शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांच्या धडाक्याने पक्ष्यांचा बळी

By admin | Updated: November 15, 2015 23:25 IST

निसर्गाची हानी : शेकडो पक्षी पडतात मृत्युमुखी, नाशिकमध्ये सोशल मीडियावर चळवळ सुरू

फटाक्यांच्या धडाक्याने पक्ष्यांचा बळीनिसर्गाची हानी : शेकडो पक्षी पडतात मृत्युमुखी, नाशिकमध्ये सोशल मीडियावर चळवळ सुरूअझहर शेख ल्ल नाशिकदीपावलीचा सण हा सर्वांत मोठा उत्सव असला तरी तो जल्लोषात साजरा करताना पर्यावरणपूरकच साजरा करावा यासाठी भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण सर्वत्र फटाक्यांच्या धडाक्यामुळे होणारे प्रदूषण हे मानवी आरोग्यास अपायकारक ठरतेच, परंतु त्यापेक्षाही भीषण प्रकार पशु-पक्ष्यांच्या बाबतीत घडतात. यंदाही दिवाळीत झालेल्या आतषबाजीमुळे शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागल्याचे पर्यावरणप्रेमींच्या निरीक्षणातून समोर आले आहे. सण- उत्सव साजरे करताना सजीवसृष्टीला अपायकारक ठरणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यातूनच अनेक पर्यावरणप्रेमींनी मकर संक्रांतीच्या वेळी पतंगोत्सवासाठी नायलॉन बंदीसाठी विविध स्तरांवर केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. तरीही चोरी-छुप्या पद्धतीने वापरण्यात येणाऱ्या मांजामुळे पक्षी जायबंदी होतात. आताही दिवाळीत फटाक्यांच्या धुमधडाक्यामुळे पक्ष्यांना हादरे सहन करावे लागत आहेत. शांत निसर्गरम्य वातावरणात जीवन जगणारा सजीव म्हणजे पक्षी. पक्ष्यांना फटाक्यांचा आवाज किंबहुना मोठ्या आवाजाची अजिबात सवयच नसते. त्यामुळे प्रकाशाच्या दीपावलीचा उत्सव सुरू झाला की फटाक्यांचे आवाज आणि त्याद्वारे होणारे वायू प्रदूषण पक्ष्यांच्या जिवावर बेतणारे ठरते. पक्ष्यांचा अधिवास असलेल्या झाडांच्या परिसरात अचानकपणे फटाके फुटू लागताच पक्षी बिथरतात आणि घबराट होऊन काही मृत्युमुखी पडतात, तर काही आवाजापासून लांब जाण्यासाठी रात्रीच्या अंधाराची पर्वा न करता भरारी घेतात; मात्र त्यांची ही भरारीदेखील जीवघेणी ठरते. कारण रात्रीच्या अंधारामुुळे विहार करताना अडथळ्यांचा अंदाज पक्ष्यांना येत नाही. परिणामी कृत्रिम अडथळ्यांवर आदळ-आपट होऊन पक्षी जमिनीवर कोसळतात. दरवर्षी दिवाळीच्या काळात मोठ्या संख्येने पक्षी बेघर होतात, तर काही मृत्युमुखी पडतात आणि बहुसंख्य पक्ष्यांना कायमस्वरूपी बहिरेपणाचाही सामना करावा लागतो; मात्र या सर्व धोक्यांचा स्वार्थी मानवप्राण्याकडून कसलाही विचार होताना दिसत नाही. क्षणभराचा फटाक्यांचा आनंद अनेक पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरतो. नाशिकमध्ये यासंदर्भात अनेक संस्थांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिला आहे. त्यामुळे आता पक्षिप्रेमींनी याबाबत मोहिमा राबविण्याची गरज असून तशी चळवळ नाशिकमध्ये सुरू करण्यात आल्याचे पक्षीमित्रांनी सांगितले.