शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

तीनच दिवस मिळणार भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:10 IST

येवला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून शहरातील नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी व ...

ठळक मुद्देकोरोनावर उपाययोजना : येवल्यात विक्रेत्यांना सूचना

येवला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून शहरातील नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी व नागरिकांमधील संपर्क साखळी खंडित करण्यासाठी अत्यावश्यक सेवेसाठी नगर परिषदेने दिवस व जागा व वेळा निश्चित केल्या आहेत. शहरवासीयांना आठवड्यातून तीनच दिवस किराणा व भाजीपाला उपलब्ध होणार आहे.पालिका हद्दीतील सर्व किराणे दुकाने सोमवार, बुधवार व शुक्र वारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात यणार आहेत. भाजीपाला, फळ विक्र ेते यांनी सोमवार, बुधवार व शुक्र वारी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत हातगाडीवर फिरून किंवा शहरातील ठरवून दिलेल्या जागेत भाजीपाला विक्री करावा. भाजीपाला व फळ विक्र ीसाठी शहारातील मुख्य भाजी मार्केट, नागड दरवाजा रोड, गंगादरवाजा रोड, फत्तेबुरु ज नाका, विंचूर चौफुली, टिळक मैदान, काळा मारु ती रोड, आयना मशीद रोड, डॉ. लोखंडे हॉस्पिटलजवळ, कोटमगाव रोड, विठ्ठलनगर, ताज पार्क, मिल्लत नगर, हुडको कॉलनी, बदापूररोड, वल्लभ नगर या जागा परिषदेने निश्चित केल्या आहेत. तसेच संसर्ग टाळण्यासाठी ठरावीक अंतर पाळण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने अत्यावश्यक सेवांचे वेळ व ठिकाण निश्चित केले असून, नागरिकांनी ठरवून दिलेल्या वेळेतच गरज असल्यास खरेदीसाठी बाहेर पडावे, असे आवाहन नगर परिषद मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी केले आहे.दूध विक्र ेत्यांनी दररोज सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान विंचूर रोड, मिलन मिठाईजवळ, डॉ. गायकवाड हॉस्पिटल, नागड दरवाजा रोड, फत्तेबुरु ज नाका, गंगादरवाजा रोड, देवी खुंट, हुडको कॉलनी, वल्लभ नगर, कोटमगाव रोड या ठिकाणी दुधाची विक्र ी करावी. दवाखान्याशी संलग्न सोडून सर्व मेडिकल दररोज सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील. पिण्याच्या पाण्याचे जार दररोज सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत घरपोच करण्यात येतील, असे नियोजन नगर परिषदेने केले आहे. यासंदर्भात संबंधिताना पालिकेने आदेश देत जागा ठरवून दिल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार