शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

वेदांत संपूर्ण मानवजातीचे कल्याण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:10 IST

मुकुंदकाका जाटदेवळेकर : वैदिक महाविद्यालयाकडून ‘राष्टÑीय पंडित पुरस्कार’ नाशिक : वेद संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असून, भारतीय संस्कृतीचे अस्तित्व वेदांमुळे टिकून आहे. पृथ्वीतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक आबालवृद्धाच्या सर्वांगीण कल्याणाचा मार्ग वेदांनी सांगितला आहे. वेदांचे रक्षण करण्याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची आजच्या युगात वैदिकांवर मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर यांनी केले.

मुकुंदकाका जाटदेवळेकर : वैदिक महाविद्यालयाकडून ‘राष्टÑीय पंडित पुरस्कार’

नाशिक : वेद संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असून, भारतीय संस्कृतीचे अस्तित्व वेदांमुळे टिकून आहे. पृथ्वीतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक आबालवृद्धाच्या सर्वांगीण कल्याणाचा मार्ग वेदांनी सांगितला आहे. वेदांचे रक्षण करण्याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची आजच्या युगात वैदिकांवर मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर यांनी केले.तपोवन केवडीबनातील वैदिक ज्ञान-विज्ञान संस्कृत महाविद्यालयाच्या वतीने वैदिकसम्राट पंडित श्रीकृष्णशास्त्री गोडसे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्टÑीय पंडित पुरस्कार प्रदान सोहळा सोमवारी (दि.११) संपन्न झाला. परशुराम साईखेडकर सभागृहात झालेल्या या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून जाटदेवळेकर मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते वेदाचार्य लक्ष्मीकांत मथुरादास दीक्षितशास्त्री यांना ‘राष्टÑीय पंडित पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच गोकर्ण महाबळेश्वरचे वैदिकरत्न श्रीधर अडी: यांनाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाही. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य शांताराम भानोसे, उपाध्यक्ष अंजली जाधव, उपप्राचार्य दिनेश गायधनी, जयंत जोशी उपस्थित होते. यावेळी जाटदेवळेकर म्हणाले, वेदांचे संशोधन करणारे खूप लोक आहेत. वेदांचे अध्ययन करणाºयाला वैदिक, पंडित, शास्त्री या शब्दांनी संबोधले जाते.या विद्यार्थ्यांचा गौरव संहिता पूर्ण क रणारे, जाटपाठी, घनपाठी यांच्यासह पाठशाळेमधील गुणवंत यश जोशी, हेरंब कुलकर्णी, सिद्धेश जोशी, रोपकर, निकेल जोशी, धनंजय दीक्षित, विजय पाठक, तुषार कुलकर्णी, मकरंद जोशी, अभिषेक कुलकर्णी, राहुल दीक्षित, प्रणव कुलकर्णी, राहुल बेळे, स्वप्नील जोशी यांच्यासह गुणवंतांना गुरुजींच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.