शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

वाहन सुरक्षा : सिन्नर बाजार समितीत उपक्रम, हलगर्जीपणा करणाºयांंवर कारवाईची मागणी अपघात टाळण्यासाठी आता रिफ्लेक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:03 IST

सिन्नर : शेतमाल घेऊन बाजार समितीच्या आवारात येणाºया बैलगाड्यांसह प्रत्येक वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्याची सूचना माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केली.

ठळक मुद्देवाहन सुरक्षा व घ्यावयची काळजीप्रबोधन केल्यास अपघाताचे प्रमाण कमी

सिन्नर : शेतमाल घेऊन बाजार समितीच्या आवारात येणाºया बैलगाड्यांसह प्रत्येक वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्याची सूचना माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केली. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेऊन शेतकºयांच्या आयुष्याची काळजी घ्यावी, वाहनांना रेडिअम व रिफ्लेक्टर लावण्यासाठी बाजार समितीने कर्मचाºयांची नियुक्ती करावी, यात हलगर्जीपणा झाल्यास त्यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे आवाहन कोकाटे यांनी केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती, आतिष मोटार ड्रायव्हिंग स्कूल, अभिजित इंजिनिअरिंग वर्क्स व किसान ट्रेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात वाहन सुरक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कोकाटे यांनी वाहन सुरक्षा व घ्यावयची काळजी यावर शेतकºयांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, तहसीलदार नितीन गवळी, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, बाजार समितीचे उपसभापती सोमनाथ भिसे, शिवाली सोमवंशी, निर्मला वसावे, सुनील गवळी, राजेंद्र गवळी, सदाशिव वाघ, सदाशिव वाघ, माणिक गाडे, राजेेंद्र राजगुरु, संतोष राजगुरु, सचिव विजय विखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून भरत कळसकर आल्यानंतर त्यांच्या उपक्रमामुळे अपघात कमी झाल्याचे कोकाटे म्हणाले. कायद्यामुळे दंडात्मक कारवाई होईल, मात्र वाहनचालकांचे प्रबोधन केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे कोकाटे म्हणाले. आयुष्यमान वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत; मात्र अपघातात अनेक तरुणांचा बळी जात असल्याबाबत त्यांनी जागृती करण्याचे आवाहन केले.वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळावे असे ते म्हणाले. याप्रसंगी बैलगाडी, ट्रॅक्टर व शेतमाल विक्रीसाठी आलेल्या वाहनांना रेडिअम व रिफ्लेक्टर बसविण्यात आले. उपसभापती सोमनाथ भिसे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, शिवाली सोमवंशी यांनी उपस्थित शेतकºयांचे प्रबोधन केले. यावेळी संचालक विनायक तांबे, विनायक घुमरे, शांताराम कोकाटे, संजय खैरनार, सुधाकर शिंदे, सविता उगले, नगरसेवक वासंती देशमुख यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दुचाकी सर्वांत धोकादायकअनेकदा अपघात झाल्यानंतर अगोदर आरटीओला शिवी दिली जाते. तुम्हाला लायसन्स कोणी दिले ? असेही विचारले जाते; मात्र लायसन्स देताना चालकाच्या मनाची चाचणी आम्ही घेत नसल्याचे प्रादेशिक अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले. चालक वाहतुकीचे नियम पाळत नाही, त्यामुळे अपघात होत असल्याचे ते म्हणाले. दुचाकी सर्वांत धोकादायक वाहन असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी हेल्मेट वापरण्याचा आग्रह कळसकर यांनी केला. दंडात्मक कारवाई फारशी यशस्वी होत नाही. त्यासाठी चालकांच्या मनाचे प्रबोधन होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.