शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

शाळेच्या कर्मचाºयांची चारित्र्य पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:18 IST

र व खुनाच्या प्रकारामुळे राज्यातील शिक्षण विभागाने खासगी शाळांमधील कर्मचाºयांच्या चारित्र्य पडताळणीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील कर्मचाºयांची पोलीस पडताळणी करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागानेही जिल्ह्णातील खासगी शाळांना आदेश देत कर्मचाºयांची पडताळणी करण्यास कळविले आहे.

नाशिक : देशात व राज्यात सातत्याने खासगी शाळांमधील कर्मचाºयांनी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींवर केलेल्या अत्याचार व खुनाच्या प्रकारामुळे राज्यातील शिक्षण विभागाने खासगी शाळांमधील कर्मचाºयांच्या चारित्र्य पडताळणीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील कर्मचाºयांची पोलीस पडताळणी करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागानेही जिल्ह्णातील खासगी शाळांना आदेश देत कर्मचाºयांची पडताळणी करण्यास कळविले आहे.  माध्यमिक शिक्षण विभागाच्या या आदेशान्वये सोमवारपासून (दि.२५) जिल्ह्णातील सर्व शाळांचा सुरक्षा, स्वच्छता व गुणवत्ता या तीन निकषांवर आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्णातील शाळांचा आढावा घेतला जाणार आहे. सोमवारी चांदवड व येवला येथील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायीत माध्यमिक शाळांचा आढावा झाला. आढाव्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शाळेतील सुरक्षा व प्रवासातील सुरक्षेबाबत आढावा घेतला जात आहे. सुरक्षेसोबत विद्यालयाची गुणवत्ता व स्वच्छता याबाबत आढावा घेतला जात आहे. शाळेचा परिसर स्वच्छ करण्यासाठी येत्या २ आॅक्टोबरच्या पंधरवड्यात स्वच्छता हीच सेवा हा उपक्र म राबविण्याचे आदेशदेखील देण्यात आलेले आहेत. याशिवाय माध्यमिकच्या प्रत्येक शाळेला त्यांच्या शाळा इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याचा अहवाल शिक्षण विभागाला सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाहनचालकांच्या वर्तनावरही लक्षशिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळेतील सुरक्षेसाठी खासगी स्वयंअर्थहायीत विद्यालयांमधील कर्मचाºयांची पोलीस पडताळणी करणे बंधनकारक केले आहे. विद्यार्थ्यांना घर ते शाळा या दरम्यानच्या सुरक्षेबाबतही योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जात आहे. ग्रामीणसह शहरी भागात व्हॅन, रिक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. त्यासाठी परिवहन समितीच्या माध्यमातून या वाहनचालकांच्या वर्तनावरही लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.