शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

भाज्या कडाडल्या; वांगी १०० तर कांदे ४० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 10:52 IST

नागपुरात भाज्यांची आवक पूर्णत: अन्य राज्य आणि महाराष्ट्रातील अन्य शहरांवर अवलंबून आहे. पण या भागातूनही आवक कमी आहे. किरकोळ बाजारात वांगी १०० वर तर कांदे ४० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

ठळक मुद्देआवक कमी झाल्याने गृहिणींचे बजेट बिघडले

रियाज अहमद।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या १५ दिवसापासून भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. किरकोळ बाजारात सर्वाधिक भाव आहेत. आवक कमी झाल्यामुळे ठोक बाजारात सर्वच भाज्या महाग आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाव वधारले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक आर्थिक संकटात आहे. किरकोळ बाजारात वांगी १०० वर तर कांदे ४० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.नागपुरात भाज्यांची आवक पूर्णत: अन्य राज्य आणि महाराष्ट्रातील अन्य शहरांवर अवलंबून आहे. पण या भागातूनही आवक कमी आहे. भाज्यांचे अडतिये आणि किरकोळ विके्रत्यांनुसार १५ दिवसापासून भाज्यांची आवक कमी झाली आहेत. किरकोळ बाजारात वांगे प्रति किलो ८० ते १०० रुपये आहेत. हे भाव १५ दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये होते. कांद्याचे भाव १५ ते २० रुपयांवरून ३५ ते ४० रुपयांवर, बिन्स शेंगा ८० वरून १६० ते २०० रुपये, गवार शेंग ५० वरून ८० रुपये, पालक २० रुपयांवरून १०० ते १२० रुपये, पत्ताकोबी ३० वरून ४० ते ५० रुपये तर लसणचे भाव ५० ते ६० रुपयांवरून १२० रुपये, मेथी ४० ते ५० वरून १०० ते १२० रुपये आणि बीटचे भाव ४० रुपयांवरून दुपटीवर अर्थात ८० रुपयांवर पोहोचले आहेत. आल्याच्या भावात तिप्पट वाढ झाली असून भाव ८० ते १०० वरून २०० रुपयांपर्यंत पोहेचले आहेत. किरकोळमध्ये कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची, भेंडी, शिमला मिरची आदींची आवक वाढल्यामुळे भाव कमी झाले आहेत. गुरुवारी किरकोळ बाजारात वांगे ८० ते १०० रुपये किलो, कांदे ३५ ते ४०, फूलकोबी ८० ते १००, पत्ताकोबी ४० ते ५०, आले १९० ते २००, लसूण १२०, बिन्स शेंगा १६० ते २००, गवार शेंग ८०, बीट ८०, पालक भाजी १०० ते १२०, मेथी १०० ते १२० रुपये भाव होते.

चवळी शेंगचे भाव कमी२० दिवसांपूर्वी किरकोळ आवक कमी झाल्यानंतर बाजारात चवळी शेंगाचे भाव १२० रुपये किलोपर्यंत वधारले होते. पण पाऊस थांबल्यानंतर आवक वाढली. त्यामुळे किरकोळ बाजारात ५० रुपये किलो आहे.

आले व लसूणची आवक कमीसध्या किरकोळ बाजारात आले १८० ते २०० रुपये प्रति किलो भाव आहेत. १५ दिवसापूर्वी भाव ८० ते १०० रुपये होते. आवक बेंगळुरू आणि छिंदवाडा येथून होते. पण सध्या बेंगळुरू येथून आवक आहे. पण आवक कमी असल्यामुळे भाव वाढले आहेत. लसूण राजस्थानातून येतो. पण तेथूनही आवक कमी आहे.

बाहेरून आवक कमीपावसामुळे नागपूरलगतच्या भागातून आवक बंद झाली. केवळ एक वा दोन टक्के शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक आहे. अन्य शेतकरी शेतीच्या कामात गर्क आहेत. त्यामुळे भाज्यांची आवक कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेशसह नाशिक, औरंगाबाद, धुळे, यवतमाळ, संगमनेर, जळगांव आदी शहरांवर अवलंबून आहे. ही राज्ये आणि शहरामध्ये पावसाळ्यातही उत्पादने चांंगले आहे. उत्पादक नागपूरसह अन्य राज्यातही भाज्या विक्रीसाठी नेतात. त्यामुळे नागपुरात पुरेशी आवक नाही. याच कारणामुळे भाव वधारले आहे.आॅक्टोबरनंतर होणार भाव कमीभाज्यांची आवक अन्य शहरांवर अवलंबून आहे. पण अन्य शहरांतूनही भाज्या कमी असल्यामुळे भाव वाढले आहे. आॅक्टोबरनंतर नागपूरलगतच्या भागातून आवक सुरू होईल. त्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता आहे. अन्य शहरांतून आवक वाढल्यानंतरही भाव कमी होत नाहीत.- राम महाजन, सचिव, महात्मा फुले सब्जी फ्रूट अडतिया असोसिएशन.नवीन उत्पादनाअभावी कांदे महागनवीन उत्पादनाअभावी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ३५ ते ४० रुपयांवर पोहोचले आहे. बाजारात जुने कांदे विक्रीस आहे. जानेवारीनंतरच नवे उत्पादन बाजारात येईल.

टॅग्स :vegetableभाज्या