीपक गिरासे,लपा विभागाचे अभियंता यांच्या समवेत पाहणी केली. या पाहणीत पाझरतलाव दुरु स्तीच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली. पाझर तलावाला पुढील आणि मागील बाजूस दगडाची पिचिंग नसल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार या पाझरतलावाची जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत दोन वेळा दुरूस्ती करण्यात आली आहे. मात्र ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांचे साटेलोटे असल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून संबंधित दोषींवर कारवाई होणार काय, असा प्रश्न सरपंच प्रकाश मौळे यांनी केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक