शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
2
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
7
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
8
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान
9
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
10
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
11
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
12
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
13
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
14
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
15
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
16
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
17
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
18
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
19
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
20
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."

भाजीविक्रेत्यांना ‘अल्टिमेटम’

By admin | Updated: December 28, 2015 23:30 IST

गणेशवाडी : ताबा न घेतल्यास नव्याने लिलावप्रक्रिया

नाशिक : महापालिकेने गणेशवाडी येथील भाजीमंडईतील ४६८ पैकी १५४ ओट्यांचा लिलाव होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी ओटेधारक विक्रेत्यांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. त्यातच महापालिकेने पंधरा दिवसांपूर्वी राबविलेल्या लिलावालाही अत्यल्प प्रतिसाद लाभलेला आहे. १५४ ओटेधारकांनी अद्याप ताबा न घेतल्याने आणि भाडेही अदा न केल्याने महापालिकेने संबंधित विक्रेत्यांना अल्टिमेटम दिला असून, नव्याने लिलावप्रक्रिया राबविण्याचे संकेत दिले आहेत. महापालिकेने गणेशवाडी येथे सुमारे ६ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या भाजीमंडईमधील ४६८ पैकी १५२ ओट्यांसाठी लिलावप्रक्रिया पूर्ण करून सहा महिने उलटले तरी, अद्याप एकाही विक्रेत्याने मंडईत व्यवसायाला सुरुवात केलेली नाही. न्यायालयाने गोदाघाटावरील भाजीमार्केट हटविण्याचे आदेश जून महिन्यात दिल्यानंतर महापालिकेने गणेशवाडी भाजीमार्केटमधील ४६८ ओट्यांसाठी दि. १० जून २०१५ रोजी लिलावप्रक्रिया राबविली होती. या लिलावात सहभागी होणाऱ्या विक्रेत्यांकडून महापालिकेने प्रत्येकी पाच हजार रुपये अनामत रक्कम घेतली. त्यानुसार लिलावात १५२ ओट्यांना बोली बोलली जाऊन महापालिकेला महिनाभराचे भाडे २ लाख ४३० रुपये प्राप्त झाले होते, तर अनामत रकमेच्या माध्यमातून ७ लाख ६० हजारांचा महसूल खजिन्यात जमा झाला होता. उर्वरित ३१६ ओट्यांना मागणीच न आल्याने त्यांचा लिलाव तहकूब ठेवण्यात आला होता. लिलावप्रक्रियेत सर्वाधिक बोली मासिक २ हजार रुपये भाड्यासाठी बोलली गेली होती, तर महापालिकेने १३५० रुपयांपासून सुरुवात केली होती. सदर लिलावप्रक्रिया होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. परंतु विक्रेत्यांना मार्केटमध्ये व्यवसाय थाटण्यास मुहूर्त लाभलेला नाही. महापालिकेने संबंधित विक्रेत्यांकडून तीन महिन्यांचे आगावू भाडे घेतले होते. त्यानंतर विक्रेत्यांनी भाडे भरलेले नसल्याने महापालिकेने आता त्यांच्या अनामत रकमेतून भाडे वळते करण्यास सुरुवात केल्याचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी सांगितले. विक्रेत्यांनी मार्केटमध्ये त्यांना दिलेल्या ओट्यांवर व्यवसाय सुरू करावा अन्यथा मुदतीनंतर सदर ओट्यांसाठी पुन्हा एकदा नव्याने लिलावप्रक्रिया राबविण्यात येईल, असेही बहिरम यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महापालिकेने ७ डिसेंबर रोजी राबविलेल्या लिलाव प्रक्रियेत ३१६ ओट्यांपैकी केवळ २० ओट्यांना प्रतिसाद मिळालेला आहे. परंतु त्यांच्याकडूनही अद्याप व्यवसायाला सुरुवात झाली नसल्याने संबंधित विक्रेत्यांवर कुणाचा दबाव आहे काय, अशी शंका प्रशासकीय पातळीवर व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)