शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

भाज्या कडाडल्या; वांगी १०० तर कांदे ४० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 10:52 IST

नागपुरात भाज्यांची आवक पूर्णत: अन्य राज्य आणि महाराष्ट्रातील अन्य शहरांवर अवलंबून आहे. पण या भागातूनही आवक कमी आहे. किरकोळ बाजारात वांगी १०० वर तर कांदे ४० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

ठळक मुद्देआवक कमी झाल्याने गृहिणींचे बजेट बिघडले

रियाज अहमद।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या १५ दिवसापासून भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. किरकोळ बाजारात सर्वाधिक भाव आहेत. आवक कमी झाल्यामुळे ठोक बाजारात सर्वच भाज्या महाग आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाव वधारले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक आर्थिक संकटात आहे. किरकोळ बाजारात वांगी १०० वर तर कांदे ४० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.नागपुरात भाज्यांची आवक पूर्णत: अन्य राज्य आणि महाराष्ट्रातील अन्य शहरांवर अवलंबून आहे. पण या भागातूनही आवक कमी आहे. भाज्यांचे अडतिये आणि किरकोळ विके्रत्यांनुसार १५ दिवसापासून भाज्यांची आवक कमी झाली आहेत. किरकोळ बाजारात वांगे प्रति किलो ८० ते १०० रुपये आहेत. हे भाव १५ दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये होते. कांद्याचे भाव १५ ते २० रुपयांवरून ३५ ते ४० रुपयांवर, बिन्स शेंगा ८० वरून १६० ते २०० रुपये, गवार शेंग ५० वरून ८० रुपये, पालक २० रुपयांवरून १०० ते १२० रुपये, पत्ताकोबी ३० वरून ४० ते ५० रुपये तर लसणचे भाव ५० ते ६० रुपयांवरून १२० रुपये, मेथी ४० ते ५० वरून १०० ते १२० रुपये आणि बीटचे भाव ४० रुपयांवरून दुपटीवर अर्थात ८० रुपयांवर पोहोचले आहेत. आल्याच्या भावात तिप्पट वाढ झाली असून भाव ८० ते १०० वरून २०० रुपयांपर्यंत पोहेचले आहेत. किरकोळमध्ये कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची, भेंडी, शिमला मिरची आदींची आवक वाढल्यामुळे भाव कमी झाले आहेत. गुरुवारी किरकोळ बाजारात वांगे ८० ते १०० रुपये किलो, कांदे ३५ ते ४०, फूलकोबी ८० ते १००, पत्ताकोबी ४० ते ५०, आले १९० ते २००, लसूण १२०, बिन्स शेंगा १६० ते २००, गवार शेंग ८०, बीट ८०, पालक भाजी १०० ते १२०, मेथी १०० ते १२० रुपये भाव होते.

चवळी शेंगचे भाव कमी२० दिवसांपूर्वी किरकोळ आवक कमी झाल्यानंतर बाजारात चवळी शेंगाचे भाव १२० रुपये किलोपर्यंत वधारले होते. पण पाऊस थांबल्यानंतर आवक वाढली. त्यामुळे किरकोळ बाजारात ५० रुपये किलो आहे.

आले व लसूणची आवक कमीसध्या किरकोळ बाजारात आले १८० ते २०० रुपये प्रति किलो भाव आहेत. १५ दिवसापूर्वी भाव ८० ते १०० रुपये होते. आवक बेंगळुरू आणि छिंदवाडा येथून होते. पण सध्या बेंगळुरू येथून आवक आहे. पण आवक कमी असल्यामुळे भाव वाढले आहेत. लसूण राजस्थानातून येतो. पण तेथूनही आवक कमी आहे.

बाहेरून आवक कमीपावसामुळे नागपूरलगतच्या भागातून आवक बंद झाली. केवळ एक वा दोन टक्के शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक आहे. अन्य शेतकरी शेतीच्या कामात गर्क आहेत. त्यामुळे भाज्यांची आवक कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेशसह नाशिक, औरंगाबाद, धुळे, यवतमाळ, संगमनेर, जळगांव आदी शहरांवर अवलंबून आहे. ही राज्ये आणि शहरामध्ये पावसाळ्यातही उत्पादने चांंगले आहे. उत्पादक नागपूरसह अन्य राज्यातही भाज्या विक्रीसाठी नेतात. त्यामुळे नागपुरात पुरेशी आवक नाही. याच कारणामुळे भाव वधारले आहे.आॅक्टोबरनंतर होणार भाव कमीभाज्यांची आवक अन्य शहरांवर अवलंबून आहे. पण अन्य शहरांतूनही भाज्या कमी असल्यामुळे भाव वाढले आहे. आॅक्टोबरनंतर नागपूरलगतच्या भागातून आवक सुरू होईल. त्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता आहे. अन्य शहरांतून आवक वाढल्यानंतरही भाव कमी होत नाहीत.- राम महाजन, सचिव, महात्मा फुले सब्जी फ्रूट अडतिया असोसिएशन.नवीन उत्पादनाअभावी कांदे महागनवीन उत्पादनाअभावी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ३५ ते ४० रुपयांवर पोहोचले आहे. बाजारात जुने कांदे विक्रीस आहे. जानेवारीनंतरच नवे उत्पादन बाजारात येईल.

टॅग्स :vegetableभाज्या