शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

भाजीपाला पिकाला उन्हाचा तडाखा

By admin | Updated: March 30, 2017 00:35 IST

नाशिक: संपूर्ण महाराष्ट्र उन्हाच्या काहिलीने भाजून निघत असतानाच नाशिक मध्येही तपमानाने चाळिशी ओलांडली आहे. नाशिक जिल्ह्यातील भाजीपाल्याला या उन्हाचा तडाखा बसला आहे.

संदीप झिरवाळ : नाशिकसंपूर्ण महाराष्ट्र उन्हाच्या काहिलीने भाजून निघत असतानाच नाशिक मध्येही तपमानाने चाळिशी ओलांडली आहे. भाजीपाला पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील भाजीपाल्याला या उन्हाचा तडाखा बसला आहे. मुंबईसह अन्य उपनगरांत फळे व पालेभाज्यांचा पुरवठा करणाऱ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालाची आवक उन्हामुळे घटल्याने बाजारभाव तेजीत आहेत.  गेल्या चार-पाच दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सूर्य आग ओकत आहे. अनेक शहरांमध्ये पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर जाऊन पोहोचला आहे. वाढत्या उष्म्याचा परिणाम जिल्ह्यातील फळ व भाजीपाला पिकांवरही जाणवू लागला आहे. उन्हामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने काही दिवसांपासून शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने जवळपास ७० टक्के शेतमालाची आवक घटली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबईसह वापी, वाशिम, व अन्य उपनगरांत दैनंदिन १०० ते १२५ वाहने भरून शेतमाल जात असतो. बाजार समितीत वांगी, टमाटा, फ्लॉवर, कोबी, भोपळा, ढोबळी मिरची, कारले, दोडका, भेंडी, गिलके या फळभाज्यांची आवक होत आहे. यात वांगी, टमाटा, फ्लॉवर, कोबी या शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारभाव मध्यम आहेत. तर भेंडी, गवार, गिलके, कारले, दोडका या फळभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. भाजीबाजारात भेंडी ५० ते ६०, गवार ८० रुपये किलो, दोडका ४०, गिलके ४० तर कारले ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असल्याने ग्राहकांना दोनवेळचा भाजीपाला खरेदी करण्यासाठी खिशाचा विचार करावा लागत आहे.