शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

खड्डेयुक्त रस्ते घेतोत लालपरीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 18:31 IST

देशातील प्रत्येक गाव-खेडे रस्त्यांनी जोडले गेले पाहिजे या उदात्त हेतूने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित करण्यात आली. याचा सर्वाधिक लाभ पेठ तालुक्यातील वाड्या-वस्त्यांना झाला. मात्र त्यानंतरच्या काळात देखभाल व दुरुस्ती अभावी या रस्त्यांची दयनिय झाल्याने सद्य:स्थितीत तालुक्यातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था आहे.

पेठ : देशातील प्रत्येक गाव-खेडे रस्त्यांनी जोडले गेले पाहिजे या उदात्त हेतूने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित करण्यात आली. याचा सर्वाधिक लाभ पेठ तालुक्यातील वाड्या-वस्त्यांना झाला. मात्र त्यानंतरच्या काळात देखभाल व दुरुस्ती अभावी या रस्त्यांची दयनिय झाल्याने सद्य:स्थितीत तालुक्यातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था आहे. यात वाहनांचा प्रथम बळी जात आहे.स्थळ - पाहूची बारी रस्ता ( फोटो -08 सप्टेंबरपेठ 03)पेठहून सायंकाळी सुटणारी पेठ-पाहूची बारी ही शेवटची लांब पल्ल्याची बस. सर्व खासगी वाहने निघून गेल्यावर अंबापूर, कोपुर्ली, खिरकडे, तिर्ढ, जोगमोडी, माळेगाव, म्हसगण, आंबे यासह २० ते २५ गावांसाठी ही शेवटची बस. थांब्यांची संख्या जास्त असल्याने कधी कधी पाहूची बारीला पोहोचायला या बसला रात्री १० वाजतात. त्यातच काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास जागमोडी जवळ ही बस पंक्चर झाल्याने अंधारात प्रवाशांना ताटकळून रहावे लागले. गाडीत अनेक महिला व शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याने तासन् तास खोळंबा होत असल्याने याचे सर्व खापर खड्डेयुक्त रस्त्यांवर येऊन फुटते. अनेक प्रवाशांना मुख्य रस्त्यावर उतरून चार ते पाच किमी पायी जावे लागते.गाडीत बसा... पण नाशिक पोहोचेलच असे नाहीमहाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची तर अतिशय दयनिय अवस्था झाली आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याचे रु ंदीकरण सुरू असताना पर्यायी रस्तेच नसल्याने वाहनधारकांना खड्डे व गाळातून कसरत करत मार्गक्र मण करण्याची वेळ आली आहे. याचाही सर्वाधिक त्रास लालपरीलाच सहन करावा लागत आहे. पेठ आगारातून सुटणारी नाशिक बस नाशिकला पोहोचेल की नाही याची धास्ती प्रवाशांना असते. पेठ ते नाशिक या ५५ किमी अंतरात दररोज दोन तरी बसेस नादुरु स्त होऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दिसतात. म्हणजे बसमध्ये बसा, तिकिटाचे पैसेही द्या मात्र तुम्ही नाशिकला पोहोचालच याची खात्री नाही. त्यातच बºयाच ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनधारकांमध्ये खटके उडण्याचे प्रसंग घडत आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकstate transportराज्य परीवहन महामंडळ