शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

नाशिक बाजार समितीत भाज्यांचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:16 IST

राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंचाने पुकारलेल्या देशव्यापी शेतकरी संपामुळे शुक्रवारी (दि.१) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाज्यांची आवक घटली असून, भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहे.

नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंचाने पुकारलेल्या देशव्यापी शेतकरी संपामुळे शुक्रवारी (दि.१) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाज्यांची आवक घटली असून, भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहे. देशव्यापी संपाला शहर परिसर व संपूर्ण तालुक्यातून संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी शेतकऱ्यांमध्ये शेतमाल करणाºया वाहनांचे नुकसान होण्याची भीती असल्याने अनेक शेतकºयांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शेतीमाल बाजार न नेण्याचा निर्णय घेतल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात केवळ ३० टक्केच शेतमाल विक्रीसाठी आला होता.  पुणतांब्यातील शेतकºयांनी गेल्यावर्षी १ जूनला पुकारलेल्या शेतकरी संपाला नाशिक जिल्ह्णातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्याचप्रमाणे ३ जूनच्या मध्यरात्री सरकार आणि आंदोलनाच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर शेतकºयांची फसवणूक झाल्याची भावना शेतकºयांमध्ये पसरल्याने संपाची धुरा हातात घेणाºया नाशिक जिल्ह्णातच यावेळी संपाला अनेक भागांतून अत्यल्प तर काही भागांतून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. गेल्यावर्षी एकजुटीने संपाची धग सरकारपर्यंत पोहचविणाºया नाशिक जिल्ह्णात शेतकरी संपात एक जुटीचा अभाव दिसून आला असून, संप यशस्वी करण्याची जबाबदारी असलेले शेतकरी नेतेही दुसºया जिल्ह्णात असल्याने आंदोलनात समन्वयाचाही अभाव दिसून आला. दरम्यान, नाशिक जिल्ह्णातील मालेगाव, देवळा, सटणा, विंचूर, चांदवड, मनमाड, निफाड सायखेडा, सिन्नर परिसरासह पेठ, सुरगाणा परिसरातील गोळशी फाट्यावर आंदोलकांनी भाजीपाल्याची वाहने अडविण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे परिसरातील वाहने बाजार समितीत दाखल होऊ शकली. बाजार समितीत आलेल्या सर्व कृषिमालाचे लिलाव नियमितपणे सुरू होते. परंतु आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले.शेतकरी संघटनांच्या वेगळ्या चुलीगेल्यावर्षी एकजुटीने संपात उतरलेल्या वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी यावर्षी वेगवेगळ्या चुली मांडल्याचे दिसून आले. किसान सभेने शेतकरी कर्जमुक्ती, हमीभाव व वनजमिनी कसणाºया शेतकºयांच्या नावे करण्याची मागणी करीत आंदोलन केले, तर नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने हुतात्मा स्मारकात अभिवादन सभा घेऊन शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून हुतात्मा झालेल्या शेतकरी व शेतकरी नेत्यांना अभिवादन केले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विभागीय निबंधकांना निवेदन देऊन शेतकºयांच्या सातबारा उताºयावर बँकांचे नाव न लावण्याची मागणी केली.

टॅग्स :vegetableभाज्या