शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

पितृपक्षाच्या प्रारंभी भाज्यांचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 18:42 IST

शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे तर काहींच्या भाजीपाल्यांच्या उत्पादनात घट होत आहे. यामुळे ऐन पितृपक्षात भाज्यांचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या दिवसांत भाजीपाल्याला मोठी मागणी असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून हे भाव वाढविण्यात आले आहे.   

ठळक मुद्देभाज्यांचे भाव गगणाला भिडले आहे.अजून १५ दिवस भाज्यांचे दर असेच राहणार पावसाचा जोर कायम राहिला तर भाव अधिक वाढण्याची शक्यता

नाशिक : शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे तर काहींच्या भाजीपाल्यांच्या उत्पादनात घट होत आहे. यामुळे ऐन पितृपक्षात भाज्यांचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या दिवसांत भाजीपाल्याला मोठी मागणी असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून हे भाव वाढविण्यात आले आहे.   पितृपक्ष म्हणजे आपल्या पुर्वजांना स्मरण करून त्यांना विविध पकवनांचा नवैद्य दाखविण्यात येतो. भाद्रपद पोर्णिमेपासुन पितृपक्षास सुरूवात होत असते. त्यामुळे या दिवसांत भाज्यांना मोठी मागणी असते. त्यात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्यामुळे भाज्यांचे भाव गगणाला भिडले आहे. भाज्यांमध्ये कारले, आळुची पाने, मेथी, पालक, गवार, वाल, भोपळा यांचे भाव वाढले आहे. १० दिवसांपुर्वी भाज्यांचे भाव आवाक्यात होते मात्र पावसाची सुरूवात होताच मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी याचा फटका भाज्यांवर झालेला दिसून येत आहे. तसेच कांद्याची आवकही मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्यामुळे कांद्याचे भावही गगणाला भिडत आहे.  त्यामुळे  त्यात पितृपक्षाची आता सुरुवात झाली असून अजून १५ दिवस भाज्यांचे दर असेच राहणार असल्याचे विक्रते सांगत आहेत. तसेच पावसाचा जोर वाढला तर भाज्यांच्या भावात असुन वाढ होण्याची शक्यता आहे.      पावसाचा फटका  नाशिक जिल्हा पालेभाज्यांसह कांद्याच्या उत्पादनात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मागील महिन्यात जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पालेभाज्यांना मोठा फटका बसला होता तेव्हाही भाज्यांचे दर गगणाला भिडले होते. मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर दर पुन्हा आवाक्यात आले होते. जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असून त्यामुळे काही भागांतील शेतकºयांचे नुकसान झाल्यामुळे मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाव वाढविण्यात आल्याचे विक्रेते सांगत आहे. 

असे आहे भाज्यांचे दर  चवळी : ५० ते ६० रुपये किलो  कोथिंबीर जुडी: ७० ते ८० रूपये  शिमला मिर्ची : ६० ते ७० रुपये किलो  गवार : १०० ते १२० रुपये किलो  भेंडी : ४० रुपये किलो  मेथीची जुडी : २० रुपये  अळुची पाने : १५ ते २० रूपयांना १० पाने  कारले : ४० ते ५० रुपये किलो  वाल : ४० ते ६० रुपये किलो  कांदा : ४० ते ५० रुपये किलो

पुन्हा भाव वाढण्याची शक्यता  पावसाचा जोर असाच कायम राहिला तर भाज्यांचे भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यात पितृपक्षामुळे भाज्यांना मागणी वाढत असून त्याप्रमाणात आवक नसल्यामुळे परिणामी भाव वाढवावे लागत आहे. यामध्ये जवळपास सर्वच भाज्यांचे भाव वाढले आहे.   विजय डावरे, भाजीविक्रेता    

टॅग्स :Nashikनाशिकvegetableभाज्या