शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

खड्डेयुक्त रस्ते घेतोत लालपरीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 18:31 IST

देशातील प्रत्येक गाव-खेडे रस्त्यांनी जोडले गेले पाहिजे या उदात्त हेतूने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित करण्यात आली. याचा सर्वाधिक लाभ पेठ तालुक्यातील वाड्या-वस्त्यांना झाला. मात्र त्यानंतरच्या काळात देखभाल व दुरुस्ती अभावी या रस्त्यांची दयनिय झाल्याने सद्य:स्थितीत तालुक्यातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था आहे.

पेठ : देशातील प्रत्येक गाव-खेडे रस्त्यांनी जोडले गेले पाहिजे या उदात्त हेतूने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित करण्यात आली. याचा सर्वाधिक लाभ पेठ तालुक्यातील वाड्या-वस्त्यांना झाला. मात्र त्यानंतरच्या काळात देखभाल व दुरुस्ती अभावी या रस्त्यांची दयनिय झाल्याने सद्य:स्थितीत तालुक्यातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था आहे. यात वाहनांचा प्रथम बळी जात आहे.स्थळ - पाहूची बारी रस्ता ( फोटो -08 सप्टेंबरपेठ 03)पेठहून सायंकाळी सुटणारी पेठ-पाहूची बारी ही शेवटची लांब पल्ल्याची बस. सर्व खासगी वाहने निघून गेल्यावर अंबापूर, कोपुर्ली, खिरकडे, तिर्ढ, जोगमोडी, माळेगाव, म्हसगण, आंबे यासह २० ते २५ गावांसाठी ही शेवटची बस. थांब्यांची संख्या जास्त असल्याने कधी कधी पाहूची बारीला पोहोचायला या बसला रात्री १० वाजतात. त्यातच काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास जागमोडी जवळ ही बस पंक्चर झाल्याने अंधारात प्रवाशांना ताटकळून रहावे लागले. गाडीत अनेक महिला व शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याने तासन् तास खोळंबा होत असल्याने याचे सर्व खापर खड्डेयुक्त रस्त्यांवर येऊन फुटते. अनेक प्रवाशांना मुख्य रस्त्यावर उतरून चार ते पाच किमी पायी जावे लागते.गाडीत बसा... पण नाशिक पोहोचेलच असे नाहीमहाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची तर अतिशय दयनिय अवस्था झाली आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याचे रु ंदीकरण सुरू असताना पर्यायी रस्तेच नसल्याने वाहनधारकांना खड्डे व गाळातून कसरत करत मार्गक्र मण करण्याची वेळ आली आहे. याचाही सर्वाधिक त्रास लालपरीलाच सहन करावा लागत आहे. पेठ आगारातून सुटणारी नाशिक बस नाशिकला पोहोचेल की नाही याची धास्ती प्रवाशांना असते. पेठ ते नाशिक या ५५ किमी अंतरात दररोज दोन तरी बसेस नादुरु स्त होऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दिसतात. म्हणजे बसमध्ये बसा, तिकिटाचे पैसेही द्या मात्र तुम्ही नाशिकला पोहोचालच याची खात्री नाही. त्यातच बºयाच ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनधारकांमध्ये खटके उडण्याचे प्रसंग घडत आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकstate transportराज्य परीवहन महामंडळ